Kokanmadhali Shaadi

Shakti Tura Dance @ Yesare Thombre vadi Tide Mandangad

Bailanchi Jhunjh Local Game

Ladacha Javai Marathi hit old Song

Man Apaman

हसता तितक्याच हक्कानं
रुसता आलं पाहिजे...
समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी
अलगद पुसता आलं पाहिजे.

मान-अपमान नात्यात  काहीच
नसतं.आपल्याला फक्त
समोरच्याच्या हृदयात घुसता
       आलं पाहिजे..!!

Sangharsh

जंगलातील हरिण सकाळी उठल्याबरोबर विचार करते की मला खूप धावावे लागेल.नाहीतर, सिंह मला मारून खाईल.
आणि
सिंह,सकाळी उठल्याबरोबर विचार करतो की मला हरिणापेक्षा जास्त धावावे लागेल.नाहीतर, मी उपाशी मरेल.
आपण सिंह असू किंवा हरिण, जीवन चांगले जगण्यासाठी संघर्ष तर करावाच लागतो.
"संघर्षाशिवाय काहीही मिळत नाही

Education

फक्त वही, पेन म्हणजे शिक्षण नाही.
तर....
बुध्दीला सत्याकडे,
भावनेला माणूसकीकडे आणि
शरीराला श्रमाकडे
नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण.
जसे,
जेवल्यावर होणारे समाधान तात्पुरते असते. याउलट शिक्षणामुळे मिळणारी
ज्ञानाची शिदोरी आयुष्यभर पुरते.
पोटाची भूक भागवावीच, पण एक पाऊल पुढे टाकून माणसाने शिक्षण घेऊन बुद्धीची भूकही भागवावी.
"जसा माणूस  अशक्त होऊन अल्पायुषी होतो, तसा तो
शिक्षणाअभावी जिवंतपणी दुसर्‍याचा
गुलाम होतो."

Fulachya Vedana

      कुणीतरी फुलाला विचारले,
"झाडावरून तोडले तेव्हा
      तुला वेदना झाल्या नाहीत का रे?"
फुलाने उत्तर दिले,
      "तोडणारा इतका आनंदात होता की,
मी माझ्या वेदनाच विसरून गेलो."

Dudhsagar Waterfall Dhabadhaba Konkan

Mitra cha Number

मुलगा : माझ्याकडे माझ्या मित्रासारखी गाडी नाही
तरीपण तुला डोळ्यांच्या पापणीवर बसऊन फिरवीन .....😃😃
माझ्याकडे माझ्या मित्रासारखे घर नाही तरीपण तुला
माझ्या ह्रदयात ठेवीन .....😄😄
माझ्याकडे माझ्या मित्रा एवढे पैसे नाहीत तरीपण तुला
कामाला जाउन सांभाळीन
अजून काय पाहीजे सांग .......?😜😜
मुलगी : बास कर खुळ्या रडवतो का आता...
चल दे तुझ्या त्या मित्राचा नंबर😂😂

Think on it

एका देवळात असलेली प्रचंड गर्दी एक मुलगा
कुतूहलाने पाहत होता;
तेवढ्यात एक पंडित त्याच्याजवळ येऊन त्याला
म्हणाला,
"आज देवळात खूप गर्दी आहे, असे उभे राहून दर्शन
होणे कठीण, इथे विशिष्ट व्यक्तींसाठी विशेष
व्यवस्था आहे, मला ५०१/-  रुपये दे, मी तुला थेट दर्शन
करवून देतो!
मुलगा म्हणाला,
"५००१/- रुपये देतो, देवाला सांग, बाहेर ये, मी
आलोय!"
पंडितजी,
"मस्करी करतोस, देव कधी देवळाबाहेर आलाय का?
आणि तू कोण आहेस?"
मुलगा पुन्हा म्हणाला,
"मी ५१०००/- रुपये देतो, देवाला सांग, माझ्या
घराजवळ येऊन भेट!"
पंडितजी,
"तू देवाला समजतोस तरी काय?"
मुलगा,
"तेच तर मी म्हणतोय...
"तुम्ही सर्व जण देवाला
समजता तरी काय..?
पैसे कमावनेचे साधन?"
Think on it!!!

Kapat ani mann..

कपाट' आणि 'मन' या दोन्ही गोष्टी वेळोवेळी साफ़ केल्या पाहिजेत....
कारण 'कपाटाला' अडचण होते 'सामानाची'
...आणि...
'मनाला' अडचण होते 'गैरसमजाची'...!!!

Mitra

आयुष्यात येताना जाताना लोक भेटतात. एकमेकांच्या ओळखी होतात. एकमेकांमध्ये मैत्री होते
आणि ती ओळख अगदी द्रुढ होऊन जाते.
पण एकदा अशी ओळख होते
जणू असे वाटू लागते वर्षा वर्षांची मैत्री असावी.
जेव्हा होते अशी ओळख तेव्हा नाती जुळतात अनेक.
अशी ही ओळख मित्रा मित्रांमधली
अशी ही ओळख नात्या नात्यांमधली
जणू ती ओळख मनात जाऊन रुजते.
अश्या अनोळखी ओळखीला आणि मैत्रीला सलाम

Time

रात्र नाही... स्वप्न बदलते..!!
दिवा नाही... वात बदलते..!!
मनात नेहमी जिंकण्याची आशा ठेवा..
कारण...
नशीब बदलो ना बदलो...
पण वेळ नक्कीच बदलते..!!

Aayushya

" जर तुम्हाला आयुष्यामध्ये खुप संघर्ष करावा
लागत असेल…तर स्वतःला खुप नशीबवान
समजा…!! ""
कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच
देतो……ज्यांच्यामधे क्षमता असते…!!   

Personality

"मोगरा" कितीही दुर
असला तरी "सुंगध" येतोच,
. .  तसेच
"आपली माणसे" किती ही दुर
असली तरी "आठवण येतेच"...

साखर गोड आहे असे कागदावर लिहून चालत नाही
खाल्ल्यावरच तिची चव कळते,
तसेच,
नुसतेच नाते आहे,सांगून भागत नाही,
तर ते टिकवायला लागते
            
चांगल व्यक्तीमत्व घेऊन जन्माला येणं हे आई-वडीलांकडून आपल्याला Gift असतं;
पण एक चांगल व्यक्तीमत्व म्हणून
जगणं स्वत:च Achievement असतं........

Selfie

ज्यादिवशी तुम्हाला वाटेल कि ...
संपुर्ण जग तुमच्या समोर तुमच्या विरोधात उभे आहे.,.,,,
त्यावेळेस जगाकडे पाठ  फिरवा आणि                             एक सेल्फि काढा.....
संपुर्ण जग तुमच्या मागे असेल......

Shabd

निरर्थक शब्दांपेक्षा....
अर्थपूर्ण शांतता केव्हाही चांगलीच.

Coconuts

विचार करून उत्तर द्या .
एक व्यापारी असतो
त्याच्या जवळ 3 पोती नारळ असतात
एका पोत्यात 30 नारळ याप्रमाणे 3
पोत्यात 90 नारळ असतात
तो प्रवासासाठी निघालेला असतो त्या
हायवेवर 30 टोलनाके असतात
प्रत्येक नाक्यावर कररूपाने एका
पोत्यासाठी एक नारळ असे 3 पोत्यासाठी 3
नारळ दिल्यानंतर व्यापा-याकडे किती नारळ
शिल्लक राहतील..?

..solve this If you can..!!

Challenge..!!👍👍

Sanvaad

कुणाच्या सांगण्यावरुन आपल्या मनात
एखाद्या व्यक्तीबाबत चांगले वा वाईट मत बनवण्यापेक्षा, आपण स्वतः चार पावले चालुन समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधुन मगच खात्री करा. नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे.

Happy sankashti Chaturthi

आज संकष्टी चतुर्थी.
श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.
आजच्या ह्या मंगलदिनी सर्व गणेशभक्तांच्या मनातील सर्व ईच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत, हिच गणरायाचे चरणी प्रार्थना.

वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ । निर्विघ्नं कुरुमेदेव, सर्वकार्येषु सर्वदा ।।
।। ॐ गं गणपतये नमः ।। 

|| गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ||

💕तुमचा दिवस आनंदात जाओ💕

Gunavatta

फुलाला वाढायला ज्याप्रकारे सूर्य
किरणांची आवश्यकता असते तसेच
मनुष्याला प्रगतीसाठी चांगल्या
विचारांची आवश्यकता असते..
तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर कोणी शंका घेत असेल तर मुळीच कमीपणा वाटू देवू नका. कारण लोक नेहमी
सोन्याच्या शुध्दतेवरच शंका घेतात,
लोखंडाच्या नाही.....

Human being

जन्म हा एका थेंबासारखा असतो
आयुष्य एका ओळीसारखं असतं,
प्रेम एका त्रिकोणासारखे असतं पण
मैत्री असते ती वर्तुळासारखी,
ज्याला कधीच शेवट नसतो..! "
वेळ, सत्ता, संपत्ती आणि शरीर साथ देवो
अथवा न देवो परंतु चांगला
स्वभाव,समजुतदारपणा आणि चांगले संबंध
कायम आयुष्यभर साथ देतात....!

Time

जेंव्हा वेळ आपल्या साठी थांबत नाही
मग आपण योग्य वेळेची वाट का पाहत बसायचं?

प्रत्येक क्षण हा योग्यच असतो ,
चुकतो तो फक्त आपला निर्णय.

Manusaki

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
माणसाच्या मुखात गोडवा,
मनात प्रेम,
वागण्यात नम्रता,
आणि
हृदयात गरीबीची जाण,
असली की ,
बाकी गोष्टी आपोआप घडत
जातात...
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

Aathavani

               आपुलकी असेल,    
               तर जिवन सुंदर..
       
                  फुले  असतील,     
                   तर बाग सुंदर...
         
            गालातल्या गालात.  
            एक छोटस हसु असेल,
                   तर चेहरा सुंदर...

                    आणि....
    
      👪   नाती मनापासून जपली,   👪
                   तरच आठवनी सुंदर...!!

Lagn kadhi karave

लग्न कधी करावं ?

लग्न नेहमी शक्य तेवढ्या उशीराच करावं म्हणजे,
योग्य व्यक्तीशी झालं तर इतके दिवस वाट पाहील्याचं चीज झालं हे समाधान वाटतं....

आणि

चुकीच्या व्यक्तीशी झालं तर तिच्याबरोबर थोडेच दिवस काढायचे आहेत याचं समाधान...😁😁😂😂😁😃😜😂😜😝
कारण ...चूकिला माफि नाही

Chukila mafi nahi

काल आपल्या अँडमिला कुत्रा चावला  


....





,....













...

अँडमिने लगेच त्याला  चावले...

"चुकीला माफी नाही "
😜😜😜😜😜😜😜

Daru Pito mhanun bevada mhanu naka

दारु पितो कधी तरी हफत्यातून एकदा..
आम्हाला बेवड़ा म्हणू नका..
घर दार सांभाळून करतो सार..
उगाच आमच्या नावाने कण्हु नका..
दिवसभर राब राब राबतो बैलासारख..
थोडा विरंगूळा आम्हाला हवा असतो..
तुम्ही दिवसभर बसता सिरियल बघत..
आम्ही मात्र दिवसातले 12-14 तास ऑफिसात घासतो..
बर्फ ग्लासात पडला की जिव भांड्यात पडल्यासारख वाटत..
बायको पेक्षा दारु जास्त प्रेम करते हे मनोमन मग पटत..
चार मित्र भेटतात ज़रा देशाच्या विकासाची आखणी होते..
सुरक्षा मंत्री योग्य आहे की नाही याची व्यवस्थित चाचणी होते..
चाखणा संपतो अलगद ग्लास ओठांशि करतो चर्चा..
टेंशनने भरलेला खाली होतो मग मजला डोक्यातला वरचा..
बाकी काही नाही थोडासा मनावरचा ताण होतो कमी..
एखाद दिवस लेट होतो पण एरवी ऑफ़ीसातून थेट घरी येतो की नाही आम्ही..
दारु पितो कधी तरी हफत्यातून एकदा..
आम्हाला बेवड़ा म्हणू नका..
घर दार सांभाळून करतो सार..
उगाच आमच्या नावाने कण्हु नका..!!!
😂😂😂😁😁
आता गालातल्या गालात हसु नका☺☺

Manasanchi kimmat

डोळयातून वाहणारं पाणी कोणीतरी पाहणारं असाव.,
हदयातून येणार दु:ख कोणीतरी जाणणारं असाव.,
मनातून येणा-या आठवणी कोणीतरी समजणारं असाव.,
... जीवनात सुख :दुखात साथ देणारं एक सुंदर नातं असाव

ठेचा  तर  लागत  राहतीलच
ती  पचवायची  हिम्मत ठेवा
कठीण  प्रसंगात  साथ  देणा-या
माणसांची  तुम्ही  किंमत ठेवा..

Mistake

मुलीने आपल्या होणाऱ्या

नव-याला Whatsapp केला ...

"आपले लग्न नाही होऊ शकत ..माझे दुसरीकडे लग्न

ठरले आहे.."
मुलाला मोठा झटकाच बसला...

पण पुढील २ च मिनिटांत त्या मुलीचा दुसरा msg

आला...

"sorry sorry sorry चुकून तुम्हाला send झाला"

मुलाला double heart attack आला
😂😂😂😂😂

Funny status

Whatsapp status :

Reached Moms native place,
feeling aaichya gavat

Sundar Aayushya

पाण्याच्या माठाला विचारले की बाबा तू इतका
थंड कसा राहतो ?
माठाने अगदी मार्मिक ऊत्तर दिले.,
ज्याला माहित आहे की ज्याचा भूतकाळ माती व
भविष्यकाळही मातीच आहे तो कशावर गर्व
करणार...!
माणसाने सुध्दा जर हेच लक्षात
ठेवले तर....!
आयुष्य खुप सुंदर जगु शकाल...!

Maitri

मैत्रीत फक्त दाखवून द्यायच नसते की हा माझा मित्र आहे,
तर वेळ आल्यावर दाखवून द्यायच की
मैत्री काय आहे..........

Penachi nali..

✅ खुप सुन्दर आहे वाचाच ✅
पेनची नळी!!
पुण्याला जात असताना धाब्यावर चहापाण्यासाठी थांबलो ...
एक १२ /१३ वर्षाचा साधे कपडे घातलेला चुणचुणीत मुलगा माझ्या मागे मागे रेंगाळत असल्याच जाणवलं ....
चहापान झाल्यावर निघालो तेंव्हा माझी नजर त्याला शोधत होती ...
गाडीपासून २०/२५ फुटावर झाडाच्या अडोस्याला 'तो' उभा होता..
नजर माझ्याकडे.
मी त्याला जवळ बोलावलं ..
"भूक लागली का?" विचारल
तो मानेनच नाही म्हणाला ...
माझी उत्सुकता वाढली ...
"पैसे पाहिजेत ??"
"नाही."
"मग.??"
पाठीमागे लपवलेली पुष्ट्याच्या प्याड, निबंधाची वही अन रिफील संपलेला रुपयाचा पेन ( use & throw ) त्यान दाखवला.
.."पेनची नळी संपली ...
घेऊन द्या न ..!!"
मी ५ रुपये दिले.
तो .."पैसे नको नळी घेऊन द्या"
मी म्हटलं "का?"
तो "माझी माय म्हणली कुणा कडून फुकटचे पैसे घ्यायचे नाही
....मी जितके फुकटचे पैसे घेइल तितक माझ्या मायच आयुष्य कमी हुइल .!!!!
त्याच उत्तर ऐकून माझ्या डोक्यात प्रश्नाचं काहूर उठलं..
माझी माणुसकीची नशा...खाडकन उतरली ..
दातृत्वाच ढोंग त्याच्या एका संस्कारापुढे कवडीमोल ठरलं.
मी गाडीतून उतरलो ...त्याच नाव विचारल ..बंड्या .
बंड्या मला टपरी कडे घेऊन गेला ..
पेन घेतल्यावर बंड्या खुलला
माझ्या डोक्यातल्या प्रश्नांच्या गुंत्यातून मी एक एक प्रश्न काढू लागलो. .
मी :- कितवीत आहेस ?
बंड्या:- मराठी ७ वित ...
मी :- काय लिहितोस ???
बंड्या :-निबंध... माझी आई !!!!
मी :- कुठ राहतोस ?
बंड्याने शेताकड बोट दाखवलं ...लांब वर एक झोपडी दिसत होती ..बंड्याचा बाप शेतावर
जागल्या होता.. आई शेतावर मजुरी करत होती ..बंड्याला चार लहान भावंड होती.
मी वही हातात घेऊन चाळली...
बंड्या झेड पी च्या शाळेत होता.
त्याच पूर्ण नाव वाचल.
अन मग विचारल "माझ्याकडच नळी का मागितली ..?"
बंड्या गांगरला ..
मी परत विचारल "इथ इतके लोक आहेत मग माझ्याकडच नळी का मागितली.?"
बंड्या : "तुमच्याच खिशाला मला पेन दिसला म्हणून .!!!"
मग मी सगळीकडे बघितलं ...बरेचसे लोक टी शर्ट वर होते .काहींना खिसे नव्हते ..तर काहींच्या खिशाला पेन नव्हते ..
बंड्याचे निरीक्षण अचूक होते ...
माझ्या खिशाला माझा आवडता पेन होता .
मी : "तुला कोण व्हायचं ?मोठा झाल्यावर .
बंड्या : "फौजदार !!!"
मी : "फौजदार ? कसा काय ?? कुणी सांगितलं .??"
बंड्या : "मास्तर म्हणले कि मी खूप अभ्यास केला कि फौजदार होईल ... !!"
मला त्याच उत्तर आवडल ...!!
माझ्या बरोबरचे मित्र वैतागले होते ...!
स्वताच्या आयुष्याला फुकटचे पैसे न घेण्याच्या संस्कारशी जोडणाऱ्या त्या माउलीला
अन
निरागस डोळ्यांमध्ये फौजदार होण्याच स्वप्न देणाऱ्या झेड पी च्या गुरुजींना मी मनोमन नमस्कार केला.!!!.
माझ्या खिशाचा आवडता पेन काढला ... बंड्या च्या खिशाला लावला.!
त्याच्या खांद्यावर हात ठेवला ..अन माझ्या आवडत्या देशाच्या भावी इन्स्पेक्टरसी शेकह्यांड करून गाडीत बसलो.!!
गाडीकडे बघत हात हलवत होता ...!!.
मी निश्चिंत होतो ........
कितीही भ्रष्टाचार वाढो...…
जो पर्यंत अशा माऊल्यांचे संस्कार आहेत तोवर माझ्या देशाच भविष्य उज्वल असल्याबद्दल मला खात्री पटली ……!!
विनंती : कृपया शेअर करा जेणेकरून माणुसकी जास्तीत जास्त लोकांमध्ये जागरूक होईल

Naseeb

विस्कटलेल्या नात्यांना जोडायला प्रेमाची गरज भासते, बिखरलेल्या माणसांना शोधायला विश्वासाची साथ लागते, प्रत्येकाच्या जीवनात येतात वेगवेगळी माणसं,पण पाहिजे ती व्यक्ती भेटायला मात्र नशिबच लागते.

Aayushya

आयुष्याचा वेग असा करा की, आपले शत्रु पुढे गेले तरी चालतील......!
पण आपला एकही मित्र पाठिमागे राहता कामा नये....!
मी दुनियेबरोबर "लढु" शकतो पण "आपल्या माणसांबरोबर" नाही, कारण "आपल्या माणसांबरोबर" मला "जिकांयचे" नाही तर जगायचे आहे...😊

Love

एखादी व्यक्ती तुम्हाला आज फक्त आवडतेय,
उद्या तिची सवय होईल आणि कदाचीत प्रेमही...
एवढ्याच विश्वासावर कुणाच्या आयुष्यात जाऊ
नका...
आवडीला प्रेमाचे नाव देऊ नका...
कारण तुम्हाला पर्याय असू शकतात,
पण त्या व्यक्तीकडे कदाचीत तुमच्याशिवाय
कुणीही उरत नाही,..
प्रेम हे तुमच्यासाठी आयुष्याचा भाग असेल,
पण काहींसाठी ते संपुर्ण आयुष्यच असत...
आणि तुमची ही चुक कुणाचतरी आयुष्य संपवू शकते,
म्हणून विचार करूनच कुणालाही
I love You म्हणा,
जोवर तुम्ही sure होत नाही तोवर तरी नाही🙏

Aathavan

तुझ्यावर्च प्रेम व्यक्त कर्ण,
मला काही जमत नाही ................
तुझ्या आठवणी शीवाय ,
मन मात्र कशात रमत नाही

Malavani Joke

बाबा : काय रे, आज परीक्षा होती ना? शाळेत जावक नाय तो?

गंपू : पेपर खुपच कठीण होतो बाबानू.😰

बाबा : तू परीक्षेकच जावक नाय आणि तुका कसा कळला? 😨

गंपू : पेपर कालच फुटलोलो बाबानू! मी वाचून तेवाच मी समाजलय ह्या काय आपल्याक जमाचा नाय.

😛😛😛😛😛😛😜😜😜

Pani vachava...

सर्व ग्रुप मेंबरना आवाहन

यंदा पावसाने पाठ फिरवली आहे. धरणातील पाणी कमी झाले आहे. आपण एक जबाबदार नागरिक म्हणून पाण्याचा अपव्यय टाळून पाणी वाचवू. तुम्ही हे सहज करु शकता:-
1. रोज गाड्या धुवू नका.
2. अंगणात पाणी मारू नका.
3. सतत नळ चालू ठेऊ नका.
4. इतर अनेक चांगल्या उपाययोजना करुन त्यायोगे पाणी वाचवूया.
५) घरातील गळके नळ रिपेअर करा
६) सोसायटीतील गळकी टाकी , पाईप , बॉल कॉक रिपेअर करा
या संकटाचा एकत्र सामना करूया.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Share kara.. .जादु वैगेरे काही होणार नाही पण  नक्की चांगली बातमी ... पसरवीली चे समाधान मिळेल 🙏🙏🙏🌿☔🌊🌈

Naseeb...

"सर्वांच्या नशिबात सुखाचा उपभोग लिहिलेला असतो;
काहींना ओँजळभर मिळते,
तर काहींना रांजणभर;
पण त्यातून मिळणारा आनंद
ज्याला कळला तोच जगणे शिकला"...
"दुःखाच्या समुद्रात सुखाची लाट असतेच.
फक्त थोड़ी वाट पहायची असते"...!!

Aayushya jagane yalach mhanatat

क्षणाला क्षण अन दिवसाला दिवस जोडत आयुष्य पुढे सरकत असते, कधी तरी, कुठे तरी, केव्हा तरी असा क्षण येतो,
जो अख्खं आयुष्यच बदलुन टाकतो,
फक्त तो क्षण ओळखता आला पाहिजे, यालाच "आयुष्य जगणे" म्हणतात.

Aayushya

चूक  ही  आयुष्याचं  एक  पान  आहे.
   पण 'नाती ' म्हणजे  आयुष्याचं ' पुस्तक' आहे.
    गरज  पडली  तर  चुकीचं  पान  फाडून  टाका.
पण...एका पानासाठी अख्खं 'पुस्तक' गमावू नका.

       जीवन मंञ
१) हळू बोला      - शांती मिळेल
२) मी पणा सोडा - मोठे व्हाल
३) भक्ती करा      - मुक्ती मिळेल
४) विचार करा     - ज्ञान मिळेल
५) सेवा करा       - शक्ति मिळेल
६) सहन करा      - देवपणा मिळेल
७) समाधानी रहा - सुख मिळेल.        

"एवढे लहान बना की प्रत्येक जण
तुमच्यासोबत बसू शकेल...
आणि
इतके मोठे बना की जेव्हा
तुम्ही उभे रहाल तेव्हा
कोणीही बसलेला नसेल..
🍁सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🍁

Tur dal

साल १९९६ बाळासाहेब ठाकरेंनी मंत्री मंडळातून एका महिला मंत्र्याची ....... हकालपट्टी केली ..
गुन्हा होता डाळींचा महा घोटाळा .. ७ पिढ्या  बसून खातील एवढा महा प्रचंड भ्रष्ठाचार ... त्या भाजपच्या महिला मंत्र्याचे नाव होते... शोभाताई फडणवीस .......अन् विशॆष म्हणजॆ त्यांचा पुतण्याच महाराष्टाचा मुख्यमंत्री असताना तुरडाळ 220 रू किलो आहॆ......
साहॆबांची दुरदृष्टी....
सहज आठवले म्हणून पाठवले .....

Shivaji maharaj

: सोडून गेली माता जेव्हा तो दोन वर्षाचा होता
.
नव्हते जेव्हा पिता जगात तो २१ वर्षाचा होता
.
.
वनातल्या वनराजासम तो वादळाशी लढला
.
नेले जेव्हा मृत्यूने तो ३२ वर्षाचा होता
.
त्याला आई लहानपणी सोडून गेली
पिता तरूणपणात सोडून गेला
नातेवाईक विरोधात गेले
जवळचे संकटात सोडून गेले
.
तरीही तो लढला
.
.
त्याच्यावर विषप्रयोग झाले
त्याची बदनामी झाली
.
.
तरीही तो लढला
.
.
दहा दिशांनी दहा संकटे आली
कोणी उरला नाही वाली
.
.
तरीही तो लढला
.
.
अस असताना ही त्याने
४ग्रंथ लिहिले
अनेक भाषा शिकला
ज्ञान मिळवले.
.
.
.
ज्याने मैत्री अशी केली
कि मिञाने त्याच्यासाठी जीव दिला

शञुत्व असे केले की वैरी वेडा होउन मेला

त्याने कतृत्व असे केले कि

सुर्य चंद्र संपतील

हा सह्याद्रीचा सुर्य तळपतच राहिल
.
.
कोण होता तो
.
नरवीर
शुरवीर
धर्मवीर
ज्ञानवीर
गुणवीर
.
.
तो होता

शिवबांचा छावा
.

.

छत्रपति संभाजीराजे...!!!!!

जय रौद्रशंभो
जय शिवराय

‬: गर्व नाही माज आहे।

धमकी नाही पण धमक आहे ।

पैसा नाही पण
मनाची श्रीमंती आहे ।

म्हणून तर गर्वाने
म्हणतो मी मराठी आहे..

''वाघाला" घाबरून सिंह
चाल बदलत नाही,

सिंहगर्जना ही धडकी
बसविणारीच असते,

ओरडून जञा गोळा
करायची त्याला गरज नसते,

आम्ही मराठे आलो आहोत,

हे पाहून जर घाम फुटत
असेल तर पुढचं भविष्य
सांगायला ज्योतिषाची
गरज नसेल..

"मराठा" या शब्दातच
"राठ"पणा आहे..

हा राठ पणा म्हणजे
रांगडे पणा मराठ्यांत
भिनलाय ते या मुळमुळीत
लोकांना काय कळणार ?

छक्के पंजे मराठ्याला
जमत नाहीत मराठ्याला
फक्त एकच समजतं जो
नडला त्याला पाडला..

समजलं काय.!!

सुर्य कोणाला झाकत नाही,

डोंगर कोणाला वाकवत नाही,

"मराठी" असल्याचा
अभिमान बाळगा,

कारण "मराठी" कोणाच्या
बापाला घाबरत नाही..

"जय भवानी, जय शिवाजी"

नदी आहे नदीतून
पाणीच वाहणार..

ओरडून सांग उभ्या जगाला,

मी मराठा आहे मराठा,

शिवछत्रपतींची महतीच गाणार.!

श्वासांत रोखूनी वादळ;

डोळ्यांत रोखली आग;

देव आमुचा छञपती;

एकटा मराठी वाघ;

हातात धरली तलवार;

छातीत भरले पोलाद;

धन्य-धन्य हा महाराष्टू;

धन्य जिजाऊंची औलाद..!!

आम्ही तलवारी सोडल्या
पण तलवारी चालवायला
विसरलो नाहीत..

आम्ही नांगर सोडले
पण जमीन फाडायला
विसरलो नाहीत..

तोच रक्तातला लाव्हा
आजही उफाळत आहे..!

डोळ्यातला निखारा
लालबुंद आहे....!

पोलादी मुठीत हत्तीचे
बळ आहे...!

आडवे येऊ नका मनातला
शिवाजी आज ही जिवंत आहे..

॥ जय शिवराय ॥

‬: फुलांचा इतिहास कळ्यांनी लिहला!
राञीँचा इतिहास
चाँदण्याँनी लिहला!
आजही लोकांची फाटते
आम्हाला पाहून!
कारण आमचा इतिहास शिवाजी महाराजानी लिहला.!!!

Kunavachun kunache Aadat nahi

"कुणा वाचून कुणाचे काहीच आडत नाही हे
जरी
खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे
सांगता येत नाही."

डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत,
अन्...
भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत..

Saath

दिवसभर वेळातून वेळ काढून तूम्हाला मेसेज का करत असतो ??
.
टाईमपाससाठी ?
नाही...!💐
मनोरंजनासाठी ?
नाही....!💐

मेसेज करतो कारण आयुष्यात येऊन तुमच्यासारखी जी जिवाभावाची माणसे मिळाली आहेत, त्यांची आठवण काढणं हे माझे भाग्य समजतो...
आणि त्यांच्या मनात योग्य ते स्थान मिळविण्याचा हा छोटासा प्रयत्न असतो.💐..

तुमच्या आयुष्यातला एक भाग बनविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद...
आपली साथ अशीच मिळत राहो...
🙏🙏🏻🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Marathi SAD status

तू माझी आहेस कि नाहीस,,, माहित
नाही पण तुला माझी _म्हणायला खूप
आवडते,,,♡♡मनालाही समजावलय,,, तू
माझी नाही पण त्यालाही
आता तुझ्याचसाठी धडधडायला खूप आवडते.

Aata urali fakt Duniyadari

गल्लीतल्या क्रिकेटचे नियम==
1.एक टप्पा आऊट.
2.जिंकेल तो पहिला.
3.कट ला एक.
4. टॉससाठी उन्हाळा का पावसाळा.
5 .बॉल घरात गेला की आऊट.
6. भिंतीला फूलटॉस लागला की आऊट.
7.जो कोण लांबचा शॉट मारेल त्यानेच बॉल
आणायचा.
8.पहिल्या बॉलवर आउट झाला की म्हणणार....
अरे यार ट्रायल बॉल होता राव.
9.गटारी मध्ये बॉल गेल्यावर बॅट्समननेच काढायचा...
काय छान दिवस होते राव ते.....
आठवत असतील हे नियम तर जरूर शेअर करा!
शाळा आमची छान होती,
.
.
.
Last bench वर आमची Team होती ….
.
.
.
जन-गण-मन ला शाळे बाहेर सुद्धा उभे
रहायचो …
.
प्रतिज्ञेच्या वेळी हाताला टेकू
देऊनही ….
प्रतिज्ञा म्हणायचो …
.
.
.
प्रार्थनेच्या वेळी मात्र….
.
सगळ्यांसारखे…नुसतेच
.
ओठ हालवायचो ….
.
.
.
पावसाळ्यात शाळेत
.
जाताना,
छत्री दप्तरात ठेऊन?
.
मुद्दामच भिजत जायचं,
.
.
.
पुस्तक भिजू नये
.
म्हणून ….त्याना पिशव्यांमध्ये ठेवायचं ….
.
.
.
शाळेतून येता येता …
.
एखाद्या डबक्यात उडी मारून…उगीचचसगळ्
यांच्या अंगावर पाणी उडवायचं
.
.
.
प्रत्येक Off -Period ला P.T.
साठी….आमचा आरडाओरडा असायचा …
.
.
.
शाळेतून
घरी येताना शाळेबाहेरचा….तो बर्फाचा
गोळा संपवायचा ….
.
.
.
>इतिहासात होता शाहिस्तेखान
.
>नागरिक शास्त्रात पंतप्रधान
.
>गणित… भुमितीत होतं …
.
पायथागोरसच प्रमेय…
.
>भूगोलात वाहायचे वारे….नैऋत्य…मॉ न्सून
.
का कुठलेतरी … वायव्य….
.
>हिंदीतली आठवते ती “चिटी कि आत्मकथा”
.
>English मधल्या Grammar नेच
झाली होती आमची व्यथा …
.
शाळा म्हटली कि अजूनह आठवतात…. Desk वर Pen
ने
त्या “Pen-fights”
.
खेळणं ….
.
.
.
Exams मधल्या
.
रिकाम्या जागा भरणं…
.
आणि जोड्या जुळवणं …
.
.
.
.
.
पण आता शाळा नाही, मित्र नाही,
.
परीक्षा नाही,
.
परिक्षेच Tension नाही, एकत्र राहण नाही
.
रुसवे फुगवे नाही.....I
.
.
..
आत्ता उरलीय फक्त
.
"दुनियादारी".।।।।
MISSING THAT GOLDEN DAYS OF LIFE.

Marathi funny jokes

वाघाच्या लग्नात
४ ते ५ कुत्री
आनंदाने नाचत होती आणी खूप खूप
धमाल करत होती
वाघाने विचारले
लग्न माझे आणी
तुम्ही का
इतक्या आनंदात??
कुत्रे बोलले...
आम्ही पण लग्नाआधी  वाघच होतो!!
😃😃😃😃😃😃😃

________________
आजोबा आजीच जोरात भांडण होतं .आजोबा रागाने आजीच्या जोरात थोबाडीत मारतात व म्हणतात ," अग वेडे पुरूष तिलाच मारतो .जिच्यावर तो सर्वात जास्त प्रेम करतो .😜😜 आजीने २ थोबाडीत .😄😄 ४ लाथा १५/२० लाटण्याचे फटके  मारुन ......" तुम्हाला काय वाटलं , 😀😀😀------------------- माझं तुमच्यावर प्रेम नाही ...?.
__________________________
दूध पिल्याने ताकद येते ???

मग 5 ग्लास दूध प्या अन् भिंत हलवण्याचा प्रयत्न करा ...
नाही हालत ना !!!
.
.
.
.
.
.

आता 5 ग्लास Kingfisher Strong प्या, अन् नुसतं भिंतीकडं बघा,
भिंत आपोआप हलेल !!!😜😜                                  Rishta vahi soch nayi...🍺🍺🍺
__________________________
😉😃बायको::: अहो तुम्ही  म्हणाला ना की, मी आता🍸🍸कारणाशिवाय दारू पिणार नाही म्हणून ..........मग आता का पिताय?

       नवरा::::::::-:अगं आता दिवाली जवल आली ना. मग रॉकेट सोडायला रिकामी बाटली नकोस का?
         म्हणून...............

झाली हौस,पाडला पाऊस............😊☺😉😉👆👆😀
__________________________

वर्ग ४ था (ढ) -

मास्तर: मुलांनो, दारू पिणे अतिशय वाईट! अगदी प्राण्यांना सुद्धा हे समजतंय पण मनुष्याला नाही! उदा: एका गाढवाला मी एका भांड्यात दारू आणि दुसऱ्यात पाणी दिले तरीही ते गाढव पाणीच प्याले. भांड्यांची अदलाबदल केल्यावरही गाढव सारखे पाणीच प्यायचे!

मास्तर: बंड्या, सांग यावरून तू काय शिकलास?

बंड्या: जो दारू पीत नाही तो गाढव !
मास्तरांनी  शाळा  सोडून  राजीनामा  दिला 😀😂😂😂
__________________________
भिकारी : साहेब, २० रुपये द्या ना,
चहा प्यायचा आहे.
.
.
गंपू : काय रे, चहा तर
दहा रुपयांना मिळतो. .
.
.
.
.
भिकारी : साहेब गर्लफ्रेंडला पण प्यायचाय
ना. .
.
.
गंपू : अरे वा, भिकाऱ्याने गर्लफ्रेंड पण
बनवलीय...!
.
.
भिकारी : नाही साहेब, गर्लफ्रेंडनेच
भिकारी बनवलंय ...!!!
😜😜😜😜😜😜😜😜😜
__________________________
नवरा आणि बायको जेवण करत असतात ….

नवरा : ए ऐक ना ….

बायको ; जेवताना बोलू नये ….

थोड्यावेळानी जेवण उरकल्यावर

बायको : हं …. आता बोल.

नवरा : आता काय कप्पाळ बोलू ….
तू झुरळ खाल्लंस लिंबाच्या लोणच्याची
फोड समजून …!!!😂

नवरा जोमात, बायको कोमात.....
__________________________

एका बोबड्या मुलीचं लग्न जमत नसतं.
शेवटी मोठ्या मुश्किलीने तिला बघायच्या वेळी
गप्प बसायला लावून तिचं लग्न ठरवतात.
लग्नात हार घालते वेळी तिला नवऱ्या मुलाच्या
टोपीवर किडा बसलेला दिसतो.
तो पाहून ती ओरडते
" तिडा तिडा "
त्या आवाजाला घाबरुन नवरा अजून जोरात
ओरडतो . . .
" तुताय तुताय "....
😆😆😆😆😝😝😂😂😂😂
__________________________
राम्या : परवा दिवशि माझी बायको हिरीत पडली ....,,,
लय लागल बग लय ओरडत होति ,,,..लय दुकत होत वाटत ,..,

शाम्या : मग आता कशि हायर ति ...,,,,,,

राम्या : आता बरि हाय वाटत काल पासन हिरीतुन आवाजच आला नाय.
एक छोटीशी गोष्ट ....
__________________________
राहूल : पप्पू .....! काय करतो रे तू आज काल ?

पप्पू : मी MBBS करतोय 😀

राहूल (हसुन) : तुला बघलं तेंव्हा तू शेतात

असतोस अन् MBBS कधी करतोयस ....?

पप्पू : MBBS म्हणजे " म्हशी बघत बघत शेती...😜 "🌱🌿🌾🐃🐃🐃🌱🌿🌾
________________________
१ मुलगा एका मुलीकडे पाहत असतो

मुलगी : घरी बहिण नाही का ?

मुलगा : आहे ना ...तिनेच सांगितलं

गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला १ वहीनी आण ...
😝😝😝
___________________________