बंधना पलीकडे एक नाते असावे ,
शब्दांचे बंधन त्याला नसावे,
भावनांचा आधार असावा , दुख्खाला तिथे थारा नसावा ,
असा गोडवा आपल्या मैत्रीत असावा
Maitriche Nate Sms
नात्याची परीभाषा
मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला ...
कोणत्याही नावाची गरज नसते...
कारण न सांगता जुळणा-या नात्यांची ...
परीभाषाच काही वेगळी असते
Maitriche Nate...
💕"नाते हे हॄदयात असले पाहिजे
शब्दांत नाही!
आणि नाराजी ही शब्दांत असली पाहिजेे
हॄदयात नाही.
ज्याला जिंकून देखील केव्हा हरायचं हे माहीत असतं..,
तो हरून सुद्धा जिंकलेला असतो..💕
💖💕शुभ सकाळ .💕💖
श्वासातला श्वास असते मैञी....ओठातला घास असते मैञी
.
बसताना असे बसा की लोक शेजारी येऊन बसले पाहीजे...
.
आणि
.
मरताना असे मरा की ज्याला कळेल त्याच्या डोळ्यातुन खळाखळा पाणी आल पाहीजे....
जीवनाचे सार्थक फक्त येवढ्याच गोष्टीत
आहे !!!.......
.
कलीयुगाचे पर्व
आहे..
,
प्रत्येकालाच इथे गर्व
आहे...!
.
मी आहे तरच सर्व
आहे...,
.
नाहीतर सर्व व्यर्थ
आहे...!!
.
अरे वेड्या..!
.
कुणा वाचून कुणाच राहात नसतं..,
.
आदर कर सर्वांचा,
हाच खरा मानव धर्म
आहे...!!!
.
प्रेमाने जोडलेली चार माणसं व त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द हे वैभव ज्याच्या जवळ आहे..,
.
तोच या जगात
खरा "श्रीमंत"
आहे..
प्रेम + काळजी = आई
प्रेम + भय = वडील
प्रेम + मदत = बहिण
प्रेम + भांडण = भाऊ
प्रेम + जिवन = नवरा / बायको
प्रेम + काळजी + भय + मदत +भांडण + जिवन = मित्र
श्वासातला श्वास असते मैञी....ओठातला घास असते मैञी....काळजाला काळजाची आस असते मैञी....
कोणीही जवळ नसताना साथ असते ती मैञी..👈👈👈
आवडल्यास नक्की शेअर करा😊
मैत्रीचा मोती कुणाच्याही भाग्यात नसतो,
सागराच्या प्रत्येक शिँपल्यात मोती नसतो,
जो विश्वासाने मैत्री जपतो तोच खरा मैत्रीचा मोती असतो.
हाक तुमची साथ आमची
Maitriche Nate
'मैत्री तुटायला कधी सुरुवात होते..''?
आपण मैत्री मध्ये व्यवहार आणतो तेव्हा.
मैत्रीमध्ये आपण खूप अपेक्षा ठेवायला सुरुवात करतो तेव्हा.
आपण मित्राला गृहीत धरायला सुरुवात करतो तेव्हा.
मैत्रीमध्ये आपणच कसे प्रामाणिक आहोत हे समोरच्याला सांगायला लागतो तेव्हा.
मित्र असे का वागला हे त्याला न विचारता आपणच मित्राच्या तसे वागण्यामागची कारणे शोधायला सुरुवात करतो तेव्हा.
आपण कसेही वागलो तरी मित्र आपल्याला समजून घेईल असे जेव्हा आपण समजायला लागतो तेव्हा.
मित्राने गमतीने बोललेल्या शब्दांचा अर्थ आपण आपल्या पद्धतीने घ्यायला सुरुवात करतो तेव्हा.
भांडण झाल्यावर पहिला फोन मित्रानेच केला पाहिजे असे आपण ठरवतो तेव्हा.
मित्र श्रीमंत झाल्यावर आपणच आपल्याला त्याच्या समोर गरीब समजायला लागतो तेव्हा.
आपला मित्र आता बदलत चालला आहे अशी आपली धारणा व्हायला लागते तेव्हा .
मित्र बिझी असेल, त्यालाही त्याच्या अडचणी असतील हे आपण विसरायला लागतो तेव्हा.
आपल्या मित्राची आपण चार चौघात टर उडवायला सुरुवात करतो तेव्हा.
आपण जसा विचार करतो तशाच विचाराने मित्राने वागले पाहिजे असा दुराग्रह बनतो तेव्हा.
आपली चूक असतानाही मित्राने आपलीच बाजू कशी बरोबर आहे हे लोकांना सांगायला हवे अशी बावळट अपेक्षा आपण करायला लागतो तेव्हा.
खिशात पैसे असूनही जेवणाचे बिल भरताना आपला हात आपल्या पाकीटाकडे जात नाही तेव्हा.
कुठलातरी निकष लावत आपण आपल्या मित्राची इतरांबरोबर तुलना करायला लागतो तेव्हा.
आपले मित्रांशिवाय काही अडत नाही हे आपण नकळत मित्राला दर्शवायला लागतो तेव्हा.
आपल्या भल्यासाठी मित्राने सांगितलेल्या गोष्टी आपल्याला पकाऊ लेक्चर वाटायला लागते तेव्हा.
मित्र online दिसतोय पण आपल्या message ला reply देत नाही याचा अर्थ तो आपल्याला ignore करतोय असला सडका विचार आपल्या मनात येतो तेव्हा .
खर तर कुठलीही मैत्री कधी तुटत नसते, तर त्या मैत्रीमधील मित्र एकमेकांपासून तुटत असतात.
असे असेल, तसे झाले असेल, असे काल्पनिक विचार करीत आपण मैत्रीत संशयाचे वादळ निर्माण करीत असतो.
मित्र एकमेकांपासून तुटले तरी त्यांच्यातील मैत्री दोघांच्याही मनात जिवंत असते.
पण कुठेतरी गैरसमज, अहंकार असल्या फालतू गोष्टीमुळे ती मैत्री मनातल्या मनात दडपून जाते.
चांगली मैत्री बनायला अनेक काळ जावा लागतो,
पण मैत्रीमधील धागे तुटायला एका क्षणाचाही वेळ लागत नाही.
तेव्हा मित्रांनो!
तुमच्या मित्राकडून एखादी चूक झाली असेल तर त्याला माफ करा.
आणि
तुमच्याकडून कुठली चूक घडली असेल तर मित्राची क्षमा मागायला लाजू नका.
✨✨✨✨✨✨✨
पटले तर आपल्या खास मित्राला फॉरवर्ड करा.
।मैत्री चिरायु राहो।
मैञीचं नातं
वारं हवं असतं,
मन जुळण्या साठी नातं
हवं असतं,
नात्यासाठी विश्वास हवा
असतो,
त्या विश्वासाची पहिली
पायरी म्हणजे?
" मैञी "
मैञीचं नातं कसं जगावेगळं
असतं,
रक्ताचं नसलं तरी मोलाचं
असतं ...!!
मैत्री
आयुष्य एका ओळीसारखं असतं,.......
प्रेम एका त्रिकोणासारखे असतं पण.....
मैत्री असते वर्तुळासारखी,....
ज्याला कधीच शेवट नसतो..! "
तेच खरे मित्र
. . . तेच खरे पत्र ॥
नात्यांना जोडून ठेवते,
तेच खरे गोत्र ॥
नजरे पल्याड पाहू शकतात तेच,
खरे नेत्र ॥
दूर असूनही दुरावत नाही,
तेच खरे मित्र. ॥॥💕
प्रिय मित्रांसाठी
पण...........
आयुष्यात कधी
मैत्री गमवायची नाही..!!!
दोस्त सोबत आसतील तर जगण्यामध्ये शान आहे …! नाईतर साला स्वर्ग पण
समशान आहे…!!😘😘प्रिय मित्रांसाठी
श्वास
" स्वप्न" ठेवले तर अपूर्ण राहील..
" मन " ठेवले तर कधी तरी तुटेल..
मग विचार केला की श्वास " ठेऊ "
मरेपर्यंत सोबत राहील . .
मैत्रीचे नाते
आम्ही मित्रांमध्येच जग पाहतो
पण जेव्हा समझेल तेव्हा वेड लागेल .
लोक रुप पाहतात.
आम्ही ह्रदय पाहतो.
लोक स्वप्न पाहतात.
आम्ही सत्य पाहतो.
फरक एवढाच आहे की,
लोक जगात मित्र पाहतात.
पण आम्ही मित्रांमध्येच जग पाहतो.....
Khas tujha Maitri sathi
नक्की वाचा कारण ह्या लाइन तुम्हाला एक दिशा देतील.
😃😃😃
एकदा गावात सगळ्या लोकानी पाउस पडण्यासाठी प्रार्थना करण्याच ठरवल,
प्रार्थनेच्या दिवशी एक मुलगा छत्री घेउन आला....
- याला श्रद्धा म्हणतात
😃😃😃
ज्या वेळी लहान मुलाला आपण हवेत फेकतो तेव्हा ते मूल हसत कारण आपण त्याला झेलू हां विश्वास त्याला असतो...
- याला विश्वास म्हणतात
😃😃😃
उद्याचा दिवस बघू, याची खात्री नसतानाही आपण आलार्म लावून झोपतो....
- याला आशा म्हणतात..!!!
🌼🌼
भविष्याची जराही कल्पना नसताना आपण मोठ्या गोष्टींच नियोजन करतो....
-याला आत्मविश्वास म्हणतात...!!!
😃😃😃
जग दुःख भोगत आहे हे ठावुक असुनही आपण लग्न करतो...
-याला ओवर कॉन्फिडन्स म्हणतात...!!!
😜😜😜
आयुष्यात माणसं कमावणारा सर्वात श्रीमंत असतो.
कारण पैसा तर भिकारी पण कमावतो.
माझी ओळख माझ्या नावात नाही, ती माझ्या स्वभावात आहे.
मला दु:ख देण्याची नाही, तर सर्वांना हसत ठेवायची जिद्द आहे.
तुझया माझ्या नात्याला गरज नाही पैशाची...!!!
फक्त ओढ आहे ती मैत्रीची...
👉💐खास माझ्या तुझयासाठी💐
Jivalag Manase
आकाशात एक तारा आपला असावा,
थकलेले डोळे उघडताच चमकून दिसावा,
एक छोटीशी दुनिया आपली असावी
तुमच्यासारखी जिवलग माणसे तेथे नेहमी दिसावी....
Mitra
आयुष्यात येताना जाताना लोक भेटतात. एकमेकांच्या ओळखी होतात. एकमेकांमध्ये मैत्री होते
आणि ती ओळख अगदी द्रुढ होऊन जाते.
पण एकदा अशी ओळख होते
जणू असे वाटू लागते वर्षा वर्षांची मैत्री असावी.
जेव्हा होते अशी ओळख तेव्हा नाती जुळतात अनेक.
अशी ही ओळख मित्रा मित्रांमधली
अशी ही ओळख नात्या नात्यांमधली
जणू ती ओळख मनात जाऊन रुजते.
अश्या अनोळखी ओळखीला आणि मैत्रीला सलाम
Mitra sathi Kay pan
💜⭐जे मित्र आपली हॉटेल ची बिले भरतात,
ते त्यांच्यापाशी खुप पैसा आहे म्हणून नव्हे,⭐💜
💜⭐तर त्याना मित्र पैश्यापेक्षा अधिक प्रिय असतात म्हणून!⭐💜
💜⭐जे कोणत्याही कामात पुढाकार घेतात, ते मुर्ख असतात म्हणून नव्हे तर त्याना त्यांची जबाबदारी कळते म्हणून!⭐💜
💜⭐जे भांडल्यावर आधी क्षमा मागतात, त्यांची चुक असते म्हणून नव्हे,तर त्याना आपल्या माणसांची पर्वा असते म्हणून!⭐💜
💜⭐जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे, तर ते तुम्हाला आपल मानतात म्हणुन!⭐💜
💜⭐जे खुप पोस्ट्स पाठवतात ते रिकामटेकडे असतात म्हणून नव्हे, तर तुम्ही सतत त्यांच्या संपर्कात रहाव म्हणुन . . !⭐💜
❤माझ्या सर्व प्रिय मित्रांसाठी❤...!!
Maitri kay ahe Rao
मैत्री काय आहे राव. . . . पोटच्या पोराचं लग्न टाकून कोंढाण्यावरून थेट स्वर्ग जिंकणारी. . . .
मैत्री शिवराय तानाजीची.!
शरीराच्या चिंध्या झाल्यावर पण या मातीसाठी तळमळणारी. . . . मैत्री शंभूराजे कवी कलशांची.!
जीवापाड प्रेम आणि जीवघेनी दुष्मनी करणारी . .
मैत्री संताजी धनाजींची. . .!
फासाचा दोर पहिला माझ्या गळ्यात घाला म्हणून भांडणारी.!
मैत्री भगतसिंग राजगुरूंची. .!
कसली नाती होती ओ ती ?... शेवटचा श्वास घेतानाही हातातला हात घट्ट धरण्याचं कसलं हे वचन
.ही खरी मैत्री .. ही खरी नाती.!
💐💐 ||💐💐
Khara Mitra
डोळे मिटुन जी प्रेम करते तीला प्रेयसी म्हणतात..
डोळे उघडे ठेऊन जी प्रेम करते तीला मैत्री म्हणतात..
डोळे वटारुन जी प्रेम करते तिला पत्नी म्हणतात..
आणि स्वत:चे डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते तिला "आई"म्हणतात..
पण, डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो, त्याला पिता म्हणतात...
😀... आणि जो पिता.. पिता.. प्रेम करतो.. त्याला.. मित्र... म्हणतात.... 😝😝😜😜🍺🍺
" मैत्रीमध्ये ना खरं ना खोटं असतं,
मैत्रीमध्ये ना माझं ना तुझं असतं..
कुठल्याही पारड्यात तिला तोला,
मैत्रीचं पारड नेहमी जडच असतं..
मैत्री श्रीमंत किंवा गरीब नसते,
मैत्री सुदंर किंवा कुरुप नसते..
कुठल्याही क्षणी पहा मैत्री फक्त...
मैत्रीचं असते.
रक्ताच्या नात्याचं मला माहित नाही,
पण मैत्रीच्या नात्यामध्ये प्राण असतो.
म्हणून कदाचीत रक्ताची नाती मरतात,
मैत्रीची नाती मात्र सदैव टिकतात"...