Marathi Khichadi Entertainment
Mumbai Goa Highway
रत्नागिरीकर
ओल्या_काजूगराची_भाजी
Village
मतदार
मधु दंडवते कोकण
Shrungarpur
#श्रुंगारपुर
1995 साली बाबांची बदली #देवरुखला होऊन माझा श्रुंगारपुरशी संपर्क जरी तुटला असला तरी त्या गावाशी नाते गेली 25-30 वर्षे अजुन #टीकुन आहे.
आयुष्याची सुरुवात,माझे बालपण,पहिले पाऊल,पहिला शब्द,पहिली शाळा,पहिला मित्र,पहिला खेळ,मासे पकडण्याची कला,भजनाची आवड, गावची ओढ आणि माणुस जोडण्याचे #संस्कार माझ्यावर याच #गावात झाले ते ही खोलवर.
वयाची 6 वर्षे पुर्ण झाल्यावर शाळेत प्रवेश मिळतो पण मी अडीच वर्षाचा असल्यापासुनच शाळेत जावुन बसत असे,त्यानंतर पहीली आणि दुसरी ला तर मी कधीच #चालत घरी नाही गेलो वरच्या वर्गातील मुले मला कांदे-बटाटे (म्हणजेच पाठीवर उचलुन)घ्यायचे एकाकडे बॅग तर एकाकडे चप्पल असायची, गुरुजींचा मुलगा म्हणुन माझा थाट वेगळाच असायचा.सातवीतल्या मुलांसोबत पाण्यातुन #पार्लेजी खायची मज्जा,त्यांच्या डब्यातला #फोडणीचा_भात मी आयुष्यात विसरु शकणार नाही.
बामन नदीला लागुन 10-15 फुटावर आमचं घर पावसाळ्यातुन पुराच्या वेळेला येणारे #दगडांचे आवाज आजही कधी-कधी कानात वाजतात.
बाबा कामानिमित्त बाहेर गेले की मी दिवसभर नदीत मासे पकडत बसायचो,त्यात काठीला गांडुळ बांधुन शिट्टी वाजवत #मासे_पकडायचो,पोहायला लवकर शिकायला यावे म्हणुन कोणाच्यातरी सांगण्यावरून जीवंत #रतवा (छोटा मासा)पण बर्याच वेळेला खाल्ल्या आहेत.
नदीशी संबंधित माझी गोड आठवण म्हणजे नदी आटली की कातळाजवळ एक डोह होता त्याच्या वरच्या बाजुला शेतीच्या मळ्या होत्या त्या ठीकाणी आम्ही थोडीशी #कोथींबीर रूजवायचो आणि ज्या दिवशी ती तयार होईल त्या दिवशी नदीच्या त्या डोहातील संपुर्ण पाणी ताटलीने उपसुन त्यातील #मासे पकडायचो आणि त्या कोथिंबीर सोबत शिजवुन त्या शेतातच पार्टी करायचो.काय सुख होतं त्यात,एकदम भारी.
खेळ पण त्यावेळी खुप मजेदार होते #लगोरी आणि #विटीदांडु हे त्यात माझे खुप आवडीचे ,नदिपलिकडे खेळत असलेल्या त्या विटीदांडुच्या कावडीतील "कुत्ती कवाडी" मी एकटा असलो की आजही म्हणतो पण त्या शब्दाचा अर्थ आजपर्यंत काही मला कळलेला नाही.
शेजारील #बारक्या जो माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठा होता तो आमचा त्यावेळचा ग्रुप लिडर होता त्या सोबत च्या आठवणी म्हणजे आमच्या #पार्टी असायच्या त्याही कसल्या..?? चहा बटर,चहा बिस्कीट स्पाँन्सर नेहमी बारक्याच असायचा. गुढीपाडव्याला आमच्या जाधव वाडीतील प्रत्येक घराची गुढी आम्ही उतरवायचो मग प्रत्येक घरातुन 2-3 रुपये मिळायचे मग आम्ही त्याचा रवा आणायचो आणि #शिरा करुन जंगी पार्टी करायचो.
मी 5-6 वर्षाचा होतो असेन तेंव्हा बारक्या आणि आम्ही बिझनेस पण करायचो #निकमांच्या दुकानावरून गुळाच्या चिक्क्या,चणे,शेंगदाणे,दगडीगोळी विकत आणायचो आणि बारक्याच्या एका ओपन खिडकीत #दुकान मांडायचो आणि आणलेल्या कीमतीतच ते आम्हीच विकत घ्यायचो😂😂
पण देवदिवाळीच्या जत्रेत आमची उलाढाल मोठी असायची बारक्याच दुकान असायच त्यात तो पपनीसच्या शेडी,ताक आणि त्याच्या घरी लागलेली म्हैस-केळी विकायचा मी त्याच्या सोबतच असायचो या सगळ्यात मला एक वेगळीच #मज्जा यायची जी मी आजही miss करतो.
सणाला सुट्टी पडायची आणि आम्ही गावाला यायचो पण सुट्टी संपुन परत श्रुंगारपुरला कधी जातोय असच नेहमी व्हायचं.
श्रुंगारपुरचे सण ही त्यावेळी दिमाखात व्हायचे मग तो शिमगा असो,दहीहंडी असो की #देवदिवाळी .त्यात शिमगा म्हणजे वेगळीच मज्जा आमच्या जाधव वाडीची छोटी होळी उभी रहायची मग शेवर तोडुन आणणे ,ती उभी करणे यात मी सहभागी असायचो आमचा #नाना मग माझ्यासाठी रात्री वाजविण्यासाठी #आमट्या घेवुन यायचा,आणि मग आठ दिवस खेळणे आणि फाक पाडणे यात नुसती धम्माल यायची.
आमचे दादा-वहीनी म्हणजेच सख्खे आजी-आजोबाही मागे पडतील असे प्रेम त्यांनी आम्हाला दिलं आणि त्यांच्यामुळेच आजपर्यंत माझी एक नाळ या गावाशी बांधुन राहीली.मला ते घर आजही माझं दुसरं मुळ घर किंवा दुसरं आजोळ वाटतं त्यांची मुलं नाना,रवी दादा, वंदुताई आजही मला #भावंडासारखीच वाटतात आणि आहेत कारण तेवढं प्रेम आम्हाला त्या घरातुन मिळालं आणि अशी खुप घरं या श्रुंगारपुरात आहेत जी आपलीशी वाटतात,मग ते #सुभेदारांचे घर असो,#आनंद दादाचे असो.
कोणीतरी #रक्ताची नातीच तिथे आहेत असेच सतत भासत असते...
गाव #सोडतांनाचा तो क्षण आजही माझ्या डोळ्यासमोर आहे जवळ-जवळ संपुर्ण गावच आम्हाला निरोप देण्यासाठी स्टॉपवरती आला होता,त्यानंतर मला आजही आठवतंय जवळ-जवळ चार महिने नवीन शाळेत मी गेलोच नव्हतो,गावातुन #शहरात तर आलो होतो पण जे #सुख_समाधान श्रुंगारपुरने दिले ते कुठेच मिळाले नाही.
आजही माझं #क्लिनीक ज्या #मारळ #बामणोली गावात आहे ती गावे निवडण्याचं श्रेयंच श्रुंगारपुरला जातं कारण या तिन्ही गावांची #ठेवण एकसमान गावच्या मधोमध नदी,चारही बाजुन #सह्याद्री आणि तीच माणसांची ठेवण त्यामुळे मी अजुनही श्रुंगारपुरात असल्याचे बर्याच वेळा भासते.
लहानपणी शाळेत असतांना आम्ही गावावरती निबंध लिहायचो-
चारही बाजुंनी निसर्ग सौंदर्याने श्रुंगारलेले असे माझे श्रुंगारपुर😘😘😘
डॉ सुशील भालेकर
स्वर्ग आणि नरक
एकदा एक संत देवाबरोबर बोलत होता.
त्याने देवाला स्वर्ग आणि नरक मधला फरक विचारला.
“ये तुला प्रत्यक्ष दाखवतो.”
देव म्हणाला.
त्याने संताला दोन दरवाजांजवळ नेलं.
त्याने पहिला दरवाजा ढकलला.एका मोठ्या खोलीत प्रवेश केला.
एका मोठ्या गोल टेबलाभोवती अनेक माणसे बसली होती.
टेबलाच्या मध्यावर रुचकर खिरीने भरलेले मोठे भांडे ठेवलेलं होतं.
त्या खिरीच्या सुगंधाने त्या संत माणसाच्या तोंडाला देखील पाणी सुटलं होतं.
पण मग त्याच्या लक्षात आलं की ती माणसे उपाशी भुकेलेली दिसत होती.
त्यांच्या हाताला लांब दांड्यांचे चमचे बांधलेले होते.
त्यांना हात लांब करून खीर खाता येत नव्हती.
कारण चमच्याचा दांडा हातापेक्षा लांब होता
चमचा तोंडा पर्यंत पोहचतच नव्हता
त्यांच्या यातनांना अंत नव्हता.
भुकेच्या भरीला खिरीच्या सुवासाने त्यांना वेड लावले होते.
“हा नरक आहे...”देव म्हणाला.
“चल आता स्वर्ग पाहू.
”ते दुस-या दारातून आत आले.
ती खोली सुद्धा हुबेहूब पहिल्या खोली सारखीच होती.
तेच टेबल तेच खिरीचं भांडं.
भोवताली माणसं आणि हाताला बांधलेले चमचे.
पण ही सगळी माणसे तृप्त
समाधानी व आनंदी दिसत होती.
आपापसात हसत आनंदाने राहत होती.
“मला कळत नाहीये”
संत म्हणाला,”सारख्याच खोल्या,टेबल,भांडी,खीर आणि तेच लांब दांड्यांचे चमचे,मग ही माणसे खाऊन तृप्त आणि ती उपाशी आणि दु:खी का??
“सोपं आहे...”देव म्हणाला
" लांब दांड्याच्या चमच्याने स्वतः खाता आले नाही तरी दुसऱ्याला भरवता येते
या खोलीतील माणसे एकमेकांना भरवायला शिकली आहेत "
हावरट मनुष्य फक्त स्वत:चा विचार करतो”
जेव्हा तुम्ही दुस-याला त्यांची इच्छा पूर्ण करायला मदत कराल तेव्हा आपोआपच तुमची स्वप्ने सुद्धा पूर्ण होतील...
सुंदर बोधकथा ....
Marathi Attitude Sms
"कोणी ढकलुन देईपर्यंत कोणाच्याही दारात🚪 उभे राहु नका.
"मान-सन्मान 🙏🏻त्यांचाच करा......, जे तुम्हाला बरोबरीने सोबत👫👬 घेऊन चालतील.......!😉
चांगल्या लोकांची सोबत
लोक म्हणतात, पैसे जवळ ठेवा, वाईट वेळेत कामाला येईल.
आम्ही म्हणतो चांगल्या लोकांच्या सोबतीत रहा, वाईट वेळच नाही येणार.
चिमणी आणि कावळा
छत्रपती शिवाजी महाराज - सर्व पुस्तके
2. छावा
3. बुधभूषण
4. राधेय
5. शिवरायांचे खरे शत्रू कोण
6. श्रीमान योगी
7. म्हणे लढाई संपली
8. शंभूराजे
9. शिवचरित्रातून उद्योगमंत्र
10. शंभूचरित्र
11. राजमाता जिजाऊ
12. छत्रपती शिवाजी महाराज
13. छत्रपती संभाजी महाराज
14. संभाजीराजे सांक्षिप्त जीवनपट
15. झुंज
16. मावळा
17. पावनखिंड
18. युगंधर
19. बजिंद
20. ययाती
21. किल्ले रायगड
22. छत्रपती शिवरायांची अस्सल छायाचित्रे
23. रायगडाची जीवन कथा
24. तेरा पोवाडे
25. तोरणा
26. दुर्गरत्न
27. पुरंदर
28. प्रतापगड
29. प्रवास गडकोटांचा
30. महाराष्ट्र दर्शन
31. माझा राजा शिवाजी राजा
32. मुरुड जिंजीरा
33. राजगड
34. रायगड
35. लोहगड
36. विजयदुर्ग
37. विशाळगड
38. शिवनेरी
39. शिवाजी
40. सिंधुदूर्ग..
तुम्हाला पाहिजे असणारी सर्व पुस्तके खालील लिंक वर आहेत कधीही बघा, वाचा, download करा. महत्वाचे म्हणजे हा message share करा जेणेकरून सर्वाना याचा लाभ घेता येईल
https://drive.google.com/drive/mobile/folders/1-8PYwGN2D8rTHWNBjgBmVI9vCfrC8Unr
छत्रपती शिवाजी महाराज Status
पाच मूर्ख 😂
*बिरबलाने शोधलेले*
*पाच मूर्ख*
अकबराने एकदा बिरबलाला फर्मावले-
"आपल्या राज्यातले ५ सर्वात मूर्ख लोक शोधून माझ्यासमोर आणून उभे कर."
"हां खाविंद, पण मला एक महिन्याची मुदत द्यावी."
एक महिन्यानंतर बिरबल दोनच व्यक्तींना घेऊन दरबारात आला.
बादशहाने विचारले "अरे मी तुला ५ मूर्ख आणायला सांगितले होते."
बिरबल म्हणाला "खाविंद, एकेक मूर्खाला सादर करण्याची इजाजत मिळावी."
बिरबलाने पहिला मूर्ख सादर केला.
"महाराज, हा माणूस बैलगाडी चालवताना एक मोठे ओझे डोक्यावर घेऊन बसला होता. का तर म्हणे बैलाला जास्त ओझे पेलायला नको म्हणून!"
"आणि महाराज, हा दुसरा मूर्ख. ह्याच्या घराच्या छपरावर उगवलेले गवत गायीने खावे म्हणून तो तिला शिडीवरून छपरावर नेण्यासाठी प्रयत्न करीत होता."
बादशहा म्हणाला "ठीक आहे. आता तिसरा मूर्ख दाखव."
"महाराज, मी ह्या राज्याचा प्रधान आहे. माझ्याकडे खूप जबाबदाऱ्या आहेत. त्या सोडून मी ५ मूर्खांच्या शोधात फिरतोय म्हणून मी तिसरा मूर्ख."
"ठीक आहे. आता लवकरच चवथा आणि पाचवा मूर्ख मला दाखव."
"महाराज, आपली क्षमा मागतो; पण आपण ह्या राज्याचे राजे असून प्रजेकडे दुर्लक्ष करून मला नको ती कामे करायला सांगता हा मूर्खपणाच नाही का? म्हणून चवथा नंबर आपला!"
"असूदे असूदे. आता लवकर पाचवा कोण ते सांग
"महाराज, पाचवा आपल्यासारख्या मूर्खाच्या कोड्याचं उत्तर जाणून घेण्यासाठी, दैनंदिन कामकाज आणि जबाबदाऱ्या सोडून हातात मोबाईल घेऊन चिकटून बसलेत ते
"शाबास बिरबल शाबास! ताबडतोब आपल्या सगळ्या ग्रुपवर फाॅरवर्ड कर. पाचवे कोण ह्या प्रश्नाच्या उत्तराची लोकं वाट पहाताहेत!"
😅😂😝😜😊😀😍😂😅
📲📲📲
सावधान दोस्तांनो
(खासकरून विवाहित मित्रांनी लक्ष देवून वाचा.)
काही दिवसांपूर्वी मला एक फ्रेंड रिक्वेस्ट आली .
ती कोण्यातरी प्रिया जोशी नावाने होती. जास्त करून मला तर पुरुष मंडळींच्याच रिक्वेस्टी येत असतात.
पण ह्या वेळी एका मुलीने रिक्वेस्ट पाठवली त्यामुळे मी आश्चर्यचकीत होणं सहाजिक होतं.
एक्सेप्ट करायच्या आधी सवयी प्रमाने मी तिचं प्रोफाईल चेक केलं तर समजलं की अजूनपर्यंत तिच्या मित्र यादीत कोणीच नाहीये.
थोडी शंका आली की कोणाचं फेक अकाउंट तर नसेल? नंतर विचार केला की असंही असू शकतं की फेसबुकने ह्या यूजरला नवं समजून माझ्या सोबत मैत्री करण्यासाठी सज्जेस्ट केलं असावं. प्रोफाइल फोटोची जागा रिकामी बघून मी आंदाज लावला बहुतेक नवीन असेल व तिला फोटो अपलोड करता येत नसेल किंवा संकोचली असेल. तर शेवटी मी तिची रिक्वेस्ट एक्सेप्ट केली.
सगळ्यात पहिले तिच्याकडनं धन्यवाद म्हणून मेसेज आला. मग माझ्या सगळ्या स्टेटसवर लाईक आणि कॉमेंटस मिळायला सुरूवात झाली.
अापल्या पोस्टींची कदर करणारी ही नविन मैत्रीण मिळाली म्हणून मी खूप आनंदीत झालो. हा प्रकार पुढं पुढं वाढत गेला व आता मला माझ्या वैयक्तीक आयुष्याविषयी प्रश्न यायला लागले. मला काय आवडतं काय नाही याविषयी विचारपूस व्हायला लागली.
अाता तर ती थोड्याफार रोमँटिक शायरी पण पोस्ट करायला लागली होती.
एक दिवस ह्या बाईसाहेबाने विचारलं : तुम्ही तुमच्या बायकोवर प्रेम करता का?
मी लगेच म्हणालो: हो तर.
ती गप्प बसली.
दुसऱ्या दिवशी तिनं विचारलं : तुमची मॅडम सुंदर असेल ना ?
ह्यावेळेसही मी तेच उत्तर दिलं: हो खूपच सुंदर आहे.
त्याच्या पुढल्या दिवशी म्हणाली : तुमची बायको स्वयंपाक चांगला बनवते का ?
" खूपच रूचकर आणि जबरदस्त " मी उत्तर दिलं ".
मग काही दिवस ती गायब झाली.
अचानक काल सकाळी तिनं मैसेज बॉक्स मध्ये लिहलं "मी जळगावात आलेय . तुम्ही मला भेटणार का?
मी म्हणालो : जरूर भेटेन की.
"तर मग ठीक आहे फन सिनेमाला या. आपली भेटही होईल आणि राबता पिक्चर पण पाहणं होईल.
मी म्हणालो नको मॅडम तुम्हीच माझ्या घरी या. तुम्हाला भेटून माझ्या बायकोलाही आनंद होईल. माझ्या बायकोच्या हातचा स्वयंपाक सुद्घा चाखून बघा.
म्हणाली : नाही, मी तुमच्या मॅडमसमोर नाही येणार तुम्हाला यायचं तर या.
मी तिला माझ्या घरी बोलवायचा खूप प्रयत्न केला. पण ती सारखं सारखं फन सिनेमाला यायचाच हट्ट करत राहीली व मी माझ्या घरी.
ती चिडली व म्हणाली : ठीक आहे मी परत जाते आहे. तुम्ही भेकड घरातच बसा.
मी तिला परत समजावयचा बराच प्रयत्न केला आणि सार्वजनिक ठिकाणी भेटायचे धोकेही सांगितले पण तिनं ऐकलं नाही.
शेवटी हार मानून मी म्हणालो: मला भेटायचं तर माझ्या कुटुंबियांसमोर भेट अन्यथा घरी जा.
ती ऑफलाइन झाली. सायंकाळी घरी पोहचलो तर डायनिंग टेबलावर भन्नाट अशी मटन करी बनवून तयार होती.
मी बायकोला विचारलं: आज कोणी येतं आहे का आपल्या घरी जेवायला?
बायको म्हणाली: प्रिया जोशी येतेय.
काय?
ती तिला कुठं भेटली? तू तिला कसं ओळखतेस?
"जरा धीर धरा साहेब, ती मीच होते. तुम्ही माझ्या गुप्तहेरी मिशनच्या परिक्षेत पास झालात. यावं माझे खरे जोडीदार माझे सच्चे जीवनसाथी जेवण थंड होतंय.
-चान्स मिळाल्यावर बायकोचा मोबाईल चेक केला नसता तर आज ही पोस्ट करायच्या लायक राहीलो नसतो राव .
😃😂😜
(मेन विल बी मेन)
प्रारब्धाचा हिशेब :
एक दिवस एक माणूस पूर्व सुचना न देता कामावर गेला नाही .
मालकाला वाटलं ह्याचा जर पगार वाढवला तर हा काम मन लावून करेल .....
म्हणून पुढच्या वेळेस मालकाने पगारा व्यतिरीक्त त्याला पैसे वाढीव दिले ......
तो काही बोलला नाही , त्याने चुपचाप मिळालेले पैसे ठेवून दिले .......
काही महिन्यानंतर परत तसच घडलं .... तो पुर्वसुचना न देता गैरहजर राहीला ...
मालकाला त्याचा खूप राग आला आणि त्याने विचार केला कि, याचा पगार वाढवून काय फायदा झाला ???
हा काही सुधारणार नाही .....
पुढच्या वेळेस मालकाने त्याला वाढवलेला पगार कमी करून त्याच्या हाती पगार दिला .....
त्याने कुठलीही तक्रार न करता चुपचाप पगार घेतला .....
मालकाला खूप आश्चर्य वाटलं .
अखेर न राहवून त्याने त्याला विचारलं , '' मागच्या वेळेस तू गैरहजर राहीलास तरी तुझा पगार वाढवला ....तेंव्हा सुद्धा तू काही बोलला नाहीस , आणि ह्या वेळेस सुद्धा तू न पूर्वसुचना गैरहजर राहीलास म्हणून तुझा वाढवलेला पगार कापला ....
तरीही तू काही बोलत नाही,,,, असं का ?????
त्यावर त्याने दिलेलं उत्तर विचार मनाला भिडणारं होतं ..
''तो म्हणला , मालक पहिल्या वेळी मी गैरहजर राहीलो त्यावेळी मला मुलगा झाला होता ...... तुम्ही माझा पगार वाढवलात तेंव्हा मी विचार केला , देवाने माझ्या मुलाचा पालनपोषणाचा हिस्सा पाठवला .......
दुस-यांदा जेंव्हा मी गैरहजर राहिलो तेंव्हा माझ्या आईचं निधन झाले होते आणि तुम्ही माझा वाढवलेला पगार कापलात ......
मी मनाशी विचार केला माझी आई तिचा वाटा तिच्या बरोबर घेऊन गेली .
मग मी ह्या पगाराबद्दल चिंता का करू ??
ज्याची जबाबदारी खुद्द देवाने घेतली आहे ........
तात्पर्य -
जिवनांत काय मिळवलसं आणि काय गमावलसं असं जर कुणा विचारलं तर ,
बेशक सांगा , जे गमावलं तो माझा अविचार होता आणि जे कमावलं ती सद्गुरू कृपा होती.
''खूप सुंदर नाते आहे माझ्यात व देवामध्ये ....''
''जास्त मी मागत नाही आणि कमी देव देत नाही .......
👍👌👌
यालाच प्रारब्ध म्हणतात.......
जिवन खुप सुदंर आहे आनंदाने जगा ....
एका मुलाची आई... मरण पावली. तर त्या मुलाच्या वडीलाने, मुलगा लहान असल्याकारणाने दुसर लग्न केल...
चार पाच महीन्या नंतर मुलगा आणी वडील फिरायला गेले, असताना वडीलांनी सहज प्रश्न केला....
👨🏻वडील: बाळा...! तुला तुझ्या मेलेल्या आईत👩🏻 आणी नविन आईत🙎🏻 काही फरक वाटतो का..?
👦🏻मुलगा: हो वाटतो ना...माझी मेलेली आई, खोटारडी होती...पण नविन आई एकदम खर बोलणारी आहे...जणु काही राजा हरीश्चन्द्राची नातेवाईक...
वडीलांना नवल वाटल...🤔 त्यानी विचारल
👨🏻वडील: कस...काय !
👦🏻मुलगा: माझी मेलेली आई.... म्हणायची जास्त खोड्या, मस्ती, धिगांणा करशील तर जेवायला मिळणार नाही...! लक्षात ठेव.
पण जेवणाची वेळ झाली की, मला गावभर फिरुन शोधायची... आणी जवळ बसवुन स्वताच्या हाताने जेवण भरवायची.....🍪🍲☺
"पण ही नवीन आई म्हणाली... जास्त मस्ती केलीस, तर जेवायला मिळणार नाही....आणी
खरोखर तिन दिवस झाले...! तिने मला जेवायला दिलं नाही...😔
हे सर्व ऐकुन वडीलांच्या डोळ्यात पाणी आल😢
👬*** मित्रांनो...***👭
👩🏻आई तेव्हा ही रडायची....😢 जेव्हा तिच बाळ पोटात लाथ मारायच...👶🏻
आई तेव्हा ही रडायची... जेव्हा तिच बाळ खाली पडायचा...
आणी...!
आई आज ही रडते.... कोणता तरी बाळ, तिला जेवायला देत नाही म्हणून.
माणुस मोठा होतो👨🏻 पैसा कमवतो...💶 पण थकुन घरी आला की....!😒
वडील विचारतात... किती कमवलस...?👨🏻
बायको विचारते...कीती वाचविलेत...?👸🏻
मुलगा विचारतो... काय आणल...?👱🏻
आणी आई विचारते...👩🏻
'सकाळ पासुन काही खाल्लस...?'🤔
आता मी सांगणार नाही की पोस्ट शेयर करा... अस
"माझे सर्व मित्र👬👭 आईवर प्रेम करतात...👩🏻😘 सांगायची गरज काय....?
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
I Love U Mom
😘😘😘