*वेडी ही बहीणीची माया*.....

भावांचे लग्न झाल्यावर बायकोमुळे भाऊ किती बदलतात, याचे एका बहिणीच्या नजरेतून मांडलेली वास्तवदर्शी कवीता.
जरुर वाचा आणि मित्रांना पाठवा...

माणसांच्या गर्दीत
हरवून बसला माझा भाऊ
सांगा ना त्याला
भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ......

एकुलता एक दादा
त्याला जिवापाड जपला
लग्न झाल्या पासून
वाहिनी च्या पदरा आड लपला
एक दिवस तरी नको वाहिनी ला भिऊ
सांग ना रे
भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ......

नको दादा साडी मला
नको पैसा पाणी
तुझ्या सूखा साठीच
देवा ला करते विनवणी
सांग तुला कोणत्या रंगाचा  शर्ट घेऊ
सांग ना तुला
भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. ....

काम गेलं तुझ्या दाजीचं
म्हणून दुसऱ्याच्या शेतात कामाला जाते
तळ हातावरले फोड बघून
तूझी आठवण येते
दादा चढउतार होतात जीवनात
तू घाबरुन नको जाऊ
सांग ना तुला
भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. ...

उचलत नाहीस फोन म्हणून
वहीनीला केला
Wrong नम्बर करत
कट त्यांनी केला
नसेल ओळखला आवाज म्हणून त्रास नको देऊ
दादा सांग ना रे
भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. ...

आई बाबा सोडून गेले
घर पोरकं झालं
आठवणींचे आभाळ
डोळ्यामधी आले
वाईट वाटते शेजारी येतात  जेव्हा त्यांचे भाऊ
सांग ना तुला
भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ....

नको मला जमीन
नको घराची वाटणी
आवडीने खाईन
भाकरी आणि चटणी
काकूळती ला आला जीव
मनात राग नको ठेऊ
दादा सांग ना रे
भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ .....
😔😔😔😔
आवडली तर नक्की शेयर करा
....🙏 कवयित्री   बहिनाबाई चौधरी)

Hasa Pot Bharun...

पोट धरून हसा..

दत्तुचि आई :  वीस वर्ष मला             
           काहीच मुलबाळ नव्हतं .

गन्याची आई : अगं बाई गं !
           मग काय केल हो तुम्ही ?

दत्तुचि आई : काही नाही !
          मग मी २१ वर्षाची झाले ,
         बाबांनी माझं लग्न लावून दिलं आणि वर्षभरात दत्तू झाला !!!
😜😜😜

नदी किनारी जोडपे बसलेलेे असते

प्रेयसी : तुझा काय प्लॅन आहे

प्रियकर : तोच ग ....

२५पैसा १ मिनीट

प्रेयसी : मर मेल्या मोबाईल मधेच

😆😎😎😏😏😁
 
पर्श्या ने कधीच गुटखा नाही खाल्ला...
.
.
तरी पण तो सल्या आणि लंगड्याच्या आधि मेला 😢😥

Moral:- प्रेम is खरतनाक than गुटखा  😂💪🙆🏻😃😃😃
😆😆😆😆😆😜
सरदार इंटरव्यू देने गया,
बॉस ने पूछा तुम कितने भाई बहन हो
सरदार: 5
बॉस: उन में तुम्हारा नंबर कौनसा है ?

सरदार: एयरटेल
😂😂😂😂😂😂😂

लोक म्हणतात कि एक दिवस
दारू  पिल्याने सतत सवय
लागते.
एकदम चूक

आम्ही लहान पणा पासून
अभ्यास  करतोय

लागली का सवय ?

याला म्हणतात Control. 😂😝😆😂😂😂

खुलता कळी खुलेना....
आमचा बोनस काय मनासारखा मिळेना
.
.
वैतागलेला कामगार
😄😄😄

बायकांची सरकारला विनंती :

मॅगीची तपासणी पुर्ण झाली असेल तर आता fair & lovely ला जरा मनावर घ्यावे,

6 आठवडे म्हणत अर्ध आयुष्य गेले पण रंग काही गोरा झाला नाही .
एक वैतागलेली काळी परी
😂😂😂😂😂😂😂😂😂

😀 एक भयंकर जोक 😀

प्रियकर - मी तुझ्या बरोबर लग्न नाही करू शकणार...

प्रेयसी - का ?

प्रियकर - घरचे विरोध करतात...

प्रेयसी - घरी कोण कोण आहेत ?

प्रियकर - बायको आणि दोन मुले...

😜😂😝😜

बर झाले ‪
‎लग्नासाठी‬ आरक्षण नाहीये

नाही तर

‪OPEN‬ ‪‎वाले‬ ‪‎
बिनलग्नाचे‬ मेले असते
😂😂😂😂😂😂😂

एका मुलीला घरी पाहुणे बघायला येतात... बहिण किचनमध्ये असते.  तिचा भाऊ किचनमध्ये गेल्यावर बहिण त्याला विचारते.,

बहिण : मुलगा कसा आहे?

भाऊ : मुलगा चांगला आहे, engineer आहे, दिसायला
फिल्मचा हिरो वाटतो....

बहिण : कुठल्या फिल्मचा हिरो?☺

भाऊ : "फँड्री
😜😝😜😜😜😜😜

मानलेली बहीण,
मानलेला भाऊ,
मानलेले आई - बाबा, काका - मामा मावशी,
ही मानलेली नाती चालतात....

तर मानलेली " बायको " यात काय
प्रॉब्लेम?
😝😝
भावाचा मित्र भावासारखा असतो
बहिणीची मैत्रीण बहिणी सारखी
..................
तर बायकोची मैत्रीण
बायकोसारखी का नाही ??
हरी ओम् 😝😝

😝😉😜
☺☺☺😝😝😝😝
.😝😝😝

नविन आहे बाजारात. फेका दुसरी कडे😉😉😉😉
  जो येतो तो ग्रुप हालवतो

जो येतो तो ग्रुप हालवतो


च्यायला आता मी ग्रुपच
अम्बुजा सीमेंट चा बनवतो.
😂😂😜😜😛😛😝😝😄

एगदा सर बंड्याला प्रश्न विचारतात      सर :  कॉस थिटा ÷ साईन थिटा =?







बंड्या : पणदूर तिट्टा
😜😜😜😜

त्या मुली पण काही आतंकवाद्यांपेक्षा कमी नव्हत्या.
ज्या,
सर वर्गात येताच आठवण करुन द्यायच्या

" सर आज तुम्ही Homework चेक करणार होता ना??

👉लास्ट बेंच मित्रमंडळ..👈
😝😝😝😝😡😡😡

गुरुजी - हॉस्पिटलमधल्या ➕ चिह्नाचा अर्थ सांग पाहू.

बंड्या - उभा आहे तो डॉक्टर आणि आडवा आहे तो पेशंट..!


😳😨😱😃😄😆😝

मार्टिन ल्युथर किंगने सांगितले
"तुम्ही उडू शकत नसाल तर पळा.
पळू शकत नसाल तर चाला.
चालू शकत नसाल तर रांगा.
पण पुढे सरकत राहा."
.
.
एका मालवणी माणसाने विचारले,

.

"तसा नाय पन एवढी वडातान करून जावचां खय हा?
😂😂😂

पोरगी पोरग्याला:

"तुझी स्माइल काय गजब हायं..
दात कशे चमकुन रायले बे इतके...? 😁




पोरगं लाजून... ☺

"माझ्या तंबाकू मधे मीठ हाय..!"
😌😊😁😂😂😂😂

उपकार

💐खुप छानआहे नक्कीवाचा💐   

            *बोधकथा*

एकदा एक वाघ आणि वाघीण आपल्या पिलांना गुहेत सोडून शिकारीसाठी दूर जंगलात जातात. खूप दिवस पर्यंत ते परत आलेच नाही. इकडे पिलांना खूप भूक लागली. कलकल ऐकून एका बकरीला त्यांची दया  आली. तिने वाघिणीच्या पिलांना आपले दूध पाजले. पिलांच्या जीवात जीव आला. आता बकरी रोज येऊन त्यांना दूध पाजू लागली. एक दिवस पिले पोट भरल्यानंतर मस्ती करू लागली. तेव्हड्यात तिथे वाघ आणि वाघीण आले. बकरीला पाहून आयती शिकार मिळाल्याच्या आनंदात तिच्यावर वाघ झडप घालणार इतक्यात पिले म्हणाली, हिने आम्हाला दूध पाजून मोठे केलेय. ही नसती तर आम्ही मरून गेलो असतो. हिचे आपल्यावर खूप उपकार आहेत. तुम्ही तिला मारू नका. मुलांचे ऐकून वाघ खुश झाला आणि तिला कृतद्न्यतेने म्हणाला. आम्ही तुझे हे उपकार विसरणार नाही. आता तू स्वतंत्रपणे आनंदाने जंगलात एकटी सुद्धा वावरू शकतेस. तुला कुणीही त्रास देणार नाही.
आता बकरी मोठ्या धाडसाने जंगलात कुठेही वावरू लागली. एकदा तर बकरीला वाघाच्या पाठीवर बसून उंच झाडांची पाने खातांना एका पक्षाने पाहिले आणि कुतूहलाने त्याने बकरीला त्याबद्दल विचारले. बकरीने त्या मोठ्या पक्षाला सर्व हकीकत सांगितली. उपकाराचे महत्व पक्षाच्या लक्षात आले.
आपण पण असेच महान कार्य करायचे असे पक्षाने ठरवले.
एकदा पक्षी उडत असतांना त्याला काही उंदराची पिले दलदलीत फसलेली दृष्टीस पडतात. ती बाहेर पडायचा प्रयत्न करत असतात पण अधिकच खोल जात असतात. पक्षी त्यांना अलगद बाहेर काढतो. उंदराची पिले ओली झालेली असतात. थंडीने कुडकुडत असतात. पक्षी त्यांना आपल्या पंखात घेतो. चांगली ऊब देतो. थोड्या वेळाने आपल्या घरट्या कडे जाण्यासाठी निघतो. उंदराच्या पिलांचा निरोप घेतो. उडायचा प्रयत्न करतो पण काही केल्या त्याला उडता येईना कारण त्याचे पंख पिलांनी कुर्तडलेले असतात.
चरफडत चरफडत कसाबसा पक्षी तिथून निघतो.
बकरीला भेटून विचारतो, "तू पण उपकार केलेस मी पण उपकार केले. पण फळ दोघांना वेगवेगळे कसे मिळाले?"
बकरी हंसली आणि गंभीरपणे म्हणाली

*"उपकार पण वाघासारख्यावर करावेत, उंदरा सारख्यावर नाही. कारण असे लोक नेहमी कामापूरते असून आपल्या स्वार्थाकरिता दूसरा पर्याया मिळाला कि ,सच्च्या व प्रमाणिक माणसाला ते विसरण्यातच त्यांची स्वभाव धन्यता मानतात आणि बहादूर लोक उपकार करण्या-याला लक्षात ठेवतात"*
👏👏👏👏👏👏
_

New Marathi Jokes

Teacher :-१८६९ मध्ये काय झाले ??.....

रमेश  :- गांधीजींचा जन्म ...

Teacher :- अगदी बरोबर तु बसखाली. ..

Teacher :-   सुरेश  तु सांग १८७२ मध्ये काय झाले .... .

सुरेश  :-  गांधीजी ३ वर्षाचे झाले...मी पण बसुका ..😜😜😝😝😝😝😝😝😝😝😝😂😂😂😂😂

एका कैद्याला फाशी देण्यापूर्वी
जेलर : एखादी अंतिम इच्छा
आहे काय?
कैदी: आहे ना. मला फाशी देताना
माझे डोके खाली आणि
पाय वर ठेवा!
😝😝😝😝😝
जेलर झेंडा घेऊन पंढरपुरकडे रवाना
😆😆😆😆

गुरुजी :गण्या ,  दालचिनी को मराठी
मे क्या कहते है?
.
.
.
.
.
.
गण्या  : सर, दालचिनी को मराठी
मे ‪"वरणसाखर"‬ कहते है।
😉😜😂😂😂
गुरुजी जागे वर कोमात
😜😜😜😜😜😜😜😜😜

kAvi is BacK
😉😂     आर्ची आणि परशा 
            जाते है शाळा 😢😯

😉😁😀शाळा मे आर्ची ला
                        लगता परशाचा लळा😐😯😃😄

😬😑😬     बादमे आर्ची दिखाती
        अपना मळा 😐😯😃

  😬😑😉   शेवटको क्यु काटते
           दोनोका गळा😉😂

     😉😑😯😑     ये बघके डोळे मे पाणी
                      आता है घळा घळा 😐😅😐😴

👨गुरुजी: पाण्यात राहणारे पाच जीव सांग..? ?
😮बंडू: मासा...

😊गुरुजी: छान !
अजुन चार नाव सांग...
.
.
.
😎बंडू: माश्याची आई , वडील , बहीण , भाऊ

😱गुरूजींनी पाण्यात उडी मारून आत्महत्या केली..😱
😜😜😜😜😂😜

मास्तर:
1)त्याने भांडी घासली.
2)त्याला भांडी घासावी लागली.
या दोन वाक्यात काय फरक आहे?

बंड्या:
पहील्या वाक्यात कर्ता अविवाहीत आहे.
आणि
दुस-या वाक्यात कर्ता विवाहीत आहे.

मास्तरचे डोळे भरुन आले..!!!!
😆😆😆😆😂😂😂😂😂

नवरा आपल्या नाराज बायकोच्या माहेरी दररोज फोन करत असतो ☎.
 
*सासू* - किती वेळा सांगितले की, ती आता तुमच्याकड़े येणार नाही म्हणून.
  मग दररोज फोन का करता ?
 
*जावई* - ऐकून छान वाटत म्हणुन .....
😂😂😂😂😂 
😜😜😜

*"बघून घेईन"*😡म्हणत आयुष्य वाया घालवण्यापेक्षा

*"घेऊन बघतो "* म्हणा आणि आयुष्य सार्थकी लावा....🍺🍺

😝

बायका नवऱ्याला
'थोडं जेवून घेता का ?' 
ऐवजी
"थोडी घेऊन, जेवता का ?"
असं म्हणाल्या तर  नवरा बायकोची भांडणे किती कमी होतील ना !!
😜😜😜😜😝😝

एका पार्टीमध्ये दोन महिला💁🏻🙆🏻 एकमेकीना अजिबात सोडत नव्हत्या.

अगदी बसायला खुर्च्या देखील शेजारीशेजारीच पकडायच्या.
कहर म्हणजे, एक खुर्चीत बसू लागली की दुसरी तत्परतेने तिची खुर्ची पुसून  स्वच्छ करून  देत होत्या!

हे पाहून जमलेले सर्व जण
खूप आश्चर्यचकित झाले.
किती प्रेम हे!!!

नंतर एकाने खोलात जाऊन चौकशी केली तर असे समजले की,

त्या दोघी *नणंद-भावजया* होत्या आणि एकमेकींच्या साड्या नेसल्या होत्या. आपली साडी मळू नये म्हणून सारा आटापिटा चालला होता!!😜

😬😬😬

एका पार्टीमध्ये दोन महिला💁🏻🙆🏻 एकमेकीना अजिबात सोडत नव्हत्या.

अगदी बसायला खुर्च्या देखील शेजारीशेजारीच पकडायच्या.
कहर म्हणजे, एक खुर्चीत बसू लागली की दुसरी तत्परतेने तिची खुर्ची पुसून  स्वच्छ करून  देत होत्या!

हे पाहून जमलेले सर्व जण
खूप आश्चर्यचकित झाले.
किती प्रेम हे!!!

नंतर एकाने खोलात जाऊन चौकशी केली तर असे समजले की,

त्या दोघी *नणंद-भावजया* होत्या आणि एकमेकींच्या साड्या नेसल्या होत्या. आपली साडी मळू नये म्हणून सारा आटापिटा चालला होता!!😜

😬😬😬

भूगोलाच्या लुकडया बाईंनी वर्गातील मुलांना प्रश्न विचारला:-
"मुलांनो पृथ्वी का फिरते?"
.
.
एक कारट लगेच उभ राहिल न म्हणाल...
...
...
...
...
...
...
...
...
...
...
"बाई जरा खात पीत जावा!!!
तुम्हाला चक्कर आली असेल..."😝😝😝😝😝

पूल आणि भींत दोन्ही बनवायला
एक सारखाच साहित्य लागत

पण पुल लोकांना जोडायच काम करतो..,
                 आणि
भिंत वेगळ करायच काम करते ..

मनुष्याला पण परमेश्वराने एक सारखच बनवलय..,
पण कोण कस "आचरण " करत हे त्याच्या संस्कारांवर अवलंबून आहे .
     🍂🍃शुभसकाळ🍃🍂

नातं म्हणजे काय ?
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

एका गावात एक पोस्टमन पत्रवाटप करायचा. एके दिवशी एका घरासमोर उभा राहून त्याने आवाज दिला, "पोस्टमन ssssss"
आतून एका मुलीचा आवाज आला,. "जरा थांबा, मी येतेय"
दोन मिनिटे झाली, पाच मिनिटे झाली. दार काही उघडेना. शेवटी पोस्टमन वैतागला. आणि जोरात म्हणाला, "कुणी आहे का घरात ? पत्र द्यायचे आहे"
आतून मुलीचा आवाज आला, "काका, दाराच्या खालच्या फटीतून पत्र सरकवा. मी नंतर घेते"
पोस्टमन, "तसे चालणार नाही, रजिस्टर पत्र आहे. सही लागेल"
पाच मिनिटे पुन्हा शांतता. आता पोस्टमन रागावून पुन्हा आवाज देणार इतक्यात दार उघडले. दारातली मुलगी पाहून पोस्टमन शॉक्ड !! दोन्ही पायाने अपंग असलेली एक तरुण मुलगी दारात उभी होती. काठीच्या आधाराने चालत यायचे असल्याने तिला वेळ लागला होता. हे सगळे पाहून तो पोस्टमन वरमला. पत्र देऊन, सही घेऊन तो निघून गेला.

असेच अधून मधून तिची पत्र यायची, आता मात्र पोस्टमन न चिडता तिची वाट पाहत दारासमोर उभा राहत असे. असेच दिवस जात होते. दिवाळी जवळ आलेली तेव्हा एकदा मुलीने पाहिले की आज पोस्टमन अनवाणी पायानेच आलाय. ती काही बोलली नाही. मात्र पोस्टमन गेल्यावर दाराजवळच्या मातीत पोस्टमनच्या पावलाचे ठसे उमटले होते, त्यावर कागद ठेवून तिने ते माप घेतले. नंतर काठी टेकत टेकत तिने गावातील चांभाराकडे तो कागद देऊन एक सुंदर चप्पल जोड खरेदी केली.

रिवाजाप्रमाणे पोस्टमनने गावात इतरांकडे "दिवाळी पोस्त" (म्हणजे बक्षिशी) मागण्याची सुरुवात केली. अनेकांनी त्याला बक्षिशी दिली. असे करता करता तो त्या मुलीच्या घराजवळ आला. हिच्याकडे काय बक्षिशी मागणार ? बिचारीवर आधीच अपंगत्वाचे दुःख आहे. पण आलोच आहोत तर सहज भेटून जाऊ, असा विचार करून त्याने तिला आवाज दिला. मुलीने दार उघडले. तिच्या हातात सुंदर पॅकिंगचा बॉक्स होता. तो तिने त्याला दिला आणि सांगितले, ही माझ्याकडून बक्षिशी आहे. पण घरी जाऊन बॉक्स उघडा"
घरी येऊन त्याने बॉक्स उघडला. त्यात सुंदर चप्पला, त्याही त्याच्या मापाच्या पाहून त्याचे डोळ्यातून पाणी वाहू लागले.

दुसऱ्या दिवशी पोस्टमन नवीन चप्पल घालून त्याच्या ऑफिसात साहेबांकडे गेला. आणि म्हणाला, " मला फंडातून  कर्ज हवे आहे"
साहेब म्हणाला," अरे आधीच तुझ्यावर कर्ज आहे. पुन्हा आता कशाला ?
पोस्टमन म्हणाला, "मला जयपूर फूट (लाकडी पाय) घ्यायचे आहेत. त्यासाठी हवे आहेत."
साहेब : "पण तुझा मुलगा तर धडधाकट आहे. जयपूर फूट कुणासाठी?
पोस्टमन : "साहेब, जे माझ्या धडधाकट मुलाला उमजले नाही, ते एका परक्या अपंग मुलीला उमजले आहे. माझे "अनवाणी" दुःख तिने कमी केले आहे. तिच्यासाठी मी किमान कर्जाने ना का होईना पण पाय घेऊन देऊ शकतो. म्हणून कर्ज हवे आहे.

साहेबासह सर्व स्टाफ निशब्द !! सारेच गहिवरलेले!!

नाती ही केवळ रक्ताची असून भागत नाही ! तर नात्याची भावना रक्तात असावी लागते. ती ज्याच्या अंगी, (मग भले ही तो कुटुंबातला नसला तरी) तो आपला नातेवाईक मानायला हरकत नाही !!

Hsc and SSC Exam Timetables 2017

🚺 *दहावीचे वेळापत्रक* 🚺
तारीख वेळ विषय

७ मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - मराठी
९ मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - हिंदी
११ मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - इंग्रजी
१४ मार्च - सकाळी ११ ते दुपारी १ - बीजगणित
१६ मार्च - सकाळी ११ ते दुपारी १ - भूमिती
१८ मार्च - सकाळी ११ ते दुपारी १ - विज्ञान - १
२० मार्च - सकाळी ११ ते दुपारी १ - विज्ञान - २
२२ मार्च - सकाळी ११ ते दुपारी १ - इतिहास
२५ मार्च - सकाळी ११ ते दुपारी १ - भूगोल

🚺 *बारावीचे वेळापत्रक*🚺
तारीख वेळ विषय

२८ फेब्रु सकाळी ११ ते दुपारी २ इंग्रजी
२ मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - मराठी
४ मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - भौतिकशास्त्र
६ मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - गणित
८ मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - रसायनशास्त्र
१० मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - जीवशास्त्र
१४ मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - इतिहास
१७ मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - भूगोल
२० मार्च -११ ते १.३० आयटी (शिक्षणशास्त्र प्रविष्ट परीक्षार्थी वगळून ) आणि इतर ‍व्यावसायिक विषय पेपर -१
२२ मार्च - सकाळी ११ ते दुपारी १.३० आयटी (ग्रंथलाय व माहितीशास्त्र प्रविष्ट परीक्षार्थी वगळून ) आणि इतर ‍व्यावसायिक विषय पेपर -१

HSC SSC EXAM TIMETABLE 2017

Dr. A. H. Salunkhe Sir
(डॉ. आ. ह. साळुंखे) -

आपल्या भारतीय शिक्षणव्यवस्थेचे स्वतःला बुद्धीजीवी समजणाऱ्या मुर्ख
लोकांनीच बारा वाजवलेत...

पहा ते कसे...

शाळेत पहीला तास मराठीचा
शिक्षक शिकवितात
-ज्ञानेश्वरांनी निर्जीव भिंत हवेत
चालवली.

दुसरा तास विज्ञानाचा
शिक्षक शिकवितात -
निर्जीव वस्तुला चेतना नसल्यामुळे ती
जागची हलु शकत नाही.

परीक्षेत प्रश्न आला
चूक कि बरोबर ते लिहा....
प्रश्न- निर्जीव वस्तू हालचाल करू शकते ??
आता बोला विद्यार्थ्याने परीक्षेत काय
उत्तर लिहायचे ?
चूक कि बरोबर ?
आणि जरी कसेबसे त्याने उत्तर लिहिले तर
त्याला कोणत्या दर्जाचे शिक्षण मिळाले
हे आपल्याला कळलेच असेल .

आता तो जागतिक स्पर्धेच्या युगात टिकेल
काय??
अजिबात नाही !
आमच्या राष्ट्राची प्रगती होत नाही
कारण हेच...
आमच्या शिक्षणव्यवस्थेवर स्वतःला
बुद्धीजीवी समजणाऱ्या मुर्ख लोकांचे
नियंत्रण आहे....

भटशाहीचे स्तोम माजवण्यासाठी
भ-भटजीचा,
य-यज्ञाचा
आम्हाला लहानपणापासून शिकववतात आणि
अज्ञानाचा पाया घट्ट करतात.....

यांचे उच्चाटन केल्याशिवाय राष्ट्राची
प्रगती शक्यच नाही.....

अमावस्या आली की बाजारात
"काळ्या बाहुल्या"
(त्याला मिरची,
बिबवा, लिंबू इत्यादि साहित्य
बांधलेलं असत) विक्रीला येतात.
काही अनर्थ घडू नये म्हणून
अमावास्येला घरावर किंवा दुकानावर काळ्या बाहुल्या टांगल्या जातात.मोठ्या बिल्डींगवर अवाढव्य
बाहुल्या टांगल्या जातात. पण
या भारतात

छत्रपती शिवाजी महाराज एकमेव
विज्ञानवादी राजा झाले.
शिवरायांनी ३५० किल्ले बांधले
पण अमावस्येला एकही किल्ल्यावर
"काळी बाहुली" टांगली नाही.
तरीसुद्धा काहीच अनर्थ घडला नाही. जे
शिवरायांचे मावळे नाहीत ते
आजही २१ व्या शतकात
अमावस्येच्या रात्री घराच्या बाहेर
पडायला घाबरतात. पण छत्रपती शिवरायांनी अमावास्येच्या रात्री गडद काळ्या अंधाराच्या फायदा  करून शेकडो लढाया जिंकल्या.
या घटनेवरून शिवरायांच्या आजच्या मावळ्यांनी बोध घ्यावा...

एक ब्राह्मण दुपारी भिक्षा मागण्याकरीता एका दारात उभा राहीला , ''ॐभवती भिक्षांदेहि " अशी गर्जना केली.

घरात एकटीच म्हातारी होती, ती म्हणाली, "महाराज ! मी एकटीच आहे, घरात आमटी भात तयार आहे, चार घरात भिक्षा मागण्या पेक्षा आज इथेच जेवा."

ब्राह्मण "हो" म्हणाला

ब्राम्हणाचे पोटभर जेवण झाले ब्राम्हणाने ताक मागीतले.

*भोजनांते तक्रं पिबेत* अस म्हणतात.

नेमकं म्हातारीच्या घरात त्या दिवशी ताक नव्हते.

ती म्हणाली, "थांबा महाराज मी आत्ता शेजारणी कडून ताक घेवुन येते."

तिने शेजारणीला ताक मागीतले , शेजारणीने भांडभर ताक दिले,

आजीने ब्राम्हणाच्या भातावर ताक घातले , ब्राम्हणाने भुरका मारला तो शेवटचाच.
ब्राह्मण तडकाफडकी मेला.

चित्रगुप्त आणि यमधर्माला प्रश्न पडला की, या कर्माचा भागीदार कोण?

कारण ब्राम्हणाने आत्महत्या केली नव्हती.

म्हातारीने अतिथीधर्म पाळला होता तिने ब्राम्हणाला मारले नव्हते,दारात आलेल्या अतिथ्याला पोटभर जेवण दिले होते.

शेजारणीने शेजारधर्म पाळला होता कोणी दारात मागायला आले तर नाही म्हणू नये म्हणून तिने ताक दिले होते. आणि ताक पिवुन ब्राह्मण मेला होता कारण त्या ताकात विष होते आणि हे विष एका नागाच्या तोंडातून ताकात पडले होते.

यमधर्माने नागाला जाब विचारला, नाग म्हणाला यात माझा काय दोष ? घार मला पकडून आकाशमार्गे चालली होती,माझे तोंड खाली झाले होते त्यामुळे माझ्या तोंडातील गरळ त्या ताकात पडली म्हणून ब्राह्मण मेला.

यमाने घारीला जाब विचारला , घार म्हणाली यात माझा काय दोष ? सापाला पकडून खाणं हा माझा धर्म आहे.

प्रत्येकाने आपला धर्म पाळला होता मग आता कर्माचा भागीदार कोण ? कोणाच्या माथी मारायचे हे कर्म ?

चित्रगुप्त यमाला म्हणाला, "चला माझ्याबरोबर या कर्माचे भागीदार मी तुम्हाला दाखवतो."

दोघेही गुप्तरूपाने ब्राम्हण मरून पडला होता तिथे आले.

हा!हा! म्हणता संपूर्ण गावात बातमी पसरली की, म्हातारीच्या घरी ब्राह्मण जेवता जेवता मेला.

हळुहळु आळीतल्या बायका तिथं जमल्या.

शांताबाई उज्वला ताईना म्हणाल्या, "काय हो उज्वलाताई ब्राम्हण कसा मेला कळले का हो ?"

उज्वलाताई म्हणाल्या, "नाही हो"

तेंव्हा शांताबाई म्हणाल्या, "आहो कसं सांगु s s s तुम्हाला , या ब्राम्हणाकडे भरपूर द्रव्य होते , म्हातारीने भोजनात विष घालून त्याला ठार मारले व त्याचे द्रव्य हडप केले."

चित्रगुप्त यमाला म्हणाला पहिल्या क्रमांकावर हिचे नाव लिहा.

आणि तिथे जे जे या घटनेबद्दल बोलत होते त्यांची नावे रजिस्टर मधे लिहुन त्यांच्या माथी मारले गेले.

थोडक्यात कर्माचा इतका सूक्ष्म विचार केला आहे. एखाद्या घटने बद्दल सत्य माहीत नसताना बोलणे हे सुद्धा पाप आहे.

म्हणून आजचा सुबोध दिला आहे.
प्रत्येकाच्या कानात आणि डोळ्यात देवाने चार बोटाचे अंतर ठेवले आहे.

त्याचे कारण *जोपर्यंत एखादी घटना तुम्ही प्रत्यक्ष स्वतःच्या डोळ्यांनी पाहत नाही तो पर्यंत कोणाच्या तरी तोंडून निघालेली बातमी कानाने ऐकून तुमच्या तोंडाने बोलू नका हे सुद्धा एक प्रकारचे पापच आहे.*
*माणसाचे " मी "बरेच नुकसान करतो*
*मी* का बोलू ?
*मी* का फोन करू ?
*मी* का कमीपणा घेऊ ?
*मी* का नमते घेऊ ?
*मी* का नेहमी समजून घ्यायचं ?
*मी* काय कमी आहे का ?
असे बरेच सारे *"मी"* आहेत
जे आयुष्यात विष कालवतात.
*म्हणून मी पणा सोडा व नाती जोडा.*
=================
*" आयुष्य खुप सुंदर आहे "

जीवनात दोन गोष्टी वाया जाऊ
द्यायच्या नाहीत...........
*अन्नाचा कण*
आणि
*आनंदाचा क्षण*
नेहमी हसत रहा..😊☺☺☺
💞💞  💞💞
आयुष्यात 🏡 🚕 💵 *संपत्ति* कमी मिळाली तरी चालेल...
पण  *नाती* 👫 अशी मिळवा की कोणाला त्याची किम्मत पण करता येणार नाही.........           *                      🌺🌺Good  mrning 🌺🌺*

✊ झाकलेल्या मुठीतून वाळूचा⌛कण निसटावा तस हळू हळू आयुष्य निघून चाललंय…
आणि...
आपण उगीच भ्रमात आहोत कि 👉आपण वर्षा वर्षाने मोठ होत चाललोय...

❤प्रेम "माणसावर" करा त्याच्या "सवयीवर" नाही… .
😔 "नाराज" व्हा त्याच्या बोलण्यावर पण "त्याच्यावर" नाही… .
�विसरा" त्याच्या "चुका" पण त्याला नाही… .
कारण "माणुसकी" पेक्षा मोठ काहीच नाही…
      😴शुभ रात्री😴

राग सोमवारी आला तर...
त्याला सांगा की...
आज आठवड्याची सुरुवात आहे, आज नको येऊस

राग मंगळवारी आला तर…
म्हणा…
आज मंगलदिन आहे, मग
आज अमंगल कशाला...?

राग बुधवारी आला तर...
त्याला म्हणावं…
बुध तर शुद्ध असतो.
त्यादिवशी हे अशुद्ध कशाला

राग गुरुवारी आला तर …
म्हणा…
आज गुरूचा दिवस आहे,
मन शांत राहू दे…

राग शुक्रवारी आला तर....
म्हणा…
आज देवाला शुक्रिया अदा करण्याचा दिवस,
आज कशाला येतोस...?

राग शनिवारी आला तर...
म्हणा…
शनीच्या दिवशी तुझी पीडा कशाला...?
नकोच येऊस तू...

आणि

राग रविवारी आला तर ...
म्हणा.…
आज तर येऊच नकोस.
आज रविवार आहे.
म्हणजे सुट्टीचा दिवस.

😃नेहमी आनंदात राहा.
हसत राहा😊😃😄😀
आणि हो,.....
कधी रागावू नका...
     💐💐शुभ सकाळ 💐💐