खाऊ गल्ली , गिरगावच्या खानावळी अन थाळ्या..

खाऊ गल्ली , गिरगावच्या खानावळी अन थाळ्या..
गिरगावात जाणं आता कमी झालंय. पूर्वी तीन वर्षं ऑफिस गिरगावात होतं, नंतर चार वर्षं लॅमिंग्टन रोडवर म्हणजे गिरगावच्या मागेच. पुढे २४वर्षं बोरीबंदरला तर अडीच वर्षं काळबादेवीत ऑफिस होतं. म्हणजे जवळपास ३५ वर्षं गिरगांवच्या परिसरात. त्यामुळे तिथल्या शाकाहारी व मांसाहारी रेस्टॉरंटची चव जणू पाठ झाली होती. राजा राममोहन रॉय रस्त्यावरचं व्हॉइस ऑफ इंडिया, पुढे श्रीराम बोर्डिंग, मॉडर्न लंच होम, ठाकुरद्वार नाक्यावरलं सत्कार, चिरा बाजारातलं चर्च रेस्टॉरंट, खत्तर आळीतलं मराठी खानावळ, अग्यारी लेनची मराठा खानावळ आणि नंतर सु्रू झालेली मालवणी स्वाद, सायबिणी गोमांतक अशी किती तरी. यात शाकाहारीचा उल्लेख केला तर आणखी ४० रेस्टॉरंटची नावं तरी लिहावी लागतील. तरीही अद्याप सु्रू असलेल्या चाफेकर, पणशीकर, कोल्हापुरी चिवडा, विनय, मनोहर, मेवाड, प्रकाश दुग्ध मंदिर, तांबे, न्यू आनंद भुवन, सेंट्रल लंच होम, राजा, बंद झालेले वीरकर, कोना, मॉडर्न आणि मांसाहारी अनंताश्रम, लीलाधर ही यादीही मोठी होईल. 
 गिरगाव चर्चच्या रांगेत पुढे असलेलं श्रीराम खूप जुनं आणि मासे खाणाऱ्याचं अत्यंत प्रिय व आवडतं ठिकाण. सर्व प्रकारचे मासे, त्यांचं कालवण वा तव्यावर तळलेले त्यांचे तुकडे तिथं मिळतात. जणू गोपी टॅंकचा मासळी बाजारच. कोळंबी, पापलेट,बांगडा, तिसऱ्या, रावस, जिताडा, जवळा, मोरी, माकूळ, सुरमई, हलवा, खेकडे अगदी सर्व. सर्वांचं कालवण एका प्रकारचं नसतं. त्यामुळे माशानुसार चव बदलते. मासे न खाणाऱ्यांसाठी चिकन आणि मटण यांचे असंख्य प्रकार यांच्या मेन्यूमध्ये आहेत. इथं जेवायला मांसाहारी लोकच येतात, पण त्यांच्यासोबत येणाऱ्या शाकाहारीसाठीही बरेच प्रकार आहेत.
 
 गिरगावात थाळी हा प्रकार लोकप्रिय. नव्या मांसाहारी रेस्टॉरंटपेक्षा श्रीराम बरंच स्वस्त आहे. चर्चच्या आधी नाक्यावर व्हॉइस ऑफ इंडिया हे मस्त आणि स्वस्त रेस्टॉरंट. अनेक मित्रांच्या सुलेमानी चहा पीत मैफली रंगण्याचं हे ठिकाण. इथलं मटण व चिकन अप्रतिम. फक्त तेल कमी असं सांगावं लागतं. अन्यथा मटण वा चिकन मसालामध्ये वर तवंग दिसू लागतो. ऑम्लेट पाव खाण्यासाठी येणाऱ्यांची संख्याही मोठी. काही जण इथं येऊन चमच्याने नुसती अंडा भुर्जीच खातात. त्याच्या शेजारीच शाकाहारी मंडळींसाठी मनोहर आहे. तिथली पाव भाजी खूप प्रसिद्ध. पाव भाजीसाठी ते जो चटणीसारखा मसाला तयार करतात, तो तर अप्रतिम. त्याच्या पलीकडे मेवाड हॉटेल. तिथं दुपार झाली की गरमागरम मिसळ आणि ताजे पाव खाण्यासाठी तिथं गर्दी असते. खिशात कमी पैसे असले की तेच आसरा. त्याच्यासमोर पारशाचं कॅफे डे ला पेक्स. ते खूपच शांत.
 चर्चच्या समोर मॉडर्न लंच होम. छोटंसं, पण जेवण उत्तम आणि दरही बऱ्यापैकी वाजवी. अनेक जण इथं सुरमई थाळी वा बोंबील थाळी मागवतात. काही जण फक्त मांदेली थाळीचे शौकीन. इथंही श्रीराम बोर्डिंगप्रमाणे समुद्रात सापडणारे सर्व जीव मिळतात. मटण थाळी, चिकन थाळीही आहे. थाळी घेणं परवडतं. तीन चार जण गेले तर माशांचे दोन प्रकार, एखादा चिकन वा आवडीनुसार मटणाचा प्रकार असले तर जिभेचे चोचले एकदम पूर्ण होतात. नीर डोसा व चिकन खूप मस्त. पंजाबी व चायनीज प्रकारही मिळतात. गिरगाव नाक्यावरली ही ठिकाणं विसरून चालतच नाही. चर्चकडून जगन्नाथ शंकर शेट मार्गावर काळबादेवीच्या दिशेला चालू लागलात की एक किलोमीटरवर नाथ माधव पथावर खत्तर गल्लीपाशी आहे मराठी खानावळ. इथलं जेवणही उत्तम. इथली जवळा भाजी, जवळा फ्राय, खेकडा मसाला, बांगडा, पापलेट, सुरमई असलेली त्यांच्या भाषेत ‘मच्छी कढी‘ खास. इथली चिकन वा मटणची बिर्याणी ही लखनवी किंवा हैदराबादी बिर्याणीपेक्षा पूर्ण वेगळी, तिखट. इथलं मटण, चिकन व वडे खूपच छान.

 शाकाहारी हवं असेल तर जगन्नाथ शंकर शेट रोडवर आसपास पणशीकर आणि कोल्हापुरी चिवडा आहे आणि ठाकुरद्वारात वैद्य वाडीत बी. तांबे यांचं सुजाता आहे. ठाकुरद्वारातच विनय हेल्थ होम. प्रचंड मेन्यू आहे तिथं. या चारही ठिकाणी मिळणारे वडा, पियुष, मिसळ साबुदाणा वडा हे चार पदार्थ मन तृप्त करतात. ठाकुरद्वारात, म्हणजे बॅ. बाबासाहेब जयकर मार्गावर शिरलात की लगेच डाव्या बाजूला आहे सत्कार रेस्टॉरंट. तेही अर्थातच मांसाहारी. मत्स्यप्रेमी मंडळींचं विशेष आवडतं. सत्कार नावाचं माशांसाठी प्रसिद्ध रेस्टॉरंट गोरेगाव पूर्वेला स्टेशनसमोर आहे. विलेपार्ले पूर्व, डोंबिवली पूर्व आणि अगदी ठाण्यातही सत्कार नावाची मांसाहारी रेस्टॉरंट्स आहेत. काही शाकाहारी सत्कारही आहेत. तर ठाकूरद्वारच्या सत्कारमध्ये चिकन व मटणाचे असंख्य प्रकार आहेत. अशा ठिकाणी मासे वा मटण, चिकन थाळी घेणंच परवडतं. शाकाहारी मंडळींसाठी काळ्या वाटाण्याची उसळ व अन्य अनेक प्रकारही आहेतच. पुढे काळबादेवीच्या दिशेने जाताना दादीशेठ अग्यारी लेनच्या परिसरात मराठा हॉटेल आहे. ते मांसाहारी जेवणासाठी प्रसिद्ध. कोळंबीची खिचडी, बोंबलाची भजी, वजडी यासह सर्व प्रकारचे मासे आणि चिकन व मटणाचे खूप प्रकार या मराठा हॉटेलमध्ये मिळतात. जवळच्या मांसाहारी रेस्टॉरंटपेक्षा इथले दर आणखी कमी आहेत आणि चव छान. इथंही वेगवेगळ्या माशांची थाळी तसंच मटण, चिकन व अंड्याची करी वा ऑम्लेट असलेली थाळी घेतली तर खूप स्वस्त पडतं. थाळी घेतली तर सुमारे अडीचशे/तीनशे रुपयांत दोघांचं जेवण होतं.

 त्याच परिसरात आहे सेंट फ्रांसिस झेविअर स्ट्रीट. त्या स्ट्रीटच्या तोंडावरच चर्च रेस्टॉरंट आहे. तिथं जवळच सेंट झेविअर चर्च असल्यानं रेस्टॉरंटच्या नावातही चर्च आलं आहे. बरंच जुनं रेस्टॉरंट. बाहेरून ते इराण्याचं असावं असं वाटतं. हेही सामान्यांना परवडणारं ठिकाणं. इथं जेवणात मासे आहेत.पण मटण, खिमा, मटण करी,सुकं मटण,चिकन व अंड्याचे अनेक प्रकार मिळतात. इथंही जेवण स्वस्तात होतं. लॅमिंग्टन म्हणजे भडकमकर मार्गावर असाल तर मांसाहारीसाठी अमृत पंजाब आणि शबनम रेस्टॉरंटला तर शाकाहारीसाठी घसीटाराम हलवाईला नक्की भेट द्यावी.
 गिरगाव परिसरात मासे, मटण, चिकन थाळी व पदार्थ देणारी बरीच रेस्टॉरंट होती. आता गिरगावातली मराठी लोकसंख्या कमी होत आहेत. शाकाहारी व जैन खाद्यपदार्थांचा प्रभाव वाढतोय. मरिन लाईन्स परिसरात गोवन ख्रिश्चनांची अनेक रेस्टॉरंट होती. तिथं विंदालू, सोर्पोतेल असे पोर्तुगीज गोवन पदार्थ मिळत. त्यातील काही शिल्लक आहेत. त्यांच्याविषयी पुन्हा कधी तरी.

#mumbai #girgaonkar

🔱🕉️श्री क्षेत्र कुणकेश्वरचा कळसाध्याय !

🔱🕉️श्री क्षेत्र कुणकेश्वरचा कळसाध्याय !

श्री क्षेत्र कुणकेश्वराचे महात्म्य हे पिढ्यानपिढ्या मागे जाऊन किंवा स्कंद आणि संगमेश्वर पुराणातून वाचून तुम्हाला नक्की पुण्यवान बनवेल, पण वर्तमानात जेव्हा निळ्याशार सागरांच्या लाटा किनाऱ्यावर धडकताना  शिव मंदिराच्या भव्य वास्तूतून जेव्हा  वाचायला घ्याल तेव्हा  त्या राजवैभवाचे गंडभेरुड तुम्हाला वर्तमानाच्या सामर्थ्याची ताकद देईल.. मला कुणकेश्वराच्या मंदिरावरचे गंडभेरुड प्रचंड ताकद देते.  हातापायाच्या नख्यात हत्ती सिंहाना चिरडुन धरणारा गरुड हे चित्रच ह्या शिवमंदिराच्या  अभेद्यतेची ताकद दर्शवणारे चित्र आहे.  कुणकेश्वर मंदिराचे स्थापत्य हे भारतातल्या मंदिर स्थापत्यातले अनोखे शिल्प आहे. ती भव्यतमता जशी पुराणाने आलीय तशीच ती स्वराज्यसंवर्धक इतिहासाने आलीय हे ही तेवढेच खरे आहे.

कोकणची दक्षिण काशी असा उल्लेख असलेल्या श्रीक्षेत्र कुणकेश्वरचा महाशिवरात्री उत्सव म्हणजे साक्षात कैलासाधिपती जगदअधिपती श्री शिवशंकराचा कोकण सोहळा.. कोकणातल्या आई सातेरीच्या वारुळ पेडाचे पावर्तीतत्व ,  कोकणच्या गणेशोत्सवाचे गणेशतत्व आणि कुणकेश्वराच्या शिवरात्र उत्सवाचे मिळून जे संपूर्ण शिवमहिम्न आहे तेच या लाल तांबड्या मातीचे वैभव आहे. तोच अंगारा आहे आणि तोच निळाईचा आसमंत आहे.

श्री कुणकेश्वर म्हणजे कोकणचा अधिपती.. अतिप्राचीन काळापासुन येथील कणकेच्या राईमध्ये वास्तव्य करुन असलेल्या शंभुमहादेवाची ही भुमी... कणकेच्या बनात असलेला ईश्वर म्हणजेच कुणकेश्वर. आणि देवाच्या नावावरुन गावाच्या नावालाही पुण्यपावनपणा लाभलेलं हे कुणकेश्वर गाव... ११ व्या शतकापासून कोकणचाच नाही तर वसुंधरेचा साज असेलेलं हे देखण शिवक्षेत्र अरबी समुद्राच्या काठी कैलासाची अनुभूती देत आजही आपल्या शिवभक्तांना वरद देत आहे.. 

साक्षात कुणकेश्वराचा अधिवास हा या कोकणच्या भुमीला शिवभूमी बनवत आहेच पण दैखण्या स्थापत्यकलेनं नटलेलं श्री क्षेत्र कुणकेश्वराचे मंदिर हे शिवशंभोसोबत शिवछत्रपतींच्या शिवभक्तींचीही गाथा सांगणारे आहे. असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वत कुणकेश्वर क्षेत्री भेट देऊन शिवशंभोची पुजा केली होती. शिवछत्रपतींच्या पश्चात स्वराज्य वाचवण्याच्या लढाईत श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिराने स्वराज्याला दिलेलं बळ हा एक काळाच्या पानात दडलेला इतिहास आहे. 

त्याकाळी छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळापैकी एक असणार्‍या नारो निळकंठ अमात्य यांच्या अधिपत्याखाली हा विजयदुर्गपासूनचा सागरी प्रदेश होता. नारो निळकंठांची श्री कुणकेश्वरावर अपार श्रद्धा होती. मुघल सल्तनतीपासून श्री कुणकेश्वराचे मंदिर वाचले पाहिजे यासाठी नारो निळकंठ यांनी प्रचंड सुरक्षा लावली होती. 
आणि त्याचवेळी  औरंगजेबाचा पुत्र शहाआलम हा घाट उतरुन या तळकोकणात आल्यामुळे आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी कुणकेश्वर मंदिर हे एक डोळ्यांत भरणारे मोठे तिर्थक्षेत्र होते. त्यामुळे कुणकेश्वर मंदिराला शहाआलम त्रास देईल अशी भिती नारो निळकंठांना वाटू लागली. 

नारोपंतांनी आपल्या आराध्य दैवताच्या रक्षणासाठी उपाययोजना सुरु केली. स्थानिक कुणकेश्वरांच्या ग्रामस्थांसोबत मराठा सैन्याने हिंदुच्या या पावनक्षेत्राच्या रक्षणाची जबाबदारी स्विकारली..  छोट्याश्या सैन्यबळासह नारो निळकंठ अमात्य यांनी  श्री क्षेत्र कुणकेश्वराच्या रक्षणासाठी छातीचा कोट केला .

पण तरिही शहाआलमची नजर कुणकेश्वर मंदिरावर पडली. त्याने कुणकेश्वर मंदिरावर जोरदार हल्ला चढविला. मंदिराभोवतीच्या तटबंदीच्या आधारे आपल्या तोकडया बळानिशी मराठयांनी कडवा प्रतिकार केला. पण शहा आलमचा तडाखा भारी पडला. पण लढाई स्वराज्याची होती आणि तीही श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिराच्या रक्षणाची होती.  मंदिरासभोवती थेट मैदानातल्या हाराकीरीमुळे शहाआलम मनात खुष होता. पण त्याचवेळी कुणकेश्वर मंदिराच्या कळसात आपला काळ बसलाय याची कल्पनाच शाह आलमला नव्हती.. त्याच कळसात लढवय्या मराठ्यांची एक तुकडी लपून बसली होती.. मुघल फौजेला काही कळण्याच्या आत कळसातून जयभवानी जयघोष करत नारोपंतांनी कळसातील गुप्त जागेतून बाहेर उडी मारत तलवार उपसली.. स्वताच्याच गुर्मीत असलेल्या मुघल सैन्याला कळसातून हर हर महादेवाच्या जयघोषात तलवारी खणाणल्या.. मोगल सैन्यावर मराठे तुटुन पडले.. मराठ्यांचा रौद्रअवतार पाहून मुघल सैन्य पळून गेले.. त्या कळसातून तलवारीच्या रुपातून जणू त्रिशूळ रोखले गेले.. मराठ्याच्या इतिहासात कुणकेश्वर मंदिराच्या कळसातील लढाई म्हणजे कळसाध्याय आहे.  स्वराज्यसंघर्षातला मंदिराच्या कळसातला हा गनिमी कावा मुघलांना धडकी भरवणारा होता. 

या लढाईने शिकवलेला धर्म हा हृद्याला स्पर्शणारा आहे. मुघल सैन्याने मंदिर परिसरातही बरेच नुकसान झाले होते. जीवापाड जपलेल्या एकीकडे  माझ्या कुणकेश्वर मंदिरासमोर धर्मविरोधी कारवायांवर विजय होत होता आणि दुसरीकडे माझ्या मंदिरावर झालेला हल्ला याचे दुख नारो निळकंठ अमात्य यांना सहन झाले नाही आणि मंदिराशेजारच्या विहीरीत शिवशंभो म्हणत आत्मार्पण केले.. आजही नारो निळकंठ अमात्य यांची समाधी कुणकेश्वर मंदिर परिसरात त्याची साक्ष देत आहे.  आजही  कुणकेश्वरच्या पालखीच्या वेळी म्हटली जाणारी आरती ही अमात्य नारोपंतानीच लिहीलेली आहे. या आरतीतही नारोपंडितांच्या उडीचा स्पष्ट उल्लेख आहे.

आज हिंदु धर्म रक्षणाच्या लढ्यात अनेक योद्ध्यांचा उल्लेख करण्यात येतो. पण कुणकेश्वर मंदिर कळसात लपलेल्या मराठा योद्ध्यांचा उल्लेख म्हणजे कुणकेश्वरची एक विजयगाथा आहे, आणि हीच विजयगाथा महाशिवरात्रीच्या निमित्ताने आज स्मरण कऱण्याची वेळ आली आहे. 

ओम नमो पार्वतीपते हर हर महादेव 

#shivshankar #mahashivratri #mahadev 
#mahakal #shivratri

Mumbai Goa Highway

मुंबई गोवा महामार्गावर प्रवास करताना कोठे काय काय खरेदी कराल ?

#इंदापूर •
गावठी पोहे, तांदूळ, वेलवांगी.

#पेण •
गावामध्ये झिंगा (कोळंबी) भाकरी, कलिंगड, पांढऱ्या कांद्याच्या माळा, पोहे मिरगुंड, पापड.

#महाड •
वटवाघूळ तेल (वातनाशक)

#चिपळूण •
जेवण (अभिषेक हॉटेल)

#परशुराम घाट •
जेवण (हॉटेल ओमेगा)

#निवळी घाट •
जेवण (ग्रीन पार्क हॉटेल)

#संगमेश्वर
मोहनथाळ (संगमेश्वरी खाजा)

#हातखंबा •
HP पंपावर गद्रे यांची बेस्ट फ्रोझन फिश प्रॉडक्टस व मॉलमध्ये शॉपींग.

#लांजा •
व्हेज नॉनव्हेज जेवण, सरसचे शेंगदाणा लाडू व इतर उत्पादने.

#राजापूर •
ठाकूर बेकर्सची स्पेशल नान-कटाई व इतर बेकरी प्रॉडक्टस.

#म्हापसा •
म्हापशाच्या बाजारात
मडक्यात मिळणारी हुर्राक, फेणी, काजूगर,

#सावंतवाडी •
माशांचे जेवण, ताजा मालवणी खाजा, शोभेची फळे. सकाळी सुरंगीचे गजरे, स्थानिक भाजी, आबोलीचे वळेसर, नारळ.

#कणकवली •
सकाळी ताजे मासे, ब्रेकफास्ट, मालवणी खाजा व खडके लाडू.

अजून काही माहिती असेल तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा.

📸_____ Mumbai Goa Highway 

रत्नागिरीकर

*रत्नागिरीत* राहण्यासारखे दुसरे-तिसरे सुख नाही!! 
उशिरा उठायचं स्वत:ची गाडी काढायची कामावर जायचं आणि वेळेत घरी यायचं. ना लाईनमध्ये उभे राहणे, ना बसची वाट पाहण्याची गरज. सुट्टीच्या दिवशी *आस्वाद* ची किंवा *मंदार* ची *मिसळ* आणी *सलगर* च्या *चहा* ची चव घ्यायची, स्टँड समोरच्या *गणेश हॉटेल* ची *कुर्मापुरी* खायची, दुपारी *मांडवीत मसाला किचन* हॉटेल मध्ये *पापलेट* वर ताव मारायचा.
संध्याकाळी *छाया हॉटेल* च्या *पॅटीसची* व *टॉकीजवरील शिवलकर यांच्या वडापाव* ची चवच न्यारी.
पावसामुळे उशीर होईल का? घरी परत कधी पोहचू? याची चिंता सोडाच...
प्रत्येक सणाला प्रत्येक छोटया मोठया कार्यक्रमांना हजेरी तसेच गावातल्या घराघरांत भेट देणे.

कधी *गणपतीपूळेचा* बीच
कधी *भाट्ये* बीच
तर कधी *आरे वारे* बीच
कधी *मिऱ्या बंदर* 
तर कधी *पावस चे स्वरूपानंद मंदिर*
कधी *मार्लेश्वर चे प्रसिद्ध स्वयंभू शिवमंदिर व निसर्गरम्य धबधबा* तर *हातीस चे*पीर बाबरशेख मंदिर*
कधी *देवी जखदेवी मंदिर*
 *कसब्याचे कर्णेश्वर मंदिर*
व *छत्रपती संभाजी स्मारक* कधी *राजवाडी व आरवली* येथील *गरम पाण्याची कुंडे* पावसाळ्यात *सप्तेश्वर* ला भेट देण्याची मजा काही औरच तसेच आजुबाजूस ऐतिहासिक प्राप्ती लाभलेले *प्रचितगड, भवानगड व रत्नदुर्ग* आहेतच
पावसाळी सर्व हिरवगार     
हिवाळयात गुलाबी थंडी
पावसाळ्यात खूप पाऊस
उन्हाळ्यात सौम्य उन्हाळा सारंच न्यार.....

*"रत्नागिरीकर"* होण्यात जी मजा आहे, ती दुस-या कशात खरच नाही!

माहिती साभार ✍🏻 ___
#कोकणचीमाणसंसंधीभोळी 
#कोकणसुख 
#villagelife 
#villagelifestyle 
#villagefood 

ओल्या_काजूगराची_भाजी

🍲🥗#ओल्या_काजूगराची_भाजी 😋👌
      हापूस आंब्याप्रमाणेच अगदी वर्षभर ज्याची वाट पाहतो ते म्हणजे #ओले_काजूगर.......हे ओले काजू साधारणपणे उन्हाळ्याची चाहूल लागताच तसेच मार्चच्या सुरुवातीला जागोजागी दिसायला सुरवात होते. आमच्याकडे ओले काजू म्हणजे अगदी जीव की प्राण.....काजीच्या चिकाने हाताची सालं निघाली तरी......

खरं तर या ओल्या काजुगराची भाजी करणं ज्या आद्य कोकणी रानधपिणीला सुचलं असेल तिला सलामच ठोकला पाहिजे. ती आज नुसत्या भारतातली नाही तर जगातली#मिशेलन_स्टारची (Michelin star chef) मानकरी ठरली असती यात नवल नाही. कारण काजूचे उत्पादन हे जगभर होत असले तरी भाजी ही फक्त भारतात आणि विशेषतः कोकणपट्ट्यातच बनते.

ओल्या बियातून तयार झालेले आणि तरीही कोणके नसलेले हे ओले गर काढणे हे मुळात जिकिरीचं काम. प्रत्येक बी दाबून ती किती घट्ट लागतेय ते ओळखून बिया तोडणं. त्या दुष्ट चिकपासून सोडवून बियांमधून गर काढून सोलुन घेणं बिल्कुल सोपं नाही. तरीही ते करून त्यात वेगवेगळे मसाले घालून ती भाजी सिद्ध करणं हेही कठीण काम. ही सिद्ध झालेली भाजी ताटात आल्यावर चवीने खाणं मात्र अगदीच सोप आणि अगदी नशीबवान लोकांना जमणारी गोष्ट..

Village

अश्या घरात राहायचं सुख काही वेगळाच असतं ना आणि ते अनुभवण्यासाठी आपली घरे,गावे जमिनी ह्या जपून ठेवायलाच पाहिजेत.
(शहरीकरणाचा वेग कोकणातही झपाट्याने वाढतोय)

#savekokan 
#villagelifestyle 
#villagelife 
#village

मतदार

एके दिवशी हिटलर एक कोंबडं घेऊन मंत्रीमंडळाच्या बैठकीत आला. कोंबड्याचं मुंडकं हिटलरने आपल्या बगलेत दाबून धरले होते. आणि तो चालत चालत त्या कोंबड्याचे एक एक पंख उपसून काढत होता. कोंबडा जीवाच्या आकांताने ओरडत होता. तो हिटलरच्या बगलेतून सुटका करू पाहत होता. पण हिटलर त्याला न सोडता त्याच्या ओरडण्याकडे लक्ष न देता पंख उपसत होता. मत्रीमंडळातील सदस्य हिटलरला म्हणत होते, "त्या मुक्या प्राण्याला असा त्रास देऊ नका. सोडा त्याला." पण हिटलर कोणाचेही ऐकायला तयार नव्हता. शेवटी सर्व पंख उपसून झाल्यावर त्याने त्या कोंबड्याला खाली फेकले. आणि खिशातून काही दाणे काढून, तो कोंबड्याला खाऊ घालू लागला. अशा अवस्थेत कोंबडा ते दाणे खाण्यासाठी पुन्हा हिटलरच्या हाताकडे बघू लागला. 
हिटलर देखील त्याला दाणे खाण्यासाठी जवळ बोलावू लागला. आणि थोड्या वेळाने ते थोडे फार दाणे खाण्यासाठी तो कोंबडा हिटलर जवळ येऊन बसला. इतका वेळ जो कोंबडा हिटलर पासून सुटका करून घेत होता, तोच कोंबडा चार दाण्यासाठी हिटलर च्या पुन्हा जवळ बसला. मंत्रीमंडळातील सर्व लोक त्याला म्हणाले की, "हा काय प्रकार आहे ?" त्यावर हिटलर म्हणाला, "मतदार हे असेच असतात. साडेचार वर्ष आपण त्यांचे पंख उपसायचे असतात. आणि शेवटी सहा महिन्यांत त्यांना चार दाणे टाकायचे असतात. या चार दाण्याच्या नादात हे मतदार, साडेचार वर्षांत आपण केलेले सर्व अन्याय विसरून जातात. आणि आपल्यालाच मतदान करतात."

मधु दंडवते कोकण

मधु दंडवते कोकण - राजापूर मतदारसंघातून सलग पाच वेळा लोकसभा खासदार म्हणून निवडले गेले. दंडवते मोरारजी देसाई यांच्या पंतप्रधानकाळात रेल्वेमंत्री होते.  
कोकण रेल्वे त्यांनीच सुरु केली.

#मधु_दंडवते #आणि #कोकण_कन्या... 🚆
ज्यांच्या अथक प्रयत्नाने काेकण रेल्वे धावू लागली त्या माजी संसद सदस्य मधू दंडवते यांच्या स्मृतीस सादर प्रणाम (जन्म-२१ जाने.१९२४)
     १०१११ कोकणकन्या एक्सप्रेस पुढील 
थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर येत आहे  
प्रत्येक कोकणी माणसाच्या चेहऱ्यावर आनंद 
आणणारी ही ...... अनौन्समेंट !!!!!

पहिली ऐकू आली ती २० जानेवारी १९९७ रोजी ...
आज आमच्या ह्या लाडक्या राणीच्या 
सेवेला २९ वर्ष पूर्ण होत आहेत.

आमच्यासाठी ही ट्रेन नव्हे ....... गावाशी जुळलेली नाळ आहे .......

खरंच खूप अभिमान आहे ह्या गाडीचा .....
कोकण रेल्वेचे खूप खूप आभार .......
आणि अभिनंदन सुद्धा ....

 "कोकण रेल्वेचे शिल्पकार" प्रा. श्री .मधु दंडवते यांना जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन...!!!🙏💐
--२१ जानेवारी.

#kokandiaries #KonkanRailway 

Shrungarpur

#श्रुंगारपुर
  1995 साली बाबांची बदली #देवरुखला होऊन  माझा श्रुंगारपुरशी संपर्क जरी तुटला असला तरी त्या गावाशी नाते गेली 25-30 वर्षे अजुन #टीकुन आहे.
आयुष्याची सुरुवात,माझे बालपण,पहिले पाऊल,पहिला शब्द,पहिली शाळा,पहिला मित्र,पहिला खेळ,मासे पकडण्याची कला,भजनाची आवड, गावची ओढ आणि माणुस जोडण्याचे #संस्कार माझ्यावर याच #गावात झाले ते ही खोलवर.
       वयाची 6 वर्षे पुर्ण झाल्यावर शाळेत प्रवेश मिळतो पण मी अडीच वर्षाचा असल्यापासुनच शाळेत जावुन बसत असे,त्यानंतर पहीली आणि दुसरी ला तर मी कधीच #चालत घरी नाही गेलो वरच्या वर्गातील मुले मला कांदे-बटाटे (म्हणजेच पाठीवर उचलुन)घ्यायचे एकाकडे बॅग तर एकाकडे चप्पल असायची, गुरुजींचा मुलगा म्हणुन माझा थाट वेगळाच असायचा.सातवीतल्या मुलांसोबत पाण्यातुन #पार्लेजी खायची मज्जा,त्यांच्या डब्यातला #फोडणीचा_भात मी आयुष्यात विसरु शकणार नाही.
        बामन नदीला लागुन 10-15 फुटावर आमचं घर पावसाळ्यातुन  पुराच्या वेळेला येणारे #दगडांचे आवाज आजही कधी-कधी कानात वाजतात.
      बाबा कामानिमित्त बाहेर गेले की मी दिवसभर नदीत मासे पकडत बसायचो,त्यात काठीला गांडुळ बांधुन शिट्टी वाजवत #मासे_पकडायचो,पोहायला लवकर शिकायला यावे म्हणुन कोणाच्यातरी सांगण्यावरून जीवंत #रतवा (छोटा मासा)पण बर्याच वेळेला खाल्ल्या आहेत.
             नदीशी संबंधित माझी गोड आठवण म्हणजे नदी आटली की कातळाजवळ एक डोह होता त्याच्या वरच्या बाजुला शेतीच्या मळ्या होत्या त्या ठीकाणी आम्ही थोडीशी  #कोथींबीर रूजवायचो आणि ज्या दिवशी ती तयार होईल त्या दिवशी नदीच्या त्या डोहातील संपुर्ण पाणी ताटलीने उपसुन त्यातील #मासे पकडायचो आणि त्या कोथिंबीर सोबत शिजवुन त्या शेतातच पार्टी करायचो.काय सुख होतं त्यात,एकदम भारी.
          खेळ पण त्यावेळी खुप मजेदार होते #लगोरी आणि #विटीदांडु  हे त्यात माझे खुप आवडीचे ,नदिपलिकडे खेळत असलेल्या त्या विटीदांडुच्या कावडीतील "कुत्ती कवाडी" मी एकटा असलो की आजही म्हणतो पण त्या शब्दाचा अर्थ आजपर्यंत काही मला कळलेला नाही.
        शेजारील #बारक्या जो  माझ्यापेक्षा  10 वर्षांनी मोठा होता तो आमचा त्यावेळचा ग्रुप लिडर होता त्या सोबत च्या आठवणी म्हणजे आमच्या #पार्टी असायच्या त्याही कसल्या..?? चहा बटर,चहा बिस्कीट स्पाँन्सर नेहमी बारक्याच असायचा. गुढीपाडव्याला आमच्या जाधव वाडीतील प्रत्येक घराची गुढी आम्ही उतरवायचो मग प्रत्येक घरातुन 2-3 रुपये मिळायचे मग आम्ही त्याचा रवा आणायचो आणि #शिरा करुन जंगी पार्टी करायचो.
         मी 5-6 वर्षाचा होतो असेन तेंव्हा बारक्या आणि आम्ही बिझनेस पण करायचो #निकमांच्या दुकानावरून गुळाच्या चिक्क्या,चणे,शेंगदाणे,दगडीगोळी विकत आणायचो आणि बारक्याच्या एका ओपन खिडकीत #दुकान मांडायचो आणि आणलेल्या कीमतीतच ते आम्हीच विकत घ्यायचो😂😂
पण देवदिवाळीच्या जत्रेत आमची उलाढाल मोठी असायची बारक्याच दुकान असायच त्यात तो पपनीसच्या शेडी,ताक आणि त्याच्या घरी लागलेली म्हैस-केळी विकायचा मी त्याच्या सोबतच असायचो या सगळ्यात मला एक वेगळीच #मज्जा यायची जी मी आजही miss करतो.
       सणाला सुट्टी पडायची आणि आम्ही गावाला यायचो पण सुट्टी संपुन परत श्रुंगारपुरला कधी जातोय असच नेहमी व्हायचं.
     श्रुंगारपुरचे सण ही त्यावेळी दिमाखात व्हायचे मग तो शिमगा असो,दहीहंडी असो की #देवदिवाळी .त्यात शिमगा म्हणजे वेगळीच मज्जा आमच्या जाधव वाडीची छोटी होळी उभी रहायची मग शेवर तोडुन आणणे ,ती उभी करणे यात मी सहभागी असायचो  आमचा #नाना मग माझ्यासाठी रात्री वाजविण्यासाठी #आमट्या घेवुन यायचा,आणि मग आठ दिवस खेळणे आणि फाक पाडणे यात नुसती धम्माल यायची.
      आमचे दादा-वहीनी म्हणजेच सख्खे आजी-आजोबाही मागे पडतील असे प्रेम त्यांनी आम्हाला दिलं आणि त्यांच्यामुळेच आजपर्यंत माझी एक नाळ या गावाशी बांधुन राहीली.मला ते घर आजही माझं दुसरं मुळ घर किंवा दुसरं आजोळ वाटतं त्यांची मुलं नाना,रवी दादा, वंदुताई आजही मला #भावंडासारखीच वाटतात आणि आहेत कारण तेवढं प्रेम आम्हाला त्या घरातुन मिळालं आणि अशी खुप घरं या श्रुंगारपुरात आहेत जी आपलीशी वाटतात,मग ते #सुभेदारांचे घर असो,#आनंद दादाचे असो.
कोणीतरी #रक्ताची नातीच तिथे आहेत असेच सतत भासत असते...
       गाव #सोडतांनाचा तो क्षण आजही माझ्या डोळ्यासमोर आहे  जवळ-जवळ  संपुर्ण गावच आम्हाला निरोप देण्यासाठी स्टॉपवरती आला होता,त्यानंतर मला आजही आठवतंय जवळ-जवळ चार महिने नवीन शाळेत मी गेलोच नव्हतो,गावातुन #शहरात तर आलो होतो पण जे #सुख_समाधान श्रुंगारपुरने दिले ते कुठेच मिळाले नाही.
         आजही माझं #क्लिनीक ज्या #मारळ #बामणोली गावात आहे ती गावे निवडण्याचं श्रेयंच श्रुंगारपुरला जातं कारण या तिन्ही गावांची #ठेवण एकसमान  गावच्या मधोमध नदी,चारही बाजुन #सह्याद्री आणि तीच माणसांची ठेवण त्यामुळे मी अजुनही श्रुंगारपुरात असल्याचे बर्याच वेळा भासते.
    लहानपणी शाळेत असतांना आम्ही गावावरती निबंध लिहायचो-
      चारही बाजुंनी निसर्ग सौंदर्याने श्रुंगारलेले असे माझे श्रुंगारपुर😘😘😘

डॉ सुशील भालेकर

स्वर्ग आणि नरक

एकदा एक संत देवाबरोबर बोलत होता.

त्याने देवाला स्वर्ग आणि नरक मधला फरक विचारला.

“ये तुला प्रत्यक्ष दाखवतो.”
देव म्हणाला.

त्याने संताला दोन दरवाजांजवळ नेलं.

त्याने पहिला दरवाजा ढकलला.एका मोठ्या खोलीत प्रवेश केला.

एका मोठ्या गोल टेबलाभोवती अनेक माणसे बसली होती.

टेबलाच्या मध्यावर रुचकर खिरीने भरलेले मोठे भांडे ठेवलेलं होतं.

त्या खिरीच्या सुगंधाने त्या संत माणसाच्या तोंडाला देखील पाणी सुटलं होतं.

पण मग त्याच्या लक्षात आलं की ती माणसे उपाशी भुकेलेली दिसत होती.
त्यांच्या हाताला लांब दांड्यांचे चमचे बांधलेले होते.

त्यांना हात लांब करून खीर खाता येत नव्हती.

कारण चमच्याचा दांडा हातापेक्षा लांब होता
चमचा तोंडा पर्यंत पोहचतच नव्हता
त्यांच्या यातनांना अंत नव्हता.

भुकेच्या भरीला खिरीच्या सुवासाने त्यांना वेड लावले होते.

“हा नरक आहे...”देव म्हणाला.

“चल आता स्वर्ग पाहू.

”ते दुस-या दारातून आत आले.

ती खोली सुद्धा हुबेहूब पहिल्या खोली सारखीच होती.

तेच टेबल तेच खिरीचं भांडं.

भोवताली माणसं आणि हाताला बांधलेले चमचे.

पण ही सगळी माणसे तृप्त
समाधानी व आनंदी दिसत होती.

आपापसात हसत आनंदाने राहत होती.

“मला कळत नाहीये”
संत म्हणाला,”सारख्याच खोल्या,टेबल,भांडी,खीर आणि तेच लांब दांड्यांचे चमचे,मग ही माणसे खाऊन तृप्त आणि ती उपाशी आणि दु:खी का??

“सोपं आहे...”देव म्हणाला
" लांब दांड्याच्या चमच्याने स्वतः खाता आले नाही तरी दुसऱ्याला भरवता येते
या खोलीतील माणसे एकमेकांना भरवायला शिकली आहेत "

हावरट मनुष्य फक्त स्वत:चा विचार करतो”

जेव्हा तुम्ही दुस-याला त्यांची इच्छा पूर्ण करायला मदत कराल तेव्हा आपोआपच तुमची स्वप्ने सुद्धा पूर्ण होतील...
सुंदर बोधकथा ....

Marathi Attitude Sms

"कोणी ढकलुन देईपर्यंत कोणाच्याही दारात🚪 उभे राहु नका.

"मान-सन्मान 🙏🏻त्यांचाच करा......, जे तुम्हाला बरोबरीने सोबत👫👬 घेऊन चालतील.......!😉

चांगल्या लोकांची सोबत

लोक म्हणतात, पैसे जवळ ठेवा, वाईट वेळेत कामाला येईल.

आम्ही म्हणतो चांगल्या लोकांच्या सोबतीत रहा, वाईट वेळच नाही येणार.

कुणी लिहिले माहित नाही पण छान लिहिले एकदा अवश्य वाचुन पहा

"शब्द" बदलला की "अर्थ"
 बदलतो...😂

गरिब माणुस *दारु* पितो.
मध्यमवर्गीय *मद्यपान* करतो..
तर, श्रीमंत लोक *Drink's* घेतात...

काम केल्यावर गरिबाला *मजुरी* मिळते.
काम केल्यावर मध्यमवर्गीयाला *पगार* मिळतो..तर, काम केल्यावर आॅफिसरला *Salary* मिळते...

गरिब करतो ते *लफडं*.
मध्यमवर्गीय करतो ते *प्रेम*..
तर, श्रीमंत करतो ते *Affair*...

शब्दाबरोबर शब्द मांडला की *कविता* होते
शब्दाने शब्द वाढला की *भांडण* होते..
शब्दाने शब्द वाढत गेला की लेखकाची *Royalty* वाढते...

पैशाने गरिब असलात तरी चालेल पण , मनाने श्रीमंत रहा कारण गरिबाच्या घरावर लिहीलेलं असतं *" सुस्वागतम् " !*
आणि, श्रीमंताच्या घराबाहेर लिहीलेलं असतं *" कुत्र्यापासून सावधान " !!*

आयुष्य आईसक्रीम सारखं आहे, *"Test"* केलं तरी वितळतं आणि, *"West"* केलं तरी वितळतं..

*काही राहिलं तर नाही ना !!!*

🌀*जीवनामध्ये तुम्ही खूप काही मिळवलं असलं तरी आयुष्याच्या प्रत्येक *टप्प्यावर पुढे जात असताना नेहमी हा प्रश्न सर्वांनाच पडतो...*
*"काही राहिलं तर नाही ना?”*

🌀*वर्षभराच्या पोराला बाईच्या हवाली टाकून जॉबसाठी जाण्याऱ्या आईला ती बाई जेव्हा विचारते*
*"पर्स, चावी घेतली ना, काही राहिलं तर नाही ना?”*
*ती आई कशी सांगेल कि ज्याच्या भविष्यासाठी एवढा आटापिटा चालू आहे तोच तर राहिला !!!*

🌀*खूप आशेने आईबापाने पोराला शिकविले. पोरगा परदेशात सेटल झाला. नातू जन्मला म्हणून आजी आजोबा टूरिस्ट विसावर गेले. ३ महिने झाल्यावर निघताना पोरगा सहजच बोलून गेला*
*"सगळ चेक करून घ्या, काही राहिलं तर नाही ना?”*
*काय उत्तर द्यावे त्या म्हातार्यांना कळेना कारण “आता मागे राहायला शिल्लक तरी काय आहे”*

🌀*लग्न होऊन पोरगी वरातीसोबत निघून गेली तेव्हा बापाला आत्या विचारते*
*“दादा, पोरगी काही विसरली नाही ना रे, काही राहिलं तर नाही ना?”*
*भूतकाळात गेलेल्या त्या बापाला पोरीच्या रूम मध्ये सुकलेली फुले दिसतात.*
*अश्रू लपवत लपवत बाप बोलला “ती गेली पण आठवणी इथेच राहिल्या, दुसरे काय राहणार”*

🌀*६० वर्षे वय झाल्यावर आज साहेबाचा ऑफिसमध्ये शेवटचा दिवस होता. चपरासी बोलला* 
*"साहेब, काही राहिलं तर नाही ना?”*
*साहेबानी डोळे बंद केले तर लक्षात* *आले कि पूर्ण आयुष्य या* *जागी काम करण्यात केले. सगळ्च* *इथे आहे मग “मागे काय राहणार”* 

🌀*स्मशानात आईच्या चितेला अग्नी देऊन बाहेर पडलेल्या पोराला मित्र विचारतो*
*“मित्रा, काही राहिलं तर नाही ना?”*
*तो धावत धावत परत अग्नीजवळ गेला. आईचा चेहरा पाहण्यासाठी केलेला प्रयत्न अयशस्वी झाला.* 
*त्याला उमजेना कि काय राहून गेले. डोळे पुसत पुसत तो म्हणाला “काही नाही रे, जे राहिले ते आता सदा स्मरणात राहील”*

🌀*एकदा तरी वेळ काढून मागे बघा. जुन्या आठवणी ताज्या करा. डोळे भरून येईल. मन प्रफुल्लित होईल आणि आत्ताचा हा क्षण जगण्याची नवी उमेद मिळेल. मग कधीही काहीच मागे राहणार नाही. .....  

👏👏👏

चिमणी आणि कावळा

. 👇 *लहानपणीची अर्धी राहिलेली गोष्ट पुर्णपणे वाचा*👇
*(खरोखर सकारात्मकतेचे अप्रतिम उदाहरण आहे)*

एक होती चिमणी आणि एक होता कावळा. 

चिमणीचं घर होत मेणाच, याउलट कावळयाचं घर शेणाचं होतं. 

एक दिवस काय झालं आकाशात मोठे मोठे काळे ढग आले. सोसाटयाचा वारा सुटला. टप् टप् पाऊस पडू लागला. 

झाडे भिजली. जमिनीवरून धो धो पाणी वहायला लागलं. 

कावळयाच घर होत शेणाच, ते गेले पाण्यात वाहून, कावळा काकडला. आता कुठे जाव बर? एवढयात त्याला आठवलं, 

चिमणीच घर आहे शेजारीच. मग कावळा आला चिमणीकडे. 

पण चिमणीच्या घराचे दार तर बंद होते. 'चिऊताई, चिऊताई, दार उघड !' 

चिमणी आतून म्हणाली 'थांब माझ्या बाळाला काजळ-पावडर लावते'

 थोडावेळ थांबून पुन्हा कावळयाने कडी वाजवली 'चिऊताई, चिऊताई, दार उघड !' 

चिमणी आतून म्हणाली 'थांब माझ्या बाळाला झोपवते' इकडे कावळयाला खूप भूक लागली होती. 

पण सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. काय करतो बिचारा! एवढंस तोंड करून कुडकुडत उभा राहिला पण चिमणीने काही केल्या दार उघडले नाही.

👉 *गोष्टीचा पुर्ण केलेला उत्तरार्ध -* 

      चिमणीचे सगळे काम आटोपले
ती जरा निवांत झाली आणि तेव्हा तिच्या लक्षात आलं की, 

अरेच्च्या! आपण अजून कावळ्यासाठी दारच उघडलेलं नाही. 

तिला विलक्षण अपराधी वाटलं. 

तिनं बंद दारामागचा कानोसा घेतला. दाराबाहेर शांतता होती. 

ती शांतता चिमणीला असह्य झाली. तिनं तत्परतेनं दार उघडलं. दाराबाहेर कावळा नव्हता. तिने आजू बाजूला फिरून पाहिलं, कावळा कुठेही नव्हता.

'गेला असेल कुठेतरी... येईल परत' 

…. तिने स्वत:च्या मनाची समजूत काढली. 

मात्र, रात्र मावळली... दिवस उगवला, संध्याकाळ झाली आणि परत रात्र आली तरी कावळ्याचा काही पत्ताच नव्हता. 

चिमणीचं मन आज कशातच रमेना … बाळाला न्हाऊ घालण्यातही नाही आणि बाळाला गंध-पावडर करण्यातही नाही … 

कारण एव्हाना तिला सवय झाली होती …. कावळ्याने बंद दारावर केलेल्या टकटकीची …… 

तो आवाज असा काही कानात साठला होता की दिवसातून अनेक वेळा तिने दारावर टकटक झालीय असं समजून दार उघडलं होतं आणि बाहेर कोणी नाही हे पाहून निराशेने बंद केलं होतं... 

अनेक दिवस उलटले ...

चिमणीच्या मनातून काही कावळा जाईना. 

मग तिने कावळ्याचा शोध घ्यायचाच असं ठरवून घरट्याबाहेर पाऊल ठेवलं. मजल दरमजल करत फिरताना थकून एका झाडाच्या फांदीवर विश्रांती घेण्यासाठी ती थांबली. 

एवढ्यात त्याच झाडाच्या दुसऱ्या फांदीवरून चिरपरिचित आवाज तिच्या कानावर पडला... 

तो 'कावळ्याचा' आवाज होता. तो आवाज ऐकून चिमणीला काय आनंद झाला. सारा थकवा, सारा शीण कुठल्या कुठे पळाला. 

तिने मोठ्या उत्साहाने त्या फांदीच्या दिशेने झेप घेतली. पहाते तर काय! 

कावळा आपल्या घरट्यात आपल्या पिल्लांसोबत आनंदाने मौज मस्ती करत होता. 

कावळ्याचं लक्ष चिमणीकडे गेलं. चिमणीला पाहून त्याला फार आनंद झाला. तो आनंदाने म्हणाला, 

'या या चिमणाबाई. तुमचं स्वागत आहे आमच्या घरट्यात. तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. बोला, काय करू तुमच्यासाठी?' 

कावळ्याचं ते अगत्य पाहून चिमणी खूप ओशाळली. म्हणाली,
- 'तुला राग नाही आला माझा?'

- का यावा? 

- मी माझ्यात विश्वात गुंग होते म्हणून?

- छे छे! प्रत्येकाचं आपलं असं स्वतंत्र विश्व असतं.. जसं तुझं होतं. 

तुला त्यात माझी गरज कधीच नव्हती 

माझी ती गरज होती म्हणून मी तुझ्या दाराशी आलो. पण नंतर मला माझी चूक कळली. 

माझी गरज भागवण्यासाठी तू तुझ्या विश्वातून बाहेर येउन मला साथ देणं किंवा तुझ्या विश्वात मला प्रवेश देणं या दोनीही गोष्टी 'अतिक्रमणा सारख्याच' घडल्या असत्या नाही का?

 आणि कुणाच्याही वस्तूवर, अधिकारावर, भावविश्वावर 'अतिक्रमण' करण चूकच नाही का?

 म्हणून मग मी स्वत:च वजा व्हायचं ठरवलं आणि निघालो एकटाच …. तुझ्या विश्वापासून दूर.

- मला एकट करून? अरे, मला सवय झालीय आता तुझी.

- चिमणाबाई, या जगात एकट कोणीच नसतं. 

जेव्हा आपण एकट आहोत असं वाटतं ना तेव्हा तो एकांतच असतो आपला सोबती जो दाखवत असतो आपल्याला वाट आयुष्यातल्या पुढच्या प्रवासाची . 

मलाही दाखवली त्याने आणि बघ ……. आज मी किती आनंदी आहे … माझ्या 'घरट्यात'… माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या 'माझ्या माणसांमध्ये'

चिमणी नि:शब्द होऊन तिथून निघाली तेव्हा कावळा तिला एवढंच म्हणाला -

*- चिमणाबाई, माझ्या घरट्यात तू केव्हाही येऊ शकतेस हो. तुझी टकटक ऐकून मी लगेच दार उघडेल … क्षणाचाही विलंब न करता.*

चिमणीचे डोळे पाणावले... भरल्या कंठाने निरोप घेऊन तिने परतीची झेप घेतली आपल्या घरट्याकडे... 

पण आज तिच्या पंखात पूर्वीइतक बळ राहिलं नव्हतं....

आपल्या सगळ्यांचीच अवस्था ना थोड्याफार प्रमाणात त्या चिमणाबाई सारखी झालीय. 

- म्हणजे ?

- म्हणजे कुणीतरी आपलं माणूस आर्तपणे आपल्याला साद घालतंय हे आपल्या ध्यानिच नसतं अगं. 

ह्या आपल्या माणसांमध्ये भाऊ, बहिण, मित्र, मैत्रीण आई, वडील बऱ्याचदा पोटची मुलंही असू शकतात...

*त्यांची आर्त साद आपल्याला ऐकूच येत नाही*

…. म्हणजे ते पोटतिडकीने साद घालतात आणि आपण म्हणतो 

*…'थांब मला जरा करिअर करु दे.... थांब जरा मला आता घर घ्यायचय... थांब जरा मला आता कार घ्यायचीय … थांब मला काम आहे ... थांब मला विश्रांती घ्यायची आहे ... थांब जरा मला आता ….' आणि मग ही जंत्री वाढतच जाते.*

त्यांची सहन शक्ती संपते … ते त्यांचं वेगळं विश्व तयार करतात... त्या विश्वात आपल्याला स्थान नसतं... आपल्या ते लक्षात नसतं आणि जेव्हा येतं तेव्हा …. 

आपण फार एकटे झालेले असतो.... !!

- आणि असं होऊ नये असं वाटत असेल तर? 

🌸मला कोणाचीच गरज नाही हा अहंपणा बाळगु नका 🌸

- वेळीच *'टकटक'* ऐकायला शिका.
वेळ प्रत्येकाची येते।।.

छत्रपती शिवाजी महाराज - सर्व पुस्तके

1. मृत्युंजय
2. छावा
3. बुधभूषण
4. राधेय
5. शिवरायांचे खरे शत्रू कोण
6. श्रीमान योगी
7. म्हणे लढाई संपली
8. शंभूराजे
9. शिवचरित्रातून उद्योगमंत्र
10. शंभूचरित्र
11. राजमाता जिजाऊ
12. छत्रपती शिवाजी महाराज
13. छत्रपती संभाजी महाराज
14. संभाजीराजे सांक्षिप्त जीवनपट
15. झुंज
16. मावळा
17. पावनखिंड
18. युगंधर
19. बजिंद
20. ययाती
21. किल्ले रायगड
22. छत्रपती शिवरायांची अस्सल छायाचित्रे
23. रायगडाची जीवन कथा
24.  तेरा पोवाडे
25. तोरणा
26. दुर्गरत्न
27. पुरंदर
28. प्रतापगड
29. प्रवास गडकोटांचा
30. महाराष्ट्र दर्शन
31. माझा राजा शिवाजी राजा
32. मुरुड जिंजीरा
33. राजगड
34. रायगड
35.  लोहगड
36. विजयदुर्ग
37. विशाळगड
38.  शिवनेरी
39. शिवाजी
40. सिंधुदूर्ग..

तुम्हाला पाहिजे असणारी सर्व पुस्तके खालील लिंक वर आहेत कधीही बघा, वाचा, download करा. महत्वाचे म्हणजे हा message share करा जेणेकरून सर्वाना याचा लाभ घेता येईल

https://drive.google.com/drive/mobile/folders/1-8PYwGN2D8rTHWNBjgBmVI9vCfrC8Unr

छत्रपती शिवाजी महाराज Status

"जर  शिवाजी महाराज हे इंग्लंडमध्ये जन्माला आले असते तर आम्ही पृथ्वीवरच काय पण परग्रहावरही राज्य केले असते !"
           -- लॉर्ड माउंटबँटन, इंग्लंड.

"भारताला जर स्वातंत्र्य मिळवून द्यायचं असेन तर एकच पर्याय आहे,  शिवाजी महाराजा न प्रमाणे लढा !
                -- नेताजी सुभाषचंद्र बोस.

"नेताजी, तुमच्या देशाला स्वातंत्र्यासाठी कुठल्या ‘हिटलर‘ची गरज नाही, तर तुमच्याच देशात जन्माला आलेल्या  शिवाजी महाराजा च्या इतिहासाची गरज आहे !"
                   -- अॅडॉल्फ हिटलर.

"शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही, तर  शिवाजीमहाराज ही आजच्या तरूण पिढीसाठी उर्जा आहे; जिचा वापर हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी होऊ शकतो !"
                 -- स्वामी विवेकानंद.

"जर  शिवाजी महाराज आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही त्यास ‘सुर्य‘ संबोधले असते !"
              -- बराक ओबामा, अमेरिका.

"जर  शिवाजी महाराज अजून १० वर्षे जगले असते, तर इंग्रजांना पुर्ण हिंदुस्थानचा चेहरा सुध्दा पाहता आला नसता !"
                  -- इंग्रज गव्हर्नर.

"काबुल पासुन कंदहार पर्यंत माझ्या तैमुर खानदानाने मोघली सत्ता निर्माण केली. इराक, इराण, तुर्कस्तानच्या कित्येक नामांकित सरदारांना माझ्या तैमुर खानदानाने पाणी पाजलं ! पण हिंदुस्थानात मात्र आम्हाला  शिवाजी महाराजांनी रोखलं ! सर्व शक्ती मी शिवाजी महाराजांना पराभव करायला खर्च केली पण शिवाजी महाराज काही माझ्या हाती नाही आले ! या अल्लाह ! दुश्मन दिया भी तो कौण दिया? * सिवा_भोसला* जैसा दिया. अपने जन्नत के दरवाजे खुले रखना खुदा क्योंकि दुनिया का सबसे बहादुर योध्दा और दिलदार दुश्मन तेरे पास आ रहा है !"
              -- औरंगजेब (छत्रपति शिवाजी महाराजांच्या मृत्यू नंतर नमाज पढताना काढलेले उदगार, संदर्भ- खाफिखानाची बखर)

"उस दिन *सिवा भोसला*ने सिर्फ मेरी उंगलियां नही काटी, बल्कि मेरी ताकद के घमंड को भी उतारा. मै अब निंद मे भी *सिवा भोसला* से मिलना नही चाहता !"
               -- शाहीस्तेखान, संदर्भ- खाफिखानाची बखर.

"क्या उस गद्दारे दख्खन से *सिवा* नाम का लोहा लाने के लिए एक भी मर्द नही है, इस दरबार में? लालत है ऐसी मर्दानगी पे !"
               -- बडी बेगम अलि आदिलशाह.

१७ व्या शतकात युरोप खंडात "लंडन गॅझेट" नावाचं आघाडीचं वृत्तपत्र होतं. जेव्हा महाराज आग्र्यावरून सहीसलामत सुटले, तेव्हा या वृत्तपत्राने पहिल्या पानावर जी पहिली बातमी छापली होती आणि त्यात महाराजांचा Shivaji, The King of India असा उल्लेख केला !

वरील उदाहरणावरून मी नेहमी जाणिवपुर्वक छत्रपती शिवरायांचा आंतरराष्ट्रीय किर्तीचे राजे म्हणुन उल्लेख करतो, जागतिक दर्जाचे योद्धे म्हणून शिवरायांची ओळख आहे ती यामुळेच ! महाराजांनी त्यांच्या ३० वर्षाच्या आयुष्यात ज्या ज्या सेनानींचा पराभव केला त्यामध्ये फक्त २ च भारतीय, बाकी सर्वजण हे परकिय सरदार आणि त्या त्या देशाचे नामांकित सरदार होते !

ज्या शाहीस्तेखानाची बोटे महाराजांनी लाल महालात छाटली आणि त्याच्या मनात शिवाजी महाराज या नावाचा खौफ निर्माण केला, तो शाहीस्तेखान साधासुधा मामुली सरदार नव्हता. तर तो अबू तालिबानचा नवाब होता, तुर्कस्तानचा नवाब होता ! प्रतिऔरंगजेब म्हणुन ओळखणारा हा शाहीस्तेखान औरंगजेबाचा सख्खा मामा होता. त्याने प्रचंड मोठा पराक्रम करून मोघलांना मोठा बंगाल प्रांत जिंकुन दिला होता. पण एका रात्रीत महाराजांनी लाल महालात घुसुन त्याची बोटे छाटली आणि काही कळायच्या आत पसार झाले ! परिणामी शाहीस्तेखानाने त्यानंतर शिवाजी महाराज या नावाची इतकी भिती घेतली की शिवाजी महाराजांना आता मला स्वप्नात देखील भेटायचं नाही. असं त्याने औरंगजेबाला सांगितलं इतका खौफ या नवाबाच्या मनात निर्माण केला होता !

बेहलोलखान पठाण, सिकंदर पठाण, चिडरखाण पठाण इ. ज्यांना महाराजांनी रणांगणावर धुधु धुतलं, हे सर्व अफगाणिस्तानचे मातब्बर सरदार होते !

दिलेरखान पठाण, मंगोलियन सरदार, मंगोलिया देशाचा सर्वोत्तम योध्दा होता हा ! महाराजांनी याचा पराभव केला !

सिध्दी जौहर, सिध्दी सलाबत खान हे इराणी होते, इराणचे शुर सरदार होते ! महाराजांनी यांना रणांगणात पाणी पाजलं !

उंबरखिंडीत ज्याचा कोंडुन पराभव केला, तो कारतलब खान उझबेकिस्तानचा सरदार होता, म्हणजे आत्ताच्या रशियाचा ! या महाराजांच्या विजयाची नोंद साक्षात गिनिज बुकाने देखील घेतली. कमीत कमी सैन्याने जास्तीत जास्त सैन्याचा केलेला पराभव ! (१००० मावळे विरूध्द ३०,००० गनिम आणि या ३०,००० पैकी एकही जिवंत राहीला नाही. आणि १००० पैकि एक ही मावळा गमावला नाही. ⛳⛳⛳⛳⛳ 

अभिमान असेल तरच शेअर करा.......

पाच मूर्ख 😂

*बिरबलाने शोधलेले*
*पाच मूर्ख*

अकबराने एकदा बिरबलाला फर्मावले-
"आपल्या राज्यातले ५ सर्वात मूर्ख लोक शोधून माझ्यासमोर आणून उभे कर."

"हां खाविंद, पण मला एक महिन्याची मुदत द्यावी."

एक महिन्यानंतर बिरबल दोनच व्यक्तींना घेऊन दरबारात आला.

बादशहाने विचारले "अरे मी तुला ५ मूर्ख आणायला सांगितले होते."

बिरबल म्हणाला "खाविंद, एकेक मूर्खाला सादर करण्याची इजाजत मिळावी."

बिरबलाने पहिला मूर्ख सादर केला.

"महाराज, हा माणूस बैलगाडी चालवताना एक मोठे ओझे डोक्यावर घेऊन बसला होता. का तर म्हणे बैलाला जास्त ओझे पेलायला नको म्हणून!"

"आणि महाराज, हा दुसरा मूर्ख. ह्याच्या घराच्या छपरावर उगवलेले गवत गायीने खावे म्हणून तो तिला शिडीवरून छपरावर नेण्यासाठी प्रयत्न करीत होता."

बादशहा म्हणाला "ठीक आहे. आता तिसरा मूर्ख दाखव."

"महाराज, मी ह्या राज्याचा प्रधान आहे. माझ्याकडे खूप जबाबदाऱ्या आहेत. त्या सोडून मी ५ मूर्खांच्या शोधात फिरतोय म्हणून मी तिसरा मूर्ख."

"ठीक आहे. आता लवकरच चवथा आणि पाचवा मूर्ख मला दाखव."

"महाराज, आपली क्षमा मागतो; पण आपण ह्या राज्याचे राजे असून प्रजेकडे दुर्लक्ष करून मला नको ती कामे करायला सांगता हा मूर्खपणाच नाही का? म्हणून चवथा नंबर आपला!"

"असूदे असूदे. आता लवकर पाचवा कोण ते सांग

"महाराज, पाचवा  आपल्यासारख्या  मूर्खाच्या कोड्याचं उत्तर  जाणून घेण्यासाठी,  दैनंदिन कामकाज आणि जबाबदाऱ्या सोडून  हातात मोबाईल घेऊन चिकटून बसलेत ते

"शाबास बिरबल शाबास! ताबडतोब आपल्या सगळ्या ग्रुपवर फाॅरवर्ड कर. पाचवे कोण ह्या प्रश्नाच्या उत्तराची लोकं वाट पहाताहेत!"
😅😂😝😜😊😀😍😂😅
📲📲📲

सावधान दोस्तांनो
(खासकरून विवाहित मित्रांनी लक्ष देवून वाचा.)

काही दिवसांपूर्वी मला एक फ्रेंड रिक्वेस्ट आली .

ती कोण्यातरी प्रिया जोशी नावाने होती. जास्त करून मला तर पुरुष मंडळींच्याच रिक्वेस्टी येत असतात.

पण ह्या वेळी एका मुलीने रिक्वेस्ट पाठवली त्यामुळे मी  आश्चर्यचकीत होणं सहाजिक होतं.

एक्सेप्ट करायच्या आधी सवयी प्रमाने मी तिचं प्रोफाईल चेक केलं तर समजलं की अजूनपर्यंत तिच्या मित्र यादीत कोणीच नाहीये. 

थोडी शंका आली की कोणाचं फेक अकाउंट तर नसेल? नंतर विचार केला की असंही असू शकतं की फेसबुकने ह्या यूजरला नवं समजून माझ्या सोबत मैत्री करण्यासाठी सज्जेस्ट केलं असावं. प्रोफाइल फोटोची जागा रिकामी बघून मी आंदाज लावला बहुतेक नवीन असेल व तिला फोटो अपलोड करता येत नसेल किंवा संकोचली असेल. तर शेवटी मी तिची रिक्वेस्ट एक्सेप्ट  केली.

सगळ्यात पहिले तिच्याकडनं धन्यवाद म्हणून मेसेज आला. मग माझ्या सगळ्या स्टेटसवर लाईक आणि कॉमेंटस मिळायला सुरूवात झाली.

अापल्या पोस्टींची कदर करणारी ही नविन मैत्रीण मिळाली म्हणून मी खूप आनंदीत झालो. हा प्रकार पुढं पुढं वाढत गेला व आता मला माझ्या वैयक्तीक आयुष्याविषयी प्रश्न यायला लागले. मला काय आवडतं काय नाही याविषयी विचारपूस व्हायला लागली.

अाता तर ती थोड्याफार रोमँटिक शायरी पण पोस्ट करायला लागली होती.

एक दिवस ह्या बाईसाहेबाने विचारलं  : तुम्ही तुमच्या बायकोवर प्रेम करता का? 

मी लगेच म्हणालो: हो तर.
ती गप्प बसली.

दुसऱ्या दिवशी तिनं विचारलं : तुमची मॅडम सुंदर असेल ना ?

ह्यावेळेसही मी तेच उत्तर दिलं:  हो खूपच सुंदर आहे.

त्याच्या पुढल्या दिवशी म्हणाली : तुमची बायको स्वयंपाक चांगला बनवते का ?

" खूपच रूचकर आणि जबरदस्त " मी उत्तर दिलं ".

मग काही दिवस ती गायब झाली.

अचानक काल सकाळी तिनं मैसेज बॉक्स मध्ये लिहलं "मी जळगावात आलेय . तुम्ही मला भेटणार का? 

मी म्हणालो  : जरूर भेटेन की.

"तर मग ठीक आहे फन सिनेमाला या. आपली भेटही होईल आणि राबता पिक्चर पण पाहणं होईल.

मी म्हणालो नको मॅडम तुम्हीच माझ्या घरी या. तुम्हाला भेटून माझ्या बायकोलाही आनंद होईल. माझ्या बायकोच्या हातचा स्वयंपाक सुद्घा चाखून बघा.

म्हणाली  : नाही, मी तुमच्या मॅडमसमोर नाही येणार तुम्हाला यायचं तर या.

मी तिला माझ्या घरी बोलवायचा खूप प्रयत्न केला. पण ती सारखं सारखं फन सिनेमाला यायचाच हट्ट करत राहीली व मी माझ्या घरी.

ती चिडली व म्हणाली : ठीक आहे मी परत जाते आहे. तुम्ही भेकड घरातच बसा. 

मी तिला परत समजावयचा बराच प्रयत्न केला आणि सार्वजनिक ठिकाणी भेटायचे धोकेही सांगितले पण तिनं ऐकलं नाही.

शेवटी हार मानून मी म्हणालो: मला भेटायचं तर माझ्या कुटुंबियांसमोर भेट अन्यथा घरी जा.  

ती ऑफलाइन झाली. सायंकाळी घरी पोहचलो तर डायनिंग टेबलावर भन्नाट अशी मटन करी बनवून तयार होती.

मी बायकोला विचारलं:  आज कोणी येतं आहे का आपल्या घरी जेवायला?

बायको म्हणाली:  प्रिया जोशी येतेय. 

काय?

ती तिला कुठं भेटली?  तू तिला कसं ओळखतेस?

"जरा धीर धरा साहेब,  ती मीच होते. तुम्ही माझ्या गुप्तहेरी मिशनच्या परिक्षेत पास झालात.  यावं माझे खरे जोडीदार माझे सच्चे जीवनसाथी जेवण थंड होतंय.

-चान्स मिळाल्यावर बायकोचा मोबाईल चेक केला नसता तर आज ही पोस्ट करायच्या लायक राहीलो नसतो राव .  

😃😂😜

(मेन विल बी मेन)

प्रारब्धाचा हिशेब  :

एक दिवस एक माणूस पूर्व सुचना न देता कामावर गेला नाही .
मालकाला वाटलं ह्याचा जर पगार वाढवला तर हा काम मन लावून करेल .....
म्हणून पुढच्या वेळेस मालकाने पगारा व्यतिरीक्त त्याला पैसे वाढीव दिले ......
तो काही बोलला नाही , त्याने चुपचाप मिळालेले पैसे ठेवून दिले .......
काही महिन्यानंतर परत तसच घडलं .... तो पुर्वसुचना न देता गैरहजर राहीला ...
मालकाला त्याचा खूप राग आला आणि त्याने विचार केला कि, याचा पगार वाढवून काय फायदा झाला ???
हा काही सुधारणार नाही .....
पुढच्या वेळेस मालकाने त्याला वाढवलेला पगार कमी करून त्याच्या हाती पगार दिला .....
त्याने कुठलीही तक्रार न करता चुपचाप पगार घेतला .....
मालकाला खूप आश्चर्य वाटलं .
अखेर न राहवून त्याने त्याला विचारलं , '' मागच्या वेळेस तू गैरहजर राहीलास तरी तुझा पगार वाढवला ....तेंव्हा सुद्धा तू काही बोलला नाहीस , आणि ह्या वेळेस सुद्धा तू न पूर्वसुचना गैरहजर राहीलास म्हणून तुझा वाढवलेला पगार कापला ....
तरीही तू काही बोलत नाही,,,, असं का ?????
त्यावर त्याने दिलेलं उत्तर विचार मनाला भिडणारं होतं ..

''तो म्हणला , मालक पहिल्या वेळी मी गैरहजर राहीलो त्यावेळी मला मुलगा झाला होता ...... तुम्ही माझा पगार वाढवलात तेंव्हा मी विचार केला , देवाने माझ्या मुलाचा पालनपोषणाचा हिस्सा पाठवला .......
दुस-यांदा जेंव्हा मी गैरहजर राहिलो तेंव्हा माझ्या आईचं निधन झाले होते आणि तुम्ही माझा वाढवलेला पगार कापलात ......
मी मनाशी विचार केला माझी आई तिचा वाटा तिच्या बरोबर घेऊन गेली .
मग मी ह्या पगाराबद्दल चिंता का करू ??
ज्याची जबाबदारी खुद्द देवाने घेतली आहे ........

तात्पर्य -
जिवनांत काय मिळवलसं आणि काय गमावलसं असं जर कुणा विचारलं तर ,
बेशक सांगा , जे गमावलं तो माझा अविचार होता आणि जे कमावलं ती सद्गुरू कृपा होती.

''खूप सुंदर नाते आहे माझ्यात व देवामध्ये ....''
''जास्त मी मागत नाही आणि कमी देव देत नाही .......
👍👌👌
यालाच प्रारब्ध म्हणतात.......
जिवन खुप सुदंर आहे आनंदाने जगा ....