रागावर नियंत्रण करण्याचे
एक सुंदर उदाहरण --

*एका वकीला ने सांगीतलेला हृदयस्पर्शी किस्सा "* -

"नेहमीप्रमाणे बसलो होतो.
एक पक्षकार आले.
हातात कागदाची पिशवी.
रापलेला चेहरा.
वाढलेली दाढी.
मळलेली कपडे.
म्हणाले..,
" सगळ्या च जमीनीवर स्टे
लावायचा आहे. आणखी काय
कागदं पाहीजेत?
किती खर्च येईल? "

मी त्यांना बसायला सांगितलं.
ते खुर्चीवर बसले.
त्यांची सर्व कागदपत्रे तपासली.
त्यांच्या कडून माहीती घेतली.
अर्धा पाउण तास गेला.
मी त्यांना सांगितलं. ,
" मी अजून कागदपत्रे पाहतो.
तुमच्या केसचा विचार करूया.
तुंम्ही असं करा
४ दिवसांनी परत या. "

४ दिवसांनी ते पक्षकार
पुन्हा आले.
तसाच अवतार.
भावा बद्दलचा राग अजूनही
कमी झाला नव्हता.
मी त्यांना बसायची खूण केली.
ते बसले.

मग मीच बोलायला सुरूवात
केली.
" मी तुमची कागदपत्रे पाहीली.
तुम्ही दोघे भाऊ.
एक बहीण.
आई वडील लहानपणीच गेले.
तुमच शिक्षण ९ वी पास.
धाकला भाऊ M.A.B.ed.
तुंम्ही भावाच्या शिक्षणा साठी
शाळा सोडली.
रानात लंगोटी वर राबला.
नेवरा दाजी च्या विहीरीवर
दगड फोडली.
सदाबापू च्या उसात
च-या पाडल्या.
पण भावाच्या शिक्षणाला पैसा
कमी पडू दिला नाही.
एकदा बहीण शेतात गुरं
चारत होती.
तुमचा भाऊ शाळेतून आला होता.
कसा तो म्हशीच्या आडवा गेला
आणि त्याला  शिंग लागली संपूर्ण शरीर रक्तबंबाळ झालं.
तुंम्ही खांद्या वरून त्याला
बोरगावला नेलं.
खरं म्हणजे त्यावेळी तुमचं
पण कळतं वय नव्हतं....

फक्त कळती माया होती..

आई बापाच्या मागं यांचा मीच
आई बाप ही भावना होती...
तुमचा भाऊ B.A ला गेला.
उर भरून आला.
तुम्ही पुन्हा जोमानं कष्ट
उपसायला लागला.
पण अचानक त्याला किडनीचा
त्रास सुरू झाला.
दवाखानं केल..
बाहेरचं केलं..
पण गुण आला नाही..
शेवटी डॉक्टर नं किडनी काढायला
सांगितली.
तुंम्ही तुमची किडनी दिली.
ऑफिसर झाल्यावर खुप
फिरायच आहे..
नोकरी करायची आहे..
तुला आमच्या पेक्षा लय त्रास..

आंम्ही रानातली माणसं.
आंम्हाला एक किडनी असली
तरी चालतय.
तुम्ही बायकोच सुध्दा न
ऐकता किडनी दिली.

भाऊ M.A ला गेला.
होस्टेल वर रहायला गेला.
गावात मटण पडलं..
डबा नेवून द्यावा.
शेतात कणसं आली..
कणस नेवून द्यावी.
कुठला सण आला..
पोळ्यांचा डबा द्यावा..
घरा पासून हॉस्टेल च अंतर
२५ की.मी.
पण तुंम्ही सायकलने गेला.
घासातला घास घातला.
भावाला नोकरी लागली..
तुंम्ही गावात साखर वाटली..

३ वर्षीपुर्वी त्याचं लग्न झालं ..
झालं म्हणजे त्यानंच केलं.
तुंम्ही फक्त हजर होता. पण
तरी अभिमान होता..

भावाला नोकरी लागली.
भावाच लग्न झालं..
आता तुम्हाला आणि बायका पोरांना
सुख लागणार होतं;
पण झाल उलटंच....
लग्न झाल्या पासुन भाऊ घरी
येत नाही..
बोलावलं तर म्हणतो;
मी बायकोला शब्द दिलाय..
घरी पैसा देत नाही..
विचारलं तर म्हणतो अंगावर
कर्ज आहे..
गेल्या वर्षी कोल्हापुरा त फ्लॅट
घेतला.
विचारल तर म्हणतो कर्ज
काढून घेतलाय..!! "

सगळं सांगून झाल्यावर मी
थोडा वेळ थांबलो.

नंतर म्हणालो ...
" आता तुमचं म्हणणं आहे की
त्याने घेतलेल्या मिळकती वर
स्टे लावायचा ?

तो पटकन म्हणाला;
हो बरोबर...

मी म्हणलं;
स्टे लावता येईल.
भावाने खरेदी केलेल्या मिळकती
मधला हिस्सा पण मिळेल.
पण......

पण तुंम्ही दिलेली कीडनी परत
मिळणार नाही.
तुम्ही भावासाठी आटवलेलं
रक्त परत मिळणार नाही.
तुंम्ही त्याच्या साठी खर्च केलेलं
आयुष्य पण परत मिळणार नाही..
आणि मला वाटतयं या
गोष्टी पुढं त्यानं घेतलेल्या फ्लॅटची
किंमत शुन्य आहे.
त्याची नियत बदलली.
तो त्याच्या वाटंनं गेला.
तुंम्ही त्याच वाटेनं नको जाऊसा.
तो भिकारी निघाला..
तुंम्ही दिलदार होता..
दिलदारच रहा..
तुम्हाला काहीएक कमी
पडणार नाही.. !!
उलट मी म्हणेन वडीलो पार्जित
मिळकती मधला तुमचा हिस्सा
तेवढा पेरा.. त्याचा हिस्सा पडीक
राहु द्या..
कोर्ट कचेरी करण्या पेक्षा मुलांना
शिकवा.. शिकुन तुमचा भाऊ
बिघडला ;
म्हणुन पोरं बिघडणार नाहीत.. !! "

त्यान १० मिनीटं विचार केला..
सगळी कागद पिशवीत कोंबली..
डोळं पुसत म्हणाला;
"  चलतो सायेब... !! "

या गोष्टीला ५ वषॅ झाली.
परवा तो पक्षकार अचानक
ऑफीस ला आला.
बरोबर गोरागोमटा पोरगा.
हातात कसली तरी पिशवी.
मी म्हटले बसा..
तो म्हणाला ,
'' बसायला न्हाय आलो सायेब,
पेढं द्यायला आलोय ''.

हा माझा पोरगा.
न्युझिलॅंन्डला असतो.
काल आलाय.
आता गावात ३ मजली घर हाय.
८-९ एकर शेत घेतलय.
तुंम्ही म्हणाला होता कोर्ट
कचेरी च्या वाटला लागु नका.

मी पोरांच्या शिक्षणा ची
वाट धरली.. !! "

मला भरुन आलं...

हातातला पेढा हातातच राहीला..

.    ..  ."

रागाला योग्य दिशा दिली तर
पुन्हा रागवायची वेळ
येणार नाही...

*कितीही कमवा*
            *पण कधी गर्व करू नका*
    *कारण बुद्धिबळाचा खेळ संपल्यावर*
                  *ऱाजा आणि शिपाई*
     *शेवटी एकाच डब्यात ठेवले जातात,*
            *आयुष्य खूप सुंदर आहे*
    *एकमेकांना समजून घ्या व जीव लावा*
🙏🏻  🙏🏻 *हाक तुमची साथ आमची*🙏🏻🙏🏻

*धुक्याने एक छान गोष्ट शिकवली की*:,
*जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं*,
*एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल*...!!
🍁🌾🌷🌸🌹

*हे कायमचे लक्षात ठेऊया:*

*1) 🤑🌶🍒 लिंबू-मिरची खायची असतात - बांधण्यासाठी नसतात..*

*2) 😱🐈 मांजर पाळायची असते - मांजर आडवी गेली कि काही वाईट होत नाही.उलट उंदरांपासून नुकसान होण्याचे टळते.*

*3) 🗣💭💃 शिंक येणे हा नैसर्गिक प्रकार आहे - शिंकल्याने काही अघटीत होत नाही किंवा काही अडचणीही येत नाहीत..*

*4) 💀🌳 भूत झाडावर राहत नाही - झाडावर पक्षी राहतात..*

*5) 🔬🔭 चमत्कार असे काही नसते - प्रत्तेक गोष्टी मागे विज्ञान आहे प्रत्येकाला कारण आहे..*

*6) ⛄☃ बुवा, बाबा लोक खोटे आहेत - ज्या लोकांना अंग मेहनत करायची नसते तेच हे लोक..!!*

*7) ⛈🌪👺🔥 करणी,         जादू टोणा काही नसते - हे भ्याड लोकांच्या मनाचे खेळ आहेत..*
*जादू-टोणा करून ग्रहाची दिशा बदलणारे हे ढोंगी बाबा: वारा, ढगांची दिशा बदलून पाऊस का पाडत नाहीत...?*⛈☁🌒💫

*8)🌏🐠वास्तुशास्त्र भ्रामक आहे. केवळ दिशांची भिती दाखवून लूट आहे.*
*खरे तर पृथ्वी ही स्वत: क्षणा* *क्षणाला दिशा बदलत असते.*
*खरेच कुबेर उत्तर दिशेला* *असता तर जगातील इतर ठिकाणी कसा आला नाही.*

*9) 👼🐓🐐🍇🍎नवसाने,  व्रताने, पुजेने, नैवैद्याने, बळीने, देणगीने, प्रसन्न होऊन फळ देतो देव, म्हणजे तो काय लाचखाऊ आहे का ?!!*

*10) हे जे वाचलात ते स्वता अनुकरण करा आणि आपल्या मित्रांना देखिल send करा ।*

*हा मैसेच बाकी ग्रुपवर send केल्यामुळे काही चांगली बातमी येणार नाही पण पुढची पीढ़ी नक्की  सुधरे

☀  मुहूर्ताचे वेड ☀
ज्या दिवशी आपला जन्म झाला तोच दिवस, तीच वेळ आपल्यासाठी शुभ..!! जन्माला येताना कधी मुहर्थ पहिला नाही. व मरतानाही पाहणार नाहीत. तरी सुद्धा जिंदगी मुहूर्त पाहण्यात जाते. सगळेच दिवस,, सर्वच वेळ शुभ आहे. फक्त इच्छाशक्ती प्रबळ असावी..आपल्यासाठी  सर्वच दिवस सर्वच वेळ शुभ आहे..!!

☀ कुंडल्या पाहून लग्नांचे मुहूर्त काढले जातात तरी अनेक स्त्रीया विधवा व पुरूष विधूर का होतात...? 
पत्रिका व कुंडली जुळवून लग्न झालेल्या जोडप्यांचे घटस्फोट का  होतात, तर काही अकाली मृत्यू होतात असे का..?
95% विवाह हे मुहूर्तानुसार वेळेवर लागत नाहीत तरी मुहूर्ताचा आग्रह का धरावा...?
  
☀ मुहूर्त पाहून निवडणुकीसाठी उभे राहणा-या सर्व उमेद्वारांपैकी एकच निवडून येतो आणि बाकीचे आपटतात. असे का घडते.....? एकालाच मुहूर्त शुभ होता काय ?

मंत्रीपद मिळाल्यानंतर  मंत्रालयाची  जबाबदारी स्वीकारण्यासाठी  व खुर्चीवर बसण्यासाठी  शुभ मुहूर्त शोधतात तरी त्यांच्या योजना अयशस्वी का होतात...????  मंत्रीपद अल्प कालावधीत का जाते !

☀ शुभ मुहूर्तावर  मूल जन्माला घातल्यास  वैज्ञानिक,  राष्ट्रपती,  पंतप्रधान  होईल काय..?
☀ अंबानीच्या जन्म मुहूर्ताला जन्माला आलेली  व्यक्ती ....ती पण ..अंबानीसारखी  झाली का...?

☀ उच्च शिक्षित डॉक्टर, इंजिनियर  , उद्योजक, आपल्या कार्यालयाचे  बांधकाम करतांना,  व्यवसायास प्रारंभ करतांना मूहूर्त पाहूनच सर्व करतात.....तरी सुद्धा  कित्येकांना अपयश येते असे का...?

         :  कारण :
☀   शुभमुहूर्त  हे थोतांड आहे सत्य नव्हे... ज्यांचा स्वतः वर विश्वास नसतो ,तेच लोकं अशा गोष्टींवर विश्वास ठेवतात.
☀मुहूर्त पाहणारी पेशवाई नष्ट झाली ...आणि कधीही मुहूर्त न पाहणारी .....ब्रिटिशशाही अख्खा  भारत देश गिळून बसली.
☀स्वतःवर व स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवा. चांगले कर्म हेच देव-ईश्वर माना.

☀ जर कोणता पंडित, ज्योतिषी, बुवा, बापू, कापु, झापु महाराज,साधू ,साध्वी तथा वास्तूशास्त्र विशारद शुभमुहूर्तावरच सर्व काही केल्यास तथा वास्तूशास्त्राप्रमाणेच बांधकाम केल्यास यश येईल असे सांगत असतील तर..... स्टँम्प पेपरवर लिहून देण्यास सांगा.  यश न आल्यास नुकसानभरपाईचा दावा ठोकेल  असे सांगा . ते तुमच्या जवळही फिरकणार नाहित.
कारण त्यांनाही माहित असते हे सर्व थोतांड आहे.

☀ जर तुमचं  मन साफ असेल व  तुमच्यात प्रयत्न करण्याची क्षमता असेल....तर तुमच्यासाठी कोणतीही  वेळ  ही  ' शुभ मुहूर्तच ' असते " चला तर आजपासून शुभ-अशुभ या चक्रात न पडता विज्ञानवादी होऊ या.

🙏🏻चला..जगण्याची दिशा बदलूया..!!

सुरुवात स्वतःपासून..!!🙏🏻

Coffee ☕

एकदा कॉलेजचे काही मित्र अनेक वर्षानंतर भेटतात.
.
ते सर्वजण आपल्या करियर मध्ये खूप चांगले कार्य करत असतात आणि भरपूर पैसे कमावत असतात.
.
एकमेकांशी बोलत असतांना खूप वेळेनंतर ते त्यांच्या कॉलेजचे सर्वांत आवडते प्रोफेसर यांना भेटण्याचे ठरवतात.
.
प्रोफेसरांच्या घरी गेल्यानंतर ते प्रोफेसर त्या सर्वांचे स्वागत करतात आणि सर्वांना त्यांच्या करियरबद्दल विचारतात.
.
हळुहळूगप्पा रंगतात आणि त्यादरम्यान ते जीवनात येणाऱ्‍या अडचणी आणि कामात येणारा तणाव याविषयी चर्चा करतात.
.
सर्वजण या मुद्दयाशी सहमत असतात की,जरी आपण आर्थिक स्थितीने मजबूत असलो तरी पण आपण पुर्वीच्या आयुष्यासारखे आता सुखी नाही.
.
ते प्रोफेसर सर्वांचे बोलणे खूप लक्ष देऊन ऐकत असतात...
.
आणि मग ते अचानक किचनमध्ये जातात आणि थोड्या वेळाने परतल्यावर सर्वांना म्हणतात की,
.
मी सर्वांसाठी कॉफी आणली आहे पण तुम्ही किचनमध्ये जाऊन एक-एक कप स्वतःसाठी घेऊन या...
.
सर्वजण किचनमध्ये जातात.तिथे अनेक प्रकारचे कप असतात.
.
आपल्या आवडीप्रमाणे ते सर्वजण कप घेऊन येतात.
.
मग ते प्रोफेसर कॉफी देतात आणि म्हणतात की,
.
"तुम्ही सर्वांनी चांगला जो कप किंमतीने महाग आहे तोच निवडला.जे कप साधारण आहेत त्या कपांकडे तुम्ही लक्ष दिले नाही.
.
जेव्हा एकीकडे आपण स्वतःसाठी चांगली इच्छा मनात ठेवतो तर दुसरीकडे हीच इच्छा आपल्या जीवनात अडचणी आणि तणाव आणत असते.
.
हे तर निश्चित आहे की,
कॉफीच्या क्वालिटी मध्ये कोणताच बदल होणार नाही.हा तर एक प्रकार आहे की,ज्याच्या माध्यमामधुन आपण कॉफी पित असतो.
.
तुमची खरी इच्छा कॉफी पिण्याची होती,
कपाची नाही.
तरीपण सर्वांनी चांगले आणि महागच कप निवडले.
आणि आपला कप निवडल्या नंतर तुम्ही
दुसऱ्‍यांच्या कपाकडे लक्ष दिले.
.
सर्वांनीच जरी कोणतेही कप निवडले असते तरी कॉफीची चव बदलली नसती.
.
तात्पर्य— आपले जीवन हे कॉफीसारखेच आहे.
आपली नोकरी,पैसा व परिस्थिती हे सर्व कपांसारखे फक्त जीवन जगण्याचे साधने आहेत खरं जीवन नाही.
.
म्हणून कॉफीची चिंता करा कपाची नाही.
.
जगातील सर्वांत सुखी माणसे ती नसतात ज्यांच्याकडे सर्व काही इतरांपेक्षा अधिक चांगलं असतं तर ते सुखी असतात की जे त्यांच्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीचा चांगला उपयोग करतात...!
.
म्हणून साधेपणाने जगा.
सर्वांशी प्रेमाने वागा.
सर्वांची काळजी घ्या....
.
आणी आवडल्यास शेअऱ नक्की करा...
Hope..की तुम्हाला नक्की आवडेल

@@!!""आम्ही संपुर्ण जग फिरलो,संपुर्ण पृथ्वी आम्ही आमच्या अधिपत्याखाली आणली पण या पृथ्वीवरील "भारत" या देशावर आम्ही राज्यच कसं करू शकलो यावर आमचा विश्वास बसत नाहीए कारण या देशात "शिवाजी" जन्माला आला होता!!""@@
(तत्कालिन ब्रिटिश पंतप्रधान अँटली)

@@!!""जर "शिवाजी" हा इंग्लंडमध्ये जन्माला आला असता तर आम्ही पृथ्वीवरच काय पण परग्रहावरही राज्य केले असते""!!@@
(लॉर्ड माउंटबँटन,इंग्लंड)!!

@@!!""भारताला जर स्वातंत्र्य मिळवुन दयायचं असेन तर एकच पर्याय आहे---शिवाजी""!!@@ (नेताजी सुभाषचंद्र बोस)

@@!!""नेताजी तुमच्या देशाला स्वातंत्र्यासाठी कुठल्या 'हिटलर'ची गरज नाहीए तर तुमच्याच देशात जन्माला आलेल्या शिवाजी च्या इतिहासाची गरज आहे""!!@@
(अँडॉल्फ हिटलर)

@@!!""शिवाजी हे फक्त नाव नाहीतर शिवाजी ही आजच्या तरूण पिढीसाठी उर्जा आहे जिचा वापर हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी होऊ शकतो""!@@
(स्वामी विवेकानंद)

@@!!"" जर शिवाजी आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही त्यास 'सुर्य' संबोधले असते""!!@@
(बराक ओबामा,अमेरिका)

@@!!" जर शिवाजी महाराज अजुन १० वर्षे जगले असते तर इंग्रजांना पुर्ण हिंदुस्थानचा चेहरा सुध्दा पाहता आला नसता"!@@
(इंग्रज गव्हर्नर)

@@!!"" काबुलपासुन कंदहारपर्यंत माझ्या तैमुर खानदानाने मोघली सत्ता निर्माण केली.इराक,इराण,तुर्कस्तानच्या कित्येक नामांकित सरदारांना माझ्या तैमुर खानदानाने पाणी पाजलं पण हिंदोस्थानात मात्र आम्हाला "शिवाजी" ने रोखलं! सर्व शक्ती मी शिवाजीचा पराभव करायला खर्च केली पण शिवाजी काही माझ्या हाती नाही आला!
या अल्लाह!! दुश्मन दिया भी तो कौण दिया?
"सिवा भोसला"जैसा दिया.
अपने जन्नत के दरवाजे खुले रखना खुदा क्योंकि दुनिया का सबसे बहादुर योध्दा और दिलदार दुश्मन तेरे पास आ रहा है""!!@@
(छत्रपति शिवरायांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने नमाज पढताना काढलेले उदगार,संदर्भ-खाफिखानाची बखर)

@@!!"" उस दिन सिवा भोसला ने सिर्फ मेरी उंगलियां नही काटी बल्कि मेरी ताकद के घमंड को भी उतारा.
मै अब निंद मे भी सिवा भोसला से मिलना नही चाहता""!!@@
(शाहीस्तेखान,संदर्भ- खाफिखानाची बखर)

@@!!"" क्या उस गद्दारे दख्खनसे "सिवा" नाम का लोहा लाने के लिए एक भी मर्द नही है इस दरबार में.लानत है ऐसी मर्दानगी पे""!!@@
(बडी बेगम अलि आदिलशाह)

@@!!"" Shivaji,The King of India"!!@@
(London Gadget-१७ व्या शतकातलं युरोप खंडातील Top वर्तमानपत्र)

वरील उदाहरणावरून मी नेहमी जाणिवपुर्वक छत्रपती शिवरायांचा आंतरराष्ट्रीय किर्तीचे राजे म्हणुन उल्लेख करतो,जागतिक दर्जाचे योद्दे म्हणून शिवरायांची ओळख आहे ती यामुळेच!!!
महाराजांनी त्यांच्या ३० वर्षाच्या आयुष्यात ज्या ज्या सेनानींचा पराभव केला त्यामध्ये फक्त २ च भारतीय बाकि सर्वजण हे परकिय सरदार आणी त्या त्या देशाचे नामांकित सरदार होते!!

ज्या शाहीस्तेखानाची बोटे महाराजांनी लाल महालात छाटली आणी त्याच्या मनात शिवाजी या नावाचा खौफ निर्माण केला तो शाहीस्तेखान साधासुधा मामुली सरदार नव्हता तर तो "अबू तालिबानचा नवाब होता,तुर्कस्तानचा नवाब होता!! प्रतिऔरंगजेब म्हणुन ओळखणारा हा शाहीस्तेखान औरंगजेबाचा सख्खा मामा होता.त्याने प्रचंड मोठा पराक्रम करून मोघलांना मोठा बंगाल प्रांत जिंकुन दिला होता.
पण एका रात्रीत महाराजांनी लाल महालात घुसुन त्याची बोटे छाटली आणी काही कळायच्या आत पसार झाले! परिणामी शाहीस्तेखानाने त्यानंतर शिवाजी या नावाची इतकि भिती घेतली कि शिवाजीला आता मला स्वप्नात देखील भेटायचं नाहीए असं त्याने औरंगजेबाला सांगितलं इतका खौफ या नवाबाच्या मनात निर्माण केला होता!!

तो बेहलोलखान पठाण,सिकंदर पठाण,चिडरखाण पठाण इ.ज्यांना महाराजांनी रणांगणावर धु दु धुतलं हे सर्व अफगाणिस्तानचे मातब्बर सरदार होते!!

दिलेरखान पठाण!! मंगोलियन सरदार,मंगोलिया देशाचा सर्वोत्तम योध्दा होता हा!
महाराजांनी याचा पराभव केला!!

सिध्दी जौहर,सिध्दी सलाबत खान हे इराणी होते,इराणचे शुर सरदार होते! महाराजांनी यांना रणांगणात पाणी पाजलं!!

उंबरखिंडीत ज्याचा कोंडुन पराभव केला,तो कारतलब खान उझबेकिस्तानचा सरदार होता म्हणजे आत्ताच्या रशियाचा!! या महाराजांच्या विजयाची नोंद साक्षात गिनिज बुकाने देखील घेतली.कमीत कमी सैन्याने जास्तीत जास्त सैन्याचा केलेला पराभव!!(१००० मावळे विरूध्द ३०,००० गनिम आणी या ३०,००० पैकि एकही जिवंत राहीला नाही आणी १००० पैकि एक ही मावळा गमावला नाही)

१७व्या शतकात युरोप खंडित "लंडन गँझेट" नावाचं आघाडीचं वृत्तपत्र होतं.जेव्हा महाराज आग्र्यावरून सहीसलामत सुटले तेव्हा या वृत्तपत्राने पहिल्या पानावर पहिली बातमी छापली आणी त्यात महाराजांचा Shivaji,The King of India असा उल्लेख केला!!

व्हिएतनाम या छोट्याशा राष्ट्राने (पुण्याएवढया) बलाढय अमेरिकेवर विजय मिळविला कारण "शिवाजी"!! तर व्हिएतनामचा राष्ट्राध्यक्षांनी (नाव आठवत नाहीए) त्यांच्या समाधीखाली असं लिहीलंय कि," शिवाजी महाराजांचा एक मावळा इथे विश्रांती घेतोय)!

औरंगजेबाने ऐन उमेदीची २७ वर्षे महाराष्ट्रात वाया घालवली.होय! वायाच घालवली कारण त्याने २७ वर्षे मराठयांशी निकराची झुंज दिली पण १ इंच महाराष्ट्राची भुमी तो जिंकु शकला नाही,कदाचित ही २७ वर्षे त्याने दुस-या प्रदेशांवर घालवली असती तर तो अर्ध्या पृथ्वीचा तो अधिपति झाला असता इतक्या बलाढय फौजेचा तो बादशाह होता!!

मग सांगा का छत्रपति शिवराय आंतरराष्ट्रीय स्तरावरील योद्दे नव्हते!
नक्किच महाराज हे जागतिक दर्जाचे सेनानी होते हे यावरुन सिध्द होतंय!!
पण दुर्देव अख्या जगाला माहीती आहे महाराज काय होते ते पण भारतातील जनतेलाच माहीती नाही कारण तसं असतं तर महाराजांना आम्ही जाती आणी धर्माच्या बंधनात अडकवुन मर्यादित ठेवलं नसतं!!!!!
पण आता हिथुन पुढे ही चुक करायची नाही तर महाराजांचा उल्लेख करताना फक्त मराठयांचा राजा असं न करता "हिंदुस्थानचा सम्राट,शहेनशाह-ए-हिंदुस्थान,भारताचा राजा" अशिच करावी ही विनंती कारण आपल्याला महाराजांना जागतिक स्तरावर न्यायचंय नेपोलियन बोनापार्टसारखं!! ती आपली जबाबदारी आहे!!

!!@@""बांधकर पगडी जब घोडेपर सवार होते,उठाकर तलवार जब लढणे के लिए चल पडते,देखती सारी दुनिया और झुकके बोलती,
'ए खुदा काश हम भी मराठा होते'!!""@@

🙏जय जिजाऊ🙏जय शिवराय🙏

Satya Narayan

आपल्या घरच्या बायाला हे
वाचून दाखवा 👇🏻👇🏻👇🏻👇🏻
भटांचा सत्यनारायण कोठुन आला
👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻

🌞कथा ही सत्य नारायणाची 🌞
    🌞आधुनिक सत्य कथा 🌞

ऐका सत्य नारायणाची कथा...
दूर होतील आता तुमच्या व्यथा,
21व्या शतकात सुरू होईल नवीन प्रथा।।
हा! हा!! हा!!!

पुण्यात एक प्रतिष्ठीत ब्राम्हण पंडित होते, त्यांची एक विधवा मुलगी होती.नाव तिचं सत्या  ती विधवा असल्यामुळं फारशी चारचौघात मिसळत नसे.तिचे ब्राह्मणाने मुंडण केलेले होते.

तरीही ती खूप सुंदर दिसत  होती ,आणि मुख्य म्हणजे तरुण होती .सदर ब्राह्मणाच्या घरी एक माळी होता ,बागकाम करायला.फावल्या वेळेत इतर कामात मदत करायचा. त्याच नाव होतं नारायण.त्याची ये जा घरात चांगलीच होती.या कामाच्या येण्याजाण्यात त्याची अपघातानं या कन्येशी ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झालं. आगीजवळ लोणी आलं अन ते वितळलं. तिला दिवस गेले ,पण ही गोष्ट लक्षात यायला खूप उशीर झाला होता.कारण विधवेकडे लक्ष कोण देतो ? हे दुर्लक्ष महाग पडलं . ब्राम्हणाचा नाईलाज झाला .त्यानं मुलीला अडगळीच्या खोलीत कोंडलं, आणि नारायणाला मारुन टाकलं .

इकडे गरोदर मुलीचे नऊ महिने पूर्ण झाले ,एका रात्री या विधवेनं पहाटे चार वाजता एका गोंडस बाळाला जन्म दिला .ब्राम्हणानं ते बाळ उचललं आणि परसदारी  नेऊन केळीच्या बनात केळीच्या बुंध्याशी ठेवलं .ते रक्तानं माखलेलं बाळ ठेवताना ती केळही रक्तानं माखली . ब्राम्हणाला वाटल,ं कुणी श्वापद येऊन ते बाळ खाऊन टाकील आणि आणखी पाप
होण्यापासून आपली सुटका होईल .पण झालं उलटच!

ते बाळ थंडीमुळं आणि चिलटं चावल्यामुळं  व्याकुळ होऊन टाहो फोडून रडायला लागलं . त्या चिमण्या आवाजानं आसमंत जागं झालं . काही लोकांना आवाज आला .कुणाचं बाळ इतक रडतयं हे पाहाण्यासाठी लोक जमू लागले .पहाट झाली .सगळा गाव गोळा झाला . इकडे ब्राम्हणाला कुणकुण लागली.काहीच घडलं नाही अशा अविर्भावात ब्राम्हण केळीच्या बागेत आला आणि जोर जोरात ओरडू लागला केळ व्यायली, केळ व्यायली!केळीनं दिव्य बाळाला जन्म दिला!! चमत्कार झाला!!! भाबड्या लोकांचा या चमत्कारावर लगेच विश्वास बसला. कारण केळीवर रक्ताचे डाग होतेच. लोकांनी बाळाला उचललं. कपड्यात गुंडाळलं .पण बाळ रडायचं काही थांबेना . कारण बाळ भुकेजलेल होतं .

आता बाळाला दुध कोण पाजणार  ? मग ब्राम्हणानेच युक्ती सुचवली .म्हणे गावात दवंडी पिटवा ,जी महिला बाळाला गप्प करील तिला हे दिव्य बालक दिलं जाईल. दिव्य बालक मिळेल या लालसेनं महिलांची रांग लागली . पण असा कसा कुठल्याही बाईला पान्हा फुटेल ? गावातल्या सगळ्या बाया येऊन गेल्या . बाळ काही रडायचं थांबत नव्हतं .शेवटी शोध सुरु झाला कुणी बाई राहिली आहे का ? कुणीतरी सुचवलं की ब्राम्हण पंडिताचीच विधवा मुलगी आता शिल्लक राहिली आहे. तिला तरी आणून बघा .मग तिला बोलावण्यात आलं.तिनं बाळाला जवळ घेताच बाळ गप्प झालं.झालं!!! उध्दार झाला ब्राम्हणाच्या पोरीचा! मग त्या अनौरस दिव्य बालकाचं नाव ठेवले गेलं,
सत्या + नारायण =सत्यनारायण! केळीच्या पोटी जन्म झाला म्हणून सत्यनारायण चार केळीच्या खांबामध्ये ठेऊन पुजला जातो . अशी हि साठाउत्तराची कहाणी सुफळ संपूर्ण झाली.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मित्रांनो ही कथा वाचल्यावर पुराणकथा कशा रचल्या गेल्या असतील ह्याची कल्पना यावी. हा पगडा एवढा जबरदस्त आहे की, अशी व्रते करण्यात स्त्रियाच आघाडीवर असतात.कारण पुरूषाने धार्मिकतेच्या आडून स्त्रियांना मानसिक गुलाम बनवले आहे. अशा कथांतून स्त्रीचा आणि पर्यायाने पूर्ण कुटूंबाचा उद्धार होतो असे भासवले जाते.

शिवरायांच्या काळात सत्यनाराणाचा मागमूस नव्हता, म्हणूनच शिवाजी राजांनी कधी सत्यनारायण पूजल्याचा दाखला इतिहासात सापडत नाही.त्याचा जन्म उत्तर पेशवाईत झाला. कारण ब्राह्मणांना पेशव्यांकडून मिळणारा रमणा म्हणजे दक्षिणा मिळणे बंद झाले.सत्यनारायणाची पूजा अगदी अलीकडची आहे. सुमारे दोनशे वर्षांपूर्वी बंगालमध्ये सत्येन पीर हा मुस्लिम दर्गा होता. या पिराची पूजा-उरूस दरवर्षी होत असे. त्याला प्रारंभी फक्त मुसलमान जमत.नंतर ब्राह्मणही जाऊ लागले. पुढे काहीतरी गडबड झाली आणि ब्राह्मणांनी जायचे बंद केले. पर्यायी पूजा करण्यास सुरुवात केली. त्यासाठी सत्येन मधल्या ‘ सत्ये’ चा ‘ सत्य’ केला आणि ‘ न’ चा ‘ नारायण’ झाला आणि ‘सत्य- नारायण’ अस्तित्त्वात आला.ब्राह्मण पुरोहित वर्गाने हा नवा धंदा तात्काळ ओळखला आणि त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने वाढविला. त्यासंबंधीच्या पोथ्या लिहिल्या.स्कंद पुराणात सत्यनारायणाची कथा घुसडली आणि त्याला प्राचीनतेचा, पौराणिकतेचा टच दिला.

गाडगे बाबांनी तर या देवाला चुलीत घाला म्हणून सांगितलंय .जर सत्यनारायण साधूवाण्याची बुडालेली  बोट वर  काढू शकतो तर दुस-या महायुध्दात बुडालेल्या बोटी सत्यनारायण घालून वर काढून दाखवा , आव्हानही त्यांनी धर्म मार्तंडांना केलं होतं. आजवर ते शक्य झालेल नाही.

म्हणून मित्रांनो, आतातरी डोळे उघडा.आख्खा हिंदू धर्म भटांच्या थोतांडांनी ,खोट्या भंपक कथांनी विकृत झालाय, हे समजून घ्या. आणि कर्मकांड टाळा. नशीबापेक्षा प्रयत्नांवर भर द्या. वैज्ञानिक सृष्टी जशी आपलीशी केलीत तशीच वैज्ञानिक दृष्टीही स्वीकारा म्हणजे आत्मविश्वासाने संकटांवर मात करण्याची शक्ती मिळेल.