एकदा बस स्टोप समोर एक मुलगा सिगारेट ओढत असतो.
तिथे एक मुलगी येते....
मुलगी : आता पर्यंत तुम्ही जितकी सिगारेट ओढली आहात तेच जर पैसे जमा केले असते तर समोर उभी असलेली मार्साडीज कार तुमची असती...
मुलगा : तुम्ही सिगारेट ओढता
मुलगी : नाही
मुलगा : मग ती कार तुमची आहे का ?
मुलगी : नाही , अस का विचारत आहात ?
मुलगा : ती कार माझी आहे ....
तात्पर्य : नको तिथे जास्त शहाणपणा दाखवला कि असा पोपट होतो ..

21st century

आदर व्यक्त करण्याची पध्दत.....
जुन्या पिढ़ीत, मोठी व्यक्ति समोर आली की
डोक्यावरची टोपी काढत असत...
आताची पिढ़ी कानातून हेडफोन
काढते..

स्वप्नं अशी बघा की पंखाना बळ येईल
       मैत्री अशी करा की  जग आपलं होईल
  अपयश असं स्वीकारा की विजेता भारावेल
माणूस असे बना की माणूसकी नतमस्तक होईल
    शिष्य असे बना की जगाला शिकवता येईल
         प्रेम असं करा की जग प्रेमळ होईल
                 प्रगती अशी करा की
          भगवंत आणि कुटुंब आनंदी होईल
     आणि एकमेकांना सहकार्य इतकं करा की
         आपल्या जीवनाचं सार्थक होईल ..

Kanda

चिंगी : कशी होती तुझी पहिली बॉय फ्रेंड सोबत
पहिली भेट ..
टिंगी : मस्त होती .. मुलगा मोठ्या घरचा आहे ..
चिंगी : कस काय समजल तुला ?
टिंगी : जेव्हा जवळ
आला तेव्हा तोंडातून कांद्याचा वास आला
😝😝😝😝😝😝😝😝

Adminchi chamaki

Admin ची आई म्हनालेली माझा मुलगा....एक ना एक दिवस चमकणार*****
मग काय???????









घेतली चमकी लावली तोंडाला!!!
दिवस काय!!! रात्री पन चमकत होता ना.. भाऊ
😂😂😂😂😂😂😂

Kavita vinod

😜लहान  जोक. ..😛
नवरा :मला "कविता" आवडते ....



बायको :मलापण "विनोद" आवडतो..... 😆..😝✨

म्हणे दाऊदचा पाकमधला पत्ता सापडला..!
बर..मग आता त्याला काय पोस्टानी लग्नपत्रिका पाठवायची का..?

राव प्रत्येक वेळी ते चढुन गेल्यावरच आम्ही
आमचा पराक्रम दाखवायचा का.?
घुसुन मारणं कशाला म्हणतात माहीतीये का..?
दिनांक 5 एप्रिल 1663.. रमजान महिन्यातली रात्र..
सव्वा लाख फौजेच्या मधोमध केवळ मुठभर
जिगरबाज जीवलग घेऊन शिवराय लाल
महालात घुसले आणि शाईस्तेखानाची बोटे
छाटुन,एकही सैनिक नं गमावता बाहेर पडले..!
जास्तित जास्त सैन्याचा..कमीत कमी
सैन्याने
कमीत कमी वेळेत केलेला जगातला एकमात्र पराभव..!
हो पुर्ण पराभव..आज बोटं गेलीयेत,
उद्या मुंडकं जाईल या भितीनं शाईस्ता पुण्यातुन
अक्षरशः पळाला..याला म्हणतात घुसुन मारणं..!
मातृभुमीच्या दुश्मनांना धाक या भवानीने बसतो..

🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹

● ओढ म्हणजे काय ते जीव
लावल्याशिवाय कळत नाही.....

● प्रेम म्हणजे काय ते स्वतः
केल्याशिवाय कळत नाही....
.
.
.
.
.
.
.
.
.
Kokan म्हणजे काय ते गणपतीला गावी गेल्याशिवाय कळत नाही....🚗🚘🚕🚌🚒

तो तीला म्हणाला , " क्या हुआ
तेरा वादा ... "

तो तीला म्हणाला , " क्या हुआ
तेरा वादा ... "
ती म्हणाली,
" आता मी दुसरा पकडलाय,
आज पासुन तु माझा दादा..."

Happy Raksha Bandhan In Advance All Group Members

😜😜😜😜😜😜😜

Gharacha artha

जिथे नेहमी घरघर चालु असते
त्याला घर म्हणतात

जिथे नेहमी होम-हवन चालतात
त्याला Home म्हणतात

जे हौसेने बांधलेले असते
त्याला House म्हणतात

जी हवेशीर बनलेली असते
तिला हवेली म्हणतात

जी कोटि रुपये खर्चून बनली
तिला कोठी म्हणतात

ज्याच्या भिंतीलाही कान असतात
त्याला मकान म्हणतात

जिथे झोप चांगली येते
तिला "झोपडी" म्हणतात.

आणि

.
.
.
.
.
.
.
जिथे कर्जाचे हप्ते फेडून लोक आडवे होतात
त्याला "फ्लॅट" म्हणतात

Prem mhanje kaay

प्रेमाचा अर्थ ...............
सकाळी डोळे उघडण्यापूर्वी ज्याचा चेहरा पाहण्याची इच्छा होते
ते प्रेम आहे..
मंदिरा मध्ये दर्शन करताना जो जवळ
असल्याचा भास होतो
ते प्रेम आहे..
भांडून सुधा ज्याचा राग येत नाही
ते प्रेम आहे..
ज्याच्या कुशीत डोके ठेवल्यावर पूर्ण दिवसाचा थकवा दूर
झाल्यासारखे वाटते
ते प्रेम आहे..
ज्याच्या कुशीत डोके ठेवल्यावर मन मोकळे झाल्यासारखे वाटते
ते प्रेम आहे..
स्वताला कितीही त्रास झाला तरीही ज्याच्यासाठी ख़ुशी मागतो
ते प्रेम आहे..
ज्याला लाख विसरण्याचा प्रयत्
करा विसरता येत नाही
ते प्रेम आहे..
कुटुंबाच्या फोटो मध्ये आई बाबाच्या सोबत
ज्याचा फोटो असावा असे
आपल्याला वाटते
ते प्रेम आहे..
ज्याच्या चुकीना रागावतो आणि नंतर
एकांतात हसू येते
ते प्रेम आहे..
हि पोस्त वाचताना प्रत्येक
ओळीला ज्याची आठवण आली
ते प्रेम आहे...

Janhavi shree

जान्हवी -श्री मी रक्षाबंधन ला पिंटया कडून काय गिफ्ट
मागू
श्री -पाच किलो कांदे माग
जान्हवी -काहिही हं श्री !!😂

कपडे झाले छोटे, लाज कुठुन येणार।
धान्य झाले हाईब्रेड, ताकद कुठुन येणार।
फुल झाली प्लास्टिकची,सुगंध कुठून येणार।
चेहरा झाला मेक अपचा, रुप कुठून येणार।
शिक्षक झाले टुयशनचे, विद्या कुठुन येणार।
भोजन झाले हाँटेलचे तंदुरुस्ती कुठून येणार।
प्रोग्राम झाले केबलचे संस्कार कुठून येणार।
माणसे झाली पैशाची, दया कुठुन येणार।
धंदे झाले हायफाय,बरकत कुठुन येणार।
भक्ति करणारे झाले स्वार्थी, भगवंत कुठून येणार।
मित्र झाले वॉट्सअपचे, भेटायला कुठून येणार.....

झकास संदेश हाय ✋☺☝

Konkan railway stations and telephone numbers

कोंकण रेल्वेची स्टेशन आणी त्यांचे दूरध्वनी क्रमांक
कोलाड,०२१९४-२५००८३
माणगाव,०२१४०-२६३२३०
वीर,०२१४५-२७००५५
करंजाडी,०२१४५-२७२०४४
दिवाणखवटी,०२३५६-२६३०२१
खेड,०२३५६-२६३५९८
अंजनी,०२३५६-२६३८७०
चिपळूण,०२३५५-२५६३७६
कामथे,०२३५५-०५४३५२
सावर्डा,०२३५५-२६४०८२
आरवली रोड,०२३५४-२४४८२४
संगमेश्वर,०२३५४-२५२२३७
उक्शी,०२३५४-२४६२४६
भोके,०२३५२-२४६२२२
रत्नागिरी,०२३५२-२२८९५१
निवसर,०२३५२-२४५२१९
आडवली,०२३५१-२३०१८३
विलवडे,०२३५१-२३६०१६
राजापूर रोड,०२३५३-२२१२२०
वैभववाडी रोड,०२३६७-२५५७२६
नांदगाव रोड,०२३६७-२४८५०९
कणकवली,०२३६७-२३२२४३
सिंधुदुर्ग,०२३६२-२२८७७५
कुडाळ,०२३६२-२२२६०४
सावंतवाडी रोड,०२३६३-२५८३१५
पेडणे,०८३२-२२०१२८३
थिवी,०८३२-२२९८६८२
करमली,०८३२-२२८५७९८
वेर्णा,०८३२-२७५४२८९
माजोर्डा,०८३२-२७९०९०२
मडगाव,०८३२-२७०३९५०
बाळ्ळी,०८३२-२६७०२७०
काणकोण,०८३२-२६४३६४४
अस्नोटी,०८३८२-२६६३६०
कारवार,०८३८२-२८२३७०
हारवाड,०८३८८-२४८३७७
अंकोला,०८३८८-२३०६८०
गोकर्ण रोड,०८३८६-२७९४८७
कुमठा,०८३८६-२२३८२०
होन्नावर,०८३८७-२३६१८९
मंकी,०८३८७-२५७३३३
मुरुडेश्वर,०८३८५-२६८७८८
भटकळ,०८३८५-२२३७९१
शिरूर,०८२५४-२५३१९२
बिजूर,०८२५४-२५६४६१
सेनापूर,०८२५४-२७९२१४
कुंदापूर,०८२५४-२३७३६५
उडपी,०८२०-२५२४३५१
बरकुर,०८२०-२५८७४१९
पडूबिद्री,०८२०-२५४०२७९
मुल्की,०८२४-२२९०८३८
सुरतकल,०८२४-२४७५९३८
थोकुर,०८२४-२४०८६०५

वाघाची औलाद तु...
कुत्र्यासारखा भुंकू नकोस...!!
अरे सांगून गेला राजा माझा...
मेला तरी झुकू नकोस..!!
#जय शिवराय🙏🚩

माणूस राग जितक्या सहजतेने
व्यक्त करतो, तितक्याच
सहजतेने प्रेमही व्यक्त करू शकला असता तर जगायला
खरंच किती मज्जा आली
असती...
कारण माणसाच्या निम्म्या
समस्या ह्या व्यक्त केलेल्या
रागामुळे...
आणि कधीच व्यक्त न
केलेल्या प्रेमामुळे वाढतात....
शब्द बोलताना शब्दाला धार नको तर आधार असला पाहिजे.....
कारण धार असलेले शब्द मन कापतात आणि आधार असलेले शब्द मन जिंकतात....

केस अर्पण करून कुठे पुण्य मिळते
.
नारळ अर्पण करून कुठे भाग्य उजळते
.
केस अन् नारळ विकुनी होतो व्यापार
.
सोनं- चांदी अर्पण करून कुठे काय मिळते
.
सोने -चांदीच्या दागिन्यांचा होतो लिलाव
.
काय उपयोग सांग मानवा
अशा या दान धर्माचा ??
कधी शेतक-याला बियाणं
दान देऊन बघ
.
कधी निराधार कन्येचा विवाह लाऊन बघ
.
कधी एखाद्या निराधार बालकाचा
पालक होऊन बघ
कधी एखाद्या उपाश्याला भरवुन बघ
कधी एखाद्या अपंगाला आधार देऊन बघ
कधी एखाद्या शाळेचा जीर्णोध्दार करून बघ
कधी एखाद्या वृध्दाश्रमास
दान करून बघ
कधी एखाद्या आश्रमातील
निराधारांवर प्रेम करून बघ
एकदा दान धर्माच्या व्याख्या
बदलून तर बघ !!
जेव्हा मंदिरात जाणाऱ्या रांगा वाचनालयात जातील तेव्हा भारत जगात महासत्ता बनेल ..पुस्तकानं माणसाच
मस्तक सशक्त होत.....
सशक्त झालेलं मस्तक
कुणाच हस्तक होत नसत....
आणि हस्तक न झालेलं मस्तक
कुठेही नतमस्तक होत नसत...!
शाळेचे छत गळके आणि
मंदिराचे छत मात्र सोन्याचे ?
शाळेत आज मुलांना बसायला
साधी फरशी नाही
मंदिराला मात्र संगमरवरी ?
शाळेला दोन रुपये देतांना दहा वेळा चौकश्या करणारा पालक मंदिराला दोन हजार देतांना अजिबात चौकशी करत नाही......
आपला भारत नक्की महासत्ता होणार ?
पायात घालायची चप्पल ए सी मधे विकायला ठेवतात आणि
.
भाजीपाला फूटपाथवर.....
म्हणे आमचा देश कृषी प्रधान
.
.
.
.
.
.
आणि आत्महत्या करतो शेतकरी...
शेकडो मैल चालतो वारकरी...
अन विठोबाचे पहिले दर्शन घेतो मुख्यमंत्री..! ....👏👏

Gatari special

तुझ्या मैत्रीच्या सावलीने
मी तहानलेला झालो,
वाह..वाह..
.
.
.
.
तुझ्या मैत्रीच्या सावलीने
मी तहानलेला झालो,
.
.
.
.
तु दोन मिनिटं थांब मी
"बीयर(🍷🍺)"
मारुन आलो.....😂😂😂
👉HApPy GaTaRi👈

रुटीन मधून वेळ काढून
ती सिनेमाला गेली
मुलांचा हट्ट होता
म्हणून पाहीला बाहुबली

तेव्हापासून घरातलं
वातावरण बदललं
हसतं खेळतं घर
चिंतेत आहे बुडालं

वरणात मिठ,भाजीत तिखट
कमी जास्त होऊ लागले
गँसवरचे दुध नियमित
उतू जाऊ लागले

आवडत्या सिरियलची
वेळ टळू लागली
कधी पोळी कच्ची तर
कधी फोडणी जळू लागली

पाहून तीची हालत
त्याला गलबलून आले
जवळ घेऊन तिला
हळूच त्याने विचारले

काय झालं जानु तुला
माझं काही चुकलं का
एखादं जुनं प्रेमपत्र
तुझ्या हाती लागलं का?

लग्नाचा वाढदिवस
मी विसरलो तर नाहीना
हवा आहे का तुला
एखादा नवा दागीना

मान हलवून ती म्हणाली
नाही रे,तुझं काही नाही चुकलं
एक कोडं मात्र मला
अजुन नाही सुटलं

गंभीर होत तिने मग
हळूच त्याला विचारलं
सांग ना प्लिज.. कटप्पाने
बाहुबलीला का मारलं

😀😀😀

Gatari special

“ही गटारी म्हणजे काय…?,”नक्की वाचा

नुसते दारू पिऊन धुंद होत मांस-मच्छीवर
आडवा हात मारणे असा आहे का.......?,
की…..,या आषाढ अमावस्येचा आणखीही
काही दुसरे महत्त्व आहे….!
हे आपल्याला माहीती आहे का.....? 

“गटारी” लोळण घेऊन साजरी करायची की
पूजा बांधून…..?

आषाढी अमावास्या “ तमसो मा ज्योतिर्गमय ”,
असा संदेश देणारी, मंगलमय अशी मानली
जाते...,
आषाढातील अमावास्या.
हा दिवस  ‘ दिव्यांची अमावास्या ' म्हणून
साजरा केला जातो.

या दिवशी दीपपूजा केली जाते.
कणिक वापरून केलेले गोडाचे दिवे या दिवशी
केले जातात. देशावर काही ठिकाणी
बाजरीचेही दिवे केले जातात. दूधा-तुपा सोबत
गोडाच्या दिव्यांचा नैवेद्य दाखवला जातो.
श्रावणमास सुरू होण्यापूर्वी येणारी ही
अमावस्या दीपपूजनाचा दिवस म्हणून पण
ओळखली जाते. पूर्वीच्या काळी अंधारात
आधार देणा-या मिणमिणत्या पणतीपासून ते
लामणदिवा-कंदीलापर्यंत सगळ्या दिव्यांची
ह्या दिवशी पूजा केली जात असे.
आदल्या दिवशी घरातल्या सगळ्या दिव्यांची
स्वच्छता करून त्यांना लख्ख करून ठेवलं
जायचं. मग आजच्या दिवशी सगळ्या दिव्यांना
पाटावर मांडून त्यासमोर रांगोळी काढून,
गंध-फुलांनी त्यांची मनोभावे पूजा केली जात
असे. गुळ-फुटाणे-लाह्या यांचा नैवेद्य दाखवून
‘ दिव्याची कहाणी ' वाचून ह्या पूजेची सांगता
होत असे. ह्या सगळ्या दिव्यांमधे मान असतो
तो गुळ घालून केलेल्या कणकेच्या दिव्यांचा.
हे दिवे वाफेवर बनवून नंतर पुजेत मांडले जातात.तसंच ह्या पुजेसाठी बाभळीची फुलं वापरली
जात असत. 

अशाप्रकारे, काळामिट्ट अंधार उजळून
टाकणा-या ह्या चिमुकल्या सूर्यदूतांची पूजा
करून त्यांबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली
जात असे. 

पण गेल्या काही वर्षांत आपण मात्र या
अमावस्येला गटारी ठरवून, जणू काही भरपेट
मांसाहार आणि मद्यसेवन करून गटारीत
लोळण्यासाठीच असलेली अमावस्या असे
तिला रूप देऊन टाकले आहे. आषाढी
अमावस्येनंतर श्रावण सुरू होतो, त्यामुळे
मांसाशन वर्ज्य मानले जाते. पुढच्या
महिन्याभरात ते मिळणार नाही, ते आताच
वसूल करून घेण्याकडे आपला कल असतो.
मांसाहार हा कदाचित आहाराचा अपरिहार्य
भाग असेलही; पण मद्यसेवन हा अपरिहार्य
भाग कसा असू शकतो….?
अतिरिक्त मद्यसेवनाने धुळीस मिळणारी कुटुंबे
उदाहरण म्हणून समोर असतात,
माणसे गटारीच्या निमित्ताने मद्याच्या
बाटल्याच्या बाटल्या कशा रिचवताता नव्हे....
तर कशा रीत्या करतात…?

पण ‘गटारी' म्हणजे अशीच असते काय….?
‘गटारी अमावस्येच्या विधीचे वर्णन जर खरे
असेल, तर
अशी गटारी आता किती जण पाळतात…..?

भारतीय संस्कृती गटारीचे महत्त्व किती जाणते
याचे हे उत्तम उदाहरण. गटार अशुद्ध पदार्थ
वाहून नेते, गाव स्वच्छ ठेवते, रोगराई दूर सारते,
पण शहरे वाढली, गटारे स्वच्छ होईनाशी झाली.
गटारे स्वच्छ होण्यापेक्षा ती अशुद्ध होण्याचा
वेग अधिक वाढला आणि गटारांमुळे
रोगराई वाढू लागली. 

आषाढ महिना हा रोगराईचा महिना समजला
जातो…..जशी आज आपल्याकडे H1-N1
म्हणजेच स्वाइनफ्लू, मलेरिया, सर्दि-पडसे
आदी रोगांच्या महाभयंकर साथींचे प्रलय
माजले आहे. त्या होऊ नयेत म्हणून पूर्वापार
देवी-देवतांची आराधना होई; त्या प्रसन्न
व्हाव्यात यासाठी विधी केल्या जात,
बळी दिले जात.

आषाढातली अमावस्या म्हणजे
‘दिवळी अमावस्या‘, ‘दिव्याची आवस‘ असे
आम्ही म्हणतो. हल्ली त्याला ‘गटारी‘ हे
घाणेरडं नाव का दिलं आहे कुणास ठाऊक…..!
तेव्हा घरातले सर्वच्या सर्व दिवे पितळेचेच
असत. त्या दिवशी ते घासून पुसून लख्ख
करायचे. संध्याकाळी दिवेलागणीला ओटीवर
गाईच्या शेणानं सारवायचं. कणे-रांगोळी घालून
त्यावर पाट ठेवायचा. त्यावर सर्व दिवे ओळीने
मांडून त्यांना हळद-कुंकू, अक्षता, फुलं
वाहायची. गोडाचा नैवेद्य ठेवायचा.
लामण दिव्याने त्या प्रज्वलित केलेल्या
सगळ्या दिव्यांना आरती ओवाळायची.
आषाढी अमावस्येला दीपपूजेला महत्त्व असतं. 

तसंच त्या रात्री व दुपारीसुद्धा जेवणाचा
मोठा घाट घातलेला असतो.
जावई-लेकी यांना मोठ्या मानानं जेवायला
बोलवायचं. मटण, कोंबडी, वडे... वड्यांतही
एक गोड वड्यांचा प्रकार असतो.
नारळाचं दूध, गूळ यात तांदळाचं पीठ उकडून
त्याचे वडे करतात. खुसखुशीत, मस्त !
ते मटणाच्या रश्श्यात बुडवून नाही खायचे.
गोड असल्यामुळे नुस्तेच गरमगरम हादडायचे. 

असा हा आमचा आषाढ मास. मनसोक्त मटण, कोंबडी, मासे खाण्याचा. दुस-या दिवशी
श्रावण मास चालू होणार. सोवळंओवळं,
उपासतापास, व्रतवैकल्यांचा..... 
रात्रीच सारी ओशट भांडी घासून टाकायची.
चुलीला शेणपोतेरं करायचं. स्वयंपाकघर
झाडूनझुडून सारवायचं. रात्रीच झाडू, पोतेरी,
हातपुसणी, दूध, पाणी गाळायची फडकी धुवून टाकायची. मटणाच्या जेवणानं पोट जड झालेलं,
अनावर सुस्ती आलेली. मटणा-कोंबडीचे
विविध प्रकार करून त्यासाठी वाटण- घाटण
करून शरीराची दमणूक झालेली; पण तरी
सारी कामं रात्रीच उरकून टाकायची.

उद्या येणा-या श्रावणासाठी, त्याच्या
आगत-स्वागतासाठी घरदार, झाडलोट करून
स्वच्छ करायचं. मग गणपती, गौर जाईपर्यंत
वरणभात, भाजी, कोशिंबिरी, चटण्या,
लोणच्याच्या बरण्यांची, पापडांच्या डब्याची
झाकणं उघडली जायची. दही, दूध, ताकावर
जोर. आणि गौरी-गणपती गेले रे गेले,
की पिशवी घेऊन मासळी व मटण, कोंबडी
आणण्यासाठी बाजारात धूम ठोकायची!

आवडलं तर नक्की शेअर करा...