Showing posts with label आरोग्यासाठी Health Tips. Show all posts
Showing posts with label आरोग्यासाठी Health Tips. Show all posts

तुम्ही मांसाहार का करता??*
१)शक्ती साठी?
-- पण जमिनीवरचा सगळ्यात शक्तीशाली प्राणी हत्ती शाकाहारी आहे.
तो कधी ताकदीसाठी मांस भक्षण करित नाही!!
शेतकय्रांचा सोबत राबराब राबणारा बैल कधी मांसाहार करतो का?
अश्वशक्ती(होर्सपाँवर) ने कुठल्याही यंत्राची शक्ती मोजल्या जाते अश्व-घोडा कधी मांसाहार करतो का?
मग मांसाहार केल्यानेच शक्ती मिळते असे कसे म्हणता येईल?
२)जीभेवरच्या चवीसाठी??
*मांसाला कसली आलीय चव.*
चव सगळी त्यातल्या अष्टपैलू मसाल्यांना.
तेच मसाले वापरले तर वांग्या बटाट्याच्या भाजीलाही येईलच की चव!
३)जीवनसत्वांसाठी??
--मांसापेक्षा हिरव्या पालेभाज्या आणि सूकामेव्यात कितीतरी अधिक प्रथिने जीवनसत्वे अन् पौष्टिक पदार्थ असतात.हो ना?
मग मांसाहार कशासाठी?
खरे तर निसर्गाने
ना आपले दात मांस चावण्यायोग्य बनवलेत
ना आतडे मांस पचविण्या योग्य बनवलेत.
मानवी शरीरचनाच मूलत:
शाकाहार पूरक अशीच आहे.
असे नसते तर छोट्या बालकाला भाताच्या पेजेऐवजी मांसाचे तुकडे कुस्करून द्यायला सांगितले असते डॉक्टरांनी
याचा अर्थच हा आहे
की
माणूस नैसर्गिक मांसाहारी प्राणी नाही!
मग
का बळेच रक्त चाटवायचं जिभेला?
वैद्यकशास्त्र सांगते,मांसाहारातून पचनसंस्थेचे विकार जडतात.
मानसिक अस्वास्थ्य निर्माण होते ज्यातून पुढे अनेक व्याधी निर्माण होऊ शकतात.
अध्यात्मशास्त्र सांगते,
मांसाहारामुळे काम,क्रोध,मद,मत्सर इ.
दुर्गुण माणसात प्रबळ होतात.
आणी असुरी प्रवृत्ती वाढते.
असं म्हणतात
वानरापासून मानव ऊत्क्रांत झाला.
वानर आजही शाकाहारी आहे.
ऊत्क्रांतीच्या प्रवासात
वानरापासून नर होताना
माणूस जानवर
कसा झाला कुणास ठाऊक?
पण माणसाचे पोट म्हणजे जनावरांची दफनभूमी नव्हे
एवढे मात्र माणसाने लक्षात घेतले पाहीजे!!!
*शाकाहारी व्हा!!!*
तनाची ,मनाची अन् आत्म्याची
पवित्रता वाढवा .🙏🏻

सकाळी उठून नारळपाणी पिण्याचे हे आहेत ५ फायदे

नारळपाण्यामध्ये अनेक लाभकारक फायदे असतात. आजारी माणसाला नारळपाणी दिले जाते. यामुळे शरीराला उर्जा मिळते. तसेच रोगप्रतिकारक क्षमताही वाढते. मात्र नारळपाणी पिण्याची योग्य वेळ कधी याबाबत अनेकदा लोकांमध्ये दुविधा असते. काहींचे म्हणणे असते की नारळपाणी सकाळी प्यावे तर काही म्हणतात नारळपाणी संध्याकाळी पिणे योग्य असते. मात्र तज्ञांच्या म्हणण्यानुसार सकाळच्या वेळेस नारळपाणी पिणे शरीरासाठी लाभदायक असते. सकाळी नारळपाणी प्यायल्यास दिवसभर शरीराला स्फूर्ती मिळते.
सकाळी उठून नारळपाणी पिण्याचे हे आहेत फायदे
थॉयरॉईड हार्मोन्सचे संतुलन राखण्यासाठी नारळपाणी खूप उपयोगी ठरते.
किडनीचे आरोग्य चांगले राहण्यासाठी नारळपाण्याचे सेवन करणे चांगले असते. तसेच मुतखड्याचा त्रास होण्याची शक्यताही कमी होते.
नारळपाण्याच्या नियमित सेवनाने रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. ज्यामुळे रोगांपासून बचाव होतो.
जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करताय तर नारळपाणी पिण्याने मोठा फायदा होतो. यात कॅलरीजची मात्रा कमी असते. नारळपाणी प्यायल्याने बराच वेळ भूक लागत नाही. यामुळे सतत खाण्याचीही गरज भासत नाही.
नारळपाणी प्यायल्याने त्वचेलाही फायदा होतो. त्वचेमध्ये ओलावा टिकून राहतो