आवडत्या व्यक्तीला वेळ देऊ शकला नाही तर दुरावा  वाढतो,_*
 अंतर वाढते यात चूक तुमची पण नसते,
आणि त्यांची पण नसते,
चूक वेळेची असते.....
 *_जीवाला जीव देणारी माणसं खूप कमी असतात त्यांना असे गमावू नका.

बीवी: सुनो जीआपने काम वाली बाई को i love you बोल दिया क्या??.
.
पती: नहीं तो, क्यों क्या हुआ?
.
Wife: कल तक मुझे भाभी बुलाती थी, आज दीदी बुला रही है।
😝😝😝😝😂😂😂

*सैराट* बघितल्या नंतर
*पाटील* आडनावाच्या मुलीचा स्टेटस
.
.
.
.
.
.
.
.
.
.नो प्रिन्स...आय एम *एकुलती एक*😊
😂😂😜😃😜😂

काल अचानक wi fi बंद झाले।
खुप राग आला...

चौकशी केली तेंव्हा समजले,,
शेजाऱ्याने 2 महीने पैसेच भरले नाहीत।।

किती बेजबाबदार लोक असतात ह्या जगात ।।।
😡😝😂😝😂😝😂

प्रश्न -

प्रेम लग्नाआधी करावं का
लग्नानंतर?

उत्तर -

कधिही करा फक्त बायकोला सांगू नका.
😆😆😆😆😆😆😆

कुठे गेले ते समाजसेवक ?
कुठे गेल्या त्या दानशूर व्यक्ती ?

थंडीत कपडे, स्वेटर, ब्लैंकेट वाटत फिरत होते,                                                                                                                                                        

आणि आता या मरणाच्या उन्हाळ्यात 
थंड  थंड  बियर वाटणे
हे  त्यांचे कर्तव्य नाही का ? 
🍺🍻❄तापलेले मुंबईकर

श्रेष्ठता जन्माने मिळत नाही.
ती आपल्यामध्ये असलेल्या गुणांवर मिळते किंवा मिळवावी लागते.
दही,  दुध व तुप यांचे मुळ जरी एकच असले तरी या सगळ्यांची किंमत वेगवेगळी असते.
💐 शुभ 🌞सकाळ 💐

😜😜👉 उखाणे..😂

श्रावणात बरसती रिमझिम धारा
मी पिते कॉफी हे घालतात वारा

****😂😄😜
एका हातात पिशवी, एका हातात रुमाल
नवरा बरोबर असताना हवा कशाला हमाल?

******😜
बशीत बशी ... बशीत बशी
माझी बायको उर्वशी, बाकी सगळ्या म्हशी ....

******😜

इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले ग पाय
----- अजुन आले नाहीत, पिऊन पडले की काय?
😄

खोक्यात खोका टि.व्ही.चा खोका
मी तुझी मांजर तु माझा बोका

*****😜
विड्याच्या पानावर पाव शेर कात
गणपतरावांच्या कमरेत घातली गाढवाने लाथ..

*****😄

गुलाबाचं फूल वार्‍याने हळूहळू उकललं
---- गेले कचरा टाकायला, त्यांना डुकराने ढकलल...😛😄😜😂

बस स्टाॅपवर काही मुली गप्पा मारत उभ्या होत्या.
पहिली :- अगं किती गुण मिळाले ?
दुसरी:- जरा कमीच मि ळाले... 93%.
तिसरी:- मला पण जरा कमीच मिळाले...95%
पहिली:- जाऊ दे गं....असंही 97% पडले तरी कुठे 98%😎 वाला मिळणार....37% वाल्याबरोबरच लग्न कराव लागणार हाय...😬😬😬
😂😂😂😂😂😂😂😂

दारूचा स्टाॅक संपत नाही
तंबाखू-शिगरेट चा स्टॉक संपत नाही
ऐवढच काय तर गुटका बंदी असुनही गुटक्याचा स्टॉक
कधी संपत नाही.
तर मग ऐण पेरणीच्या दिवसात खता-बियांण्याचा
स्टॉक कसा काय संपतो......?
आणी वाढीव पैसे देताच लगेच कसा काय उपलब्ध
होतो.....
दलाल व्यापार्यांनो पुरे करा हा हरामखोरपणा.....
.
बस करा आता शेतकर्यांना लुबाडुन खाणं. ....
कारण,
ज्या दिवशी आम्हा शेतकर्यांचा अन्नधान्याचा
स्टाँक संपेल ना
तेव्हा तुम्हाला भिक पण मिळणार नाही.
सर्वानसाठी पोस्ट केला पन
जगाचा पोशिंदा शेतकऱ्यासाठी एक पोस्ट
मनापासून पटल तर शेयर करा.
कधी मोकळ्या आकाशाखाली तुमची कमाई ठेवून बघा,
रात्रभर झोप नाही येणार.
विचार करा शेतकऱ्याच कस होत असेल !!👥👥

वाचता नाही अंगावर काटा उभा रहावा अशी ही कविता... खुप खुप छान लिहिलीय...
.
👍 शप्पत नक्की वाचा.👍
🌺"साद आईची"🌺
महिनेमागून महिने,
शेवटी वर्ष सरुन जाते
वृध्दाश्रमाच्या पायरीवर ,
वाट तुझी पाहाते
भिजून जातो पदर ,
अन मन रिते राहाते
कधी मधी मात्र ,
तुझी मनीऑर्डर येते
पैसे नकोत यावेळी ,
तूच येऊन जा
बाळा मला तुझ्या ,
घरी घेऊन जा
तुझा बा होता तोवर ,
काळ बरा गेला
तुझी आठवण काढत ,
उघड्या डोळ्यांनी गेला
शेवटपर्यंत सांगत होता,
लेक माझा भला
तू मोठा साहेब,
त्याचं मोठं कौतुक त्याला
माझ्याही ह्रदयात फोटो,
तुझा तू पाहून जा
बाळा मला तुझ्या ,
घरी घेऊन जा.
दुष्काळाच्या साली ,
जन्म तुझा झाला
तुझ्या दुधासाठी ,
आम्ही चहा सोडून दिला
वर्षाकाठी एक कपडा,
पुरवून-पुरवून घातला
सालं घातली बापाने,
पण तुला शाळेमधी घातला
हवं तर तू हे ,
सगळं विसरुन जा
पण बाळा मला ,
तुझ्या घरी घेऊन जा.
धुणी-भांडी करीन मी,
केरकचरा भरीन मी
पुरणपोळ्या, अळुवड्या ,
तुझ्यासाठी रांधीन मी
नातवंडांचं दुखलं-खुपलं ,
सगळं बघेन मी
घाबरु नकोस, त्याची आजी ,
असं नाही सांगणार नाही मी
तुझ्या घरची कामवाली ,
म्हणून घेऊन जा
पण बाळा मला
तुझ्या घरी घेऊन जा.
थकले रे डोळे बाळा,
प्राण कंठी आले
तुझ्याविना जगणे
आता मुश्किल झाले
विसरु कशी तुला मी,
तुझ्यामुुळे आई झाले
बाळ माझं 'कुलभूषण'
पोरकी मी का झाले?
आता माझ्या थडग्यापाशी
'आई' म्हणून जा
जमलंच तुला तर
हा वृध्दाश्रम पाडून जा.

" सैराट " - जसा दिसतो तसा नाही..

       वाचा नाना पाटेकर
       यांचे मनोगत.....

कृपया चुकीचा बोध घेऊ नका.....   !

पहिली बाजू प्रेमाचा अवखळपणा , मौजमजा भले दाखवून गेली पण प्रेमाने पोट भरत नाही , त्यासाठी खूप मोठी किंमत मोजावी लागते जी आर्ची ने बरोबर आणलेल्या पैशापेक्षा कितीतरी मोठी होती . हे पाहणं गरजेचं आहे , बुलेट चालवणारी आर्चीची नंतरची अवस्था ही अविचाराने केलेल्या प्रेमाचंच फळ होतं , नंतर जरी ती स्थिर झाली तरी दोघांच्या कुटुंबाचे झालेले हाल हा त्यांच्या प्रेमाचाच दोष होता , राजकीय वर्तुळात वावरणा-या तिच्या वडीलांना पदोपदी मानहानी पत्करावी लागली आणि अतिशय गरीब , परश्याच्या कुटुंबाची तर वाताहात झाली , यासाठीच प्रेम करायचे असते का ? आपल्यासाठी काबाडकष्ट करणा-या , आपल्या कडून अनेक अपेक्षा ठेऊन सुखी आयुष्याची स्वप्न बघणा-या परशाच्या आईवडीलांचं कुठे चुकलं ? प्रेमासाठी जीव देण्यात शहाणपण नाही तर ज्या आईवडीलांनी आपल्या जन्मापासून आपल्यावर प्रेम केलं त्यांच्यासाठी जगावं आणि त्यांनाही सन्मानानं जगवावं ... हे सांगतो हा सैराट चित्रपट !

 सैराट....मूल/मूली फक्त त्या चित्रपटातली love story बघतात..पण त्यांच्या कुटुंबाला झालेला त्रास..त्यांची गेलेली इज्जत कोणी लक्षात घेत नाही...प्रेम 100% करा..पण वेळ आल्यावर ते घरी संगण्याची हिम्मत देखील ठेवा...घरच्यांची परवानगी घ्या.. नाही दिली तर प्रयत्न करा...पण हे पळून जाण वगेरे हे असले भंगार चाळे करू नका...ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला..लहनाच मोठ केल..एवढे वर्ष पाळल...त्या आई वडिलांना सोडून 2/3 वर्ष भेटलेल्या मुला/मूली सोबत पळून जाण योग्य नाही....

नाना पाटेकर....

प्रारब्धाचा हिशेब :

एक दिवस एक माणूस पूर्व सुचना न देता कामावर गेला नाही .
मालकाला वाटलं ह्याचा जर पगार वाढवला तर हा काम मन लावून करेल .....
म्हणून पुढच्या वेळेस मालकाने पगारा व्यतिरीक्त त्याला पैसे वाढीव दिले ......
तो काही बोलला नाही , त्याने चुपचाप मिळालेले पैसे ठेवून दिले .......
काही महिन्यानंतर परत तसच घडलं .... तो पुर्वसुचना न देता गैरहजर राहीला ...
मालकाला त्याचा खूप राग आला आणि त्याने विचार केला कि, याचा पगार वाढवून काय फायदा झाला ???
हा काही सुधारणार नाही .....
पुढच्या वेळेस मालकाने त्याला वाढवलेला पगार कमी करून त्याच्या हाती पगार दिला .....
त्याने कुठलीही तक्रार न करता चुपचाप पगार घेतला .....
मालकाला खूप आश्चर्य वाटलं .
अखेर न राहवून त्याने त्याला विचारलं , '' मागच्या वेळेस तू गैरहजर राहीलास तरी तुझा पगार वाढवला ....तेंव्हा सुद्धा तू काही बोलला नाहीस , आणि ह्या वेळेस सुद्धा तू न पूर्वसुचना गैरहजर राहीलास म्हणून तुझा वाढवलेला पगार कापला ....
तरीही तू काही बोलत नाही,,,, असं का ?????
त्यावर त्याने दिलेलं उत्तर विचार मनाला भिडणारं होतं ..

''तो म्हणला , मालक पहिल्या वेळी मी गैरहजर राहीलो त्यावेळी मला मुलगा झाला होता ...... तुम्ही माझा पगार वाढवलात तेंव्हा मी विचार केला , देवाने माझ्या मुलाचा पालनपोषणाचा हिस्सा पाठवला .......
दुस-यांदा जेंव्हा मी गैरहजर राहिलो तेंव्हा माझ्या आईचं निधन झाले होते आणि तुम्ही माझा वाढवलेला पगार कापलात ......
मी मनाशी विचार केला माझी आई तिचा वाटा तिच्या बरोबर घेऊन गेली .
मग मी ह्या पगाराबद्दल चिंता का करू ??
ज्याची जबाबदारी खुद्द देवाने घेतली आहे ........

तात्पर्य -
जिवनांत काय मिळवलसं आणि काय गमावलसं असं जर कुणा विचारलं तर ,
बेशक सांगा , जे गमावलं तो माझा अविचार होता आणि जे कमावलं ती माझ्या सदगुरुची कृपा होती.

''खूप सुंदर नाते आहे माझ्यात व निराकारात ....''
''जास्त मी मागत नाही आणि कमी तो देत नाही .......👍👌👌
यालाच प्रारब्ध म्हणतात.....
-
वाचा फक्त १ मिनिट लागेल
.
बाजारातुन परत घरी येताना काही खाण्याच मन
झाल..
म्हणुन ती मुलगी पाणीपुरीच्या ठेल्यावर थांबली..
एकटी मुलगी पाहुन शेजारीच असलेल्या पान
टपरीवरची काही मुले ही त्या ठेल्यापाशी आली..
.
त्यांनी त्या मुलीला छेडायला चालु केल..
अश्लिल गाणी आणी संवाद चालु केला..
घाणेरडी नजर त्या मुलीच्या देहावरुन फिरत होती..
बिचारी आगोदर पैसे दिल्याने तिला तेथुन जाता ही
येत नव्हते..
आपली ओढणी संभाळत..
"भैया जल्दी दो"..
या पलिकडे ती काहीच बोलत नव्हती..
घाबरलेली तिची नजर फक्त खाली पाहत होती..
.
तेवढ्यात तिथे एक तरुण युवक आपल्या बाईक वरुन येऊन
तेथे थांबला..
.
आधिच मनात कल्लोळ चालु असताना त्यात आजुन एक
ती पुर्ण भेदरुन गेली..
.
तेवढ्यात तो युवक बोलला..
" आरे अंजली तु इथे कुठे" भावाला एकट्याला सोडुन
पाणी पुरी खातीयेस काय?"
.
संकटाची संभावणा पाहुन तिथली बाकीचे मुले चालते
झाले..
आपल्यावरच संकट टळलेल पाहुन मुलीन मोकळा श्वास
घेतला..
.
न राहुन तिने त्या युवकाला विचारल..
"माफ करा माझ नाव अंजली नाही पुर्वा आहे"
.
तो युवक हसत बोलला "काय फरक पडतो.. तु आहेस तर
कुणाची तरी बहिणच ना"?
.
आणी तो युवक आपल्या डोक्यावर हेल्मेट चढवुन तेथुन
निघुन गेला..
.
त्या पाठमोर्या जाणार्या युवकाकडे पाहुन त्या
मुलिची मान आभिमानाने उंचावली...
.
कारण त्याच्या टी शर्टावर लिहिले होते..........
💐 💐 आम्ही शिवभक्त 💐 💐
.
रोज जोक शेअर करतात पण आज ही पोस्ट पण शेअर
करा..........

प्रेम म्हणजे...💓💓💓............?

मला माझ्या मित्राने विचारले की प्रेम म्हणझे नेमके काय?

मी त्याला सागितले की ...

कितीही जवळ जाणार असेल तरी गाडी सावकाश चालव आणि पोहचल्यावर फोन कर असे आईचे काळजीचे बोल म्हणजे प्रेम. 💕💖💞💖💕💞

दिवाळीला स्वतःसाठी साधे कपडे न घेता मुला-मुलीसाठी त्यांच्या पसंतीचे महागातले जीन्स आणि कपडे घेणारे बाबा म्हणजे प्रेम. 💕💖💞💕💖

कितीही मस्ती केली व रात्री लेट झाले तरी आई-बाबाना न सांगता हळूच दार उघडणारे आजी-आजोबा म्हणजे प्रेम. 💖💕💞💕💞💖💕💖💞

कितीही वाद झाले तरी   जेवलास का अशी विचाणारी बहिण म्हणजे प्रेम. 💖💕💞💕💖💕💞💖💕

पगार कितीही कमी असेल तरी दिवाळीत भाऊबीजला बहिणीच्या पसंतीचे घड्याळ घेणारा भाऊ म्हणजे प्रेम. 💞💕💖💕💖💞💕💖

आणि या सर्वांची काळजी घेवून स्वतःची काळजी न करता सकाळी पहाटे उठून जेवणाचा डबा बनवणारी बायको ... 
म्हणजे प्रेम! 💕💖💞💖💕💞

कुणाचा  रिप्लाय येवो अगर न येवो, तरीही नियमितपणे एसएमएस पाठवीत रहाणारा मित्र म्हणजे प्रेम❗💕💕💖💖💞💞💕💕 आवडल तर👏जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा👏

कोन बुद्धीवान


ओळखा पाहु😇
पहिली दोन अक्षरे घेतली तर तीर्थक्षेत्र

दूसरा आणि तीसरा शब्द घेतला तर एक पदार्थ

तीसरा व चौथा शब्द घेतला तर देवाचे नाव

चारही शब्द घेतले तर एक माणसाचे नाव
वेळ पण शिकवते आणि गुरु पण शिकवतात ,
दोघात फरक फक्त इतकाच आहे कि,
गुरु शिकवून परीक्षा घेतात आणि
 वेळ मात्र परीक्षा घेऊन शिकवते………. !!
जीवनातील एक कटू सत्य:
तुम्ही शिकून स्वतः च्या पायावर उभे राहीपर्यंत....
...
...
...
...
...
...
...
...
तुमच्या वर्गातील मुलींची मुले स्वतःच्या पायाने चालायला लागलेली असतात !

शिवराज्याभिषेक दिन 06 June

आज शिवराज्याभिषेक दिन
तो नेत्रदीपक सोहळा...
रायगडाने पाहिला...
जेव्हा मराठ्यांच्या धनी....
छत्रपती जाहला..
प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, हिंदवी स्वराज्य संस्थापक, महाराजाधिराज महाराज, श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज कि जय…!!! ""

.           *|| कहाणी मुंबईची ||*

एक शहर आहे जगात
म्हणतात ते फार वेगळे आहे,

*हि मुंबई आहे इथे असेच असते.*

सकाळी उठणे हे सुद्धा एक काम आहे,
रात्रीची झोप हा फक्त काल्पनीक आराम आहे,

दात घासणे, आंघोळ करणे यासाठी पुरेसा वेळ नाही,
नाश्ता करत असताना तयारी करणे यापेक्षा मजेशीर खेळ नाही,
देवासमोर एक मिनीट हिच आमची देवपुजा असते,
*हि मुंबई आहे इथे असेच असते.*

बिल्डीँगचा गेट सोडला कि रांगांची रांग लागते,
रिक्षा बस ट्रेनचे टिकीट अगदी काहिहि कारण चालते,

रस्त्यावरून चालणारा प्रत्येक माणुस धावत असतो,
मिनीटाला शंभर पाऊले असा इथे नियम असतो,
रस्ता आपल्याच बापाचा समजून चालायचे असते,
*हि मुंबई आहे इथे असेच असते.*

शिव्या देत शिव्या खात प्लँटफाँर्मवर पोहोचायचे असते
मुंग्यांमधली साखर शोधावी तसे मित्रांना शोधायचे असते
ट्रेनमधले मित्र मैत्रीला जागणारे असतात

एकामुळे दुसऱ्याला जागा मिळेल असे जागा अडवून बसतात
रिझर्वेशन नसुनही प्रत्येकाची जागा फिक्स असते
*हि मुंबई आहे इथे असेच असते.*

घरी पोहोचण्याचा विचारच फार आनंददायी असतो
पण पुन्हा ट्रेन बस हा विचारच मनाला टोचत असतो

आईच्या हातचा चहा हेच घरी पोहोचल्याचे समाधान
तिची सिरीयल माझी मँच यासाठी रिमोटची ताणाताण
ब्रेक वगळून एकाच वेळी तीन सिरीयल पहायची असते
*हि मुंबई आहे इथे असेच असते.*

जेवणानंतर लगेच झोप एक वाईट सवय आहे,
म्हणूनच बाहेर फेरफटका आता आमची गरज आहे,

एका तासात चाळीतल्या नव्या जुन्यांची खबर होते,
आपणही याचा एक भाग आहोत याची गोड जाणीव होते,
झोपण्यासाठी नव्हे तर सकाळी उठण्यासाठी घरी परतायचे असते,
*हि मुंबई आहे इथे असेच असते.*

असाच हा नित्यक्रम सोमवार ते शुक्रवार असतो,
पण बाकिचे दोन दिवस आमचा दिनक्रम बदलतो,

जे पाच दिवस भेटले नाहीत असे मित्र भेटतात,
मग थिएटर, पब, बिचेस, टेरेस सगळी ठिकाणे गाजवतात,
आईला एक दिवस आराम हे बाहेर जेवण्याचे कारण असते,
*हि मुंबई आहे इथे असेच असते.*

असा हा आठवडा त्याचेच महिने घडावे,
दिवसातील चोवीस तासही इथे कमी पडावे,

अशी हि श्रमाची बँक जिथे तक्रार काउंटर नाही,
मैत्रीचे व्याज मिळत राहते पण जास्त नोटा मात्र नाहीत,
शोधनाऱ्यासाठी सगळे आहे फक्त वेळ मात्र मिळत नसते,
*हि मुंबई आहे इथे असेच असते. .......*