Showing posts with label असेच बोलता बोलता .....(asech bolata bolata). Show all posts
Showing posts with label असेच बोलता बोलता .....(asech bolata bolata). Show all posts

मुलाचं लग्न झाल्यानंतर माझं कीचन पुर्ण बदललयं... सुनेने त्याला पुर्ण मॉडर्न बनवलयं..!!

बाहेर काम करुन घरी लवकर आली की किचनमधे शिरुन काही ना काही बनवण्याची तिला हौस आहे..

पुर्वी मी विळी घेऊन भरभर कांदा कापत होते पण आता तिने कांदा कापून द्यायच यंत्रही आणलयं.. खोबर किसायचंही....

खरंच.. जेवण बनवणं कीती सोप्पं झालयं!  *काही सासवा या सुधारणा स्विकारत नाहीत...* 

"आमच्या वेळी नव्हते बाई असले नखरे..स्वतःच्या हातानी करायचो सगळी कामे ."  अशी वाक्य फेकत विनाकारण सुनांना कमी लेखण्यातच त्या धन्यता मानतात...

अरे असु देत ना.. तुम्हाला नाही मिळालं तरुणपणात सुख म्हणून तर सुनांनीही घ्यायच नाही ?

उलट तुम्ही सुध्दा त्याच्या बरोबरीने नवीन एंजॉय करायचा प्रयत्न करा..
उद्या त्यांच्या सुना आल्या तर त्या आणखीन काहीतरी नवीन बदल करतीलच की... आपण जातं सोडून पीठाच्या गिरणीकडे वळलोच ना? पाटा वरवंटा सोडून मिक्सरला आपलसं केलच ना? मग येऊ देत की विचारातही आणखीन बदल... त्या यंत्रांशी खेळण्यात पण एक मज्जा आहे.. ती घ्या..
आणि सुनेने कौतुकाने समोर आणलेला पास्ताही मनापासून खा ! मग बघा ती सुध्दा तुमची चपाती भाजीही किती चवीने खातेय ते...

माझी सुन खाते मी केलेलं आवडीने.. मीही स्विकारलीय तिच्या हातची  वेगळी चव... 😊😊😊
आपल्या मुलासाठी सुन स्वत:ला बदलवतच असते की.. मग आपल्या मुलासाठीच आपणही जरा बदललं तर त्याचाच संसार सुखाचा होईल... तेच तर हवं असत ना आईला??

*आणि हो..* सुनेनेही आपल्या सासुबाईला आईसारखे मानावे.. त्यांच्या बोलण्यामागेही मुलाचे व कुटुंबाचे भले व्हावे हीच अपेक्षा असते..

*माणसाने बदल स्विकारले की नाती सुदृढ होतात..!!*

- एक सासुबाई

Dr. A. H. Salunkhe Sir
(डॉ. आ. ह. साळुंखे) -

आपल्या भारतीय शिक्षणव्यवस्थेचे स्वतःला बुद्धीजीवी समजणाऱ्या मुर्ख
लोकांनीच बारा वाजवलेत...

पहा ते कसे...

शाळेत पहीला तास मराठीचा
शिक्षक शिकवितात
-ज्ञानेश्वरांनी निर्जीव भिंत हवेत
चालवली.

दुसरा तास विज्ञानाचा
शिक्षक शिकवितात -
निर्जीव वस्तुला चेतना नसल्यामुळे ती
जागची हलु शकत नाही.

परीक्षेत प्रश्न आला
चूक कि बरोबर ते लिहा....
प्रश्न- निर्जीव वस्तू हालचाल करू शकते ??
आता बोला विद्यार्थ्याने परीक्षेत काय
उत्तर लिहायचे ?
चूक कि बरोबर ?
आणि जरी कसेबसे त्याने उत्तर लिहिले तर
त्याला कोणत्या दर्जाचे शिक्षण मिळाले
हे आपल्याला कळलेच असेल .

आता तो जागतिक स्पर्धेच्या युगात टिकेल
काय??
अजिबात नाही !
आमच्या राष्ट्राची प्रगती होत नाही
कारण हेच...
आमच्या शिक्षणव्यवस्थेवर स्वतःला
बुद्धीजीवी समजणाऱ्या मुर्ख लोकांचे
नियंत्रण आहे....

भटशाहीचे स्तोम माजवण्यासाठी
भ-भटजीचा,
य-यज्ञाचा
आम्हाला लहानपणापासून शिकववतात आणि
अज्ञानाचा पाया घट्ट करतात.....

यांचे उच्चाटन केल्याशिवाय राष्ट्राची
प्रगती शक्यच नाही.....

अमावस्या आली की बाजारात
"काळ्या बाहुल्या"
(त्याला मिरची,
बिबवा, लिंबू इत्यादि साहित्य
बांधलेलं असत) विक्रीला येतात.
काही अनर्थ घडू नये म्हणून
अमावास्येला घरावर किंवा दुकानावर काळ्या बाहुल्या टांगल्या जातात.मोठ्या बिल्डींगवर अवाढव्य
बाहुल्या टांगल्या जातात. पण
या भारतात

छत्रपती शिवाजी महाराज एकमेव
विज्ञानवादी राजा झाले.
शिवरायांनी ३५० किल्ले बांधले
पण अमावस्येला एकही किल्ल्यावर
"काळी बाहुली" टांगली नाही.
तरीसुद्धा काहीच अनर्थ घडला नाही. जे
शिवरायांचे मावळे नाहीत ते
आजही २१ व्या शतकात
अमावस्येच्या रात्री घराच्या बाहेर
पडायला घाबरतात. पण छत्रपती शिवरायांनी अमावास्येच्या रात्री गडद काळ्या अंधाराच्या फायदा  करून शेकडो लढाया जिंकल्या.
या घटनेवरून शिवरायांच्या आजच्या मावळ्यांनी बोध घ्यावा...

*हे कायमचे लक्षात ठेऊया:*

*1) 🤑🌶🍒 लिंबू-मिरची खायची असतात - बांधण्यासाठी नसतात..*

*2) 😱🐈 मांजर पाळायची असते - मांजर आडवी गेली कि काही वाईट होत नाही.उलट उंदरांपासून नुकसान होण्याचे टळते.*

*3) 🗣💭💃 शिंक येणे हा नैसर्गिक प्रकार आहे - शिंकल्याने काही अघटीत होत नाही किंवा काही अडचणीही येत नाहीत..*

*4) 💀🌳 भूत झाडावर राहत नाही - झाडावर पक्षी राहतात..*

*5) 🔬🔭 चमत्कार असे काही नसते - प्रत्तेक गोष्टी मागे विज्ञान आहे प्रत्येकाला कारण आहे..*

*6) ⛄☃ बुवा, बाबा लोक खोटे आहेत - ज्या लोकांना अंग मेहनत करायची नसते तेच हे लोक..!!*

*7) ⛈🌪👺🔥 करणी,         जादू टोणा काही नसते - हे भ्याड लोकांच्या मनाचे खेळ आहेत..*
*जादू-टोणा करून ग्रहाची दिशा बदलणारे हे ढोंगी बाबा: वारा, ढगांची दिशा बदलून पाऊस का पाडत नाहीत...?*⛈☁🌒💫

*8)🌏🐠वास्तुशास्त्र भ्रामक आहे. केवळ दिशांची भिती दाखवून लूट आहे.*
*खरे तर पृथ्वी ही स्वत: क्षणा* *क्षणाला दिशा बदलत असते.*
*खरेच कुबेर उत्तर दिशेला* *असता तर जगातील इतर ठिकाणी कसा आला नाही.*

*9) 👼🐓🐐🍇🍎नवसाने,  व्रताने, पुजेने, नैवैद्याने, बळीने, देणगीने, प्रसन्न होऊन फळ देतो देव, म्हणजे तो काय लाचखाऊ आहे का ?!!*

*10) हे जे वाचलात ते स्वता अनुकरण करा आणि आपल्या मित्रांना देखिल send करा ।*

*हा मैसेच बाकी ग्रुपवर send केल्यामुळे काही चांगली बातमी येणार नाही पण पुढची पीढ़ी नक्की  सुधरे

☀  मुहूर्ताचे वेड ☀
ज्या दिवशी आपला जन्म झाला तोच दिवस, तीच वेळ आपल्यासाठी शुभ..!! जन्माला येताना कधी मुहर्थ पहिला नाही. व मरतानाही पाहणार नाहीत. तरी सुद्धा जिंदगी मुहूर्त पाहण्यात जाते. सगळेच दिवस,, सर्वच वेळ शुभ आहे. फक्त इच्छाशक्ती प्रबळ असावी..आपल्यासाठी  सर्वच दिवस सर्वच वेळ शुभ आहे..!!

☀ कुंडल्या पाहून लग्नांचे मुहूर्त काढले जातात तरी अनेक स्त्रीया विधवा व पुरूष विधूर का होतात...? 
पत्रिका व कुंडली जुळवून लग्न झालेल्या जोडप्यांचे घटस्फोट का  होतात, तर काही अकाली मृत्यू होतात असे का..?
95% विवाह हे मुहूर्तानुसार वेळेवर लागत नाहीत तरी मुहूर्ताचा आग्रह का धरावा...?
  
☀ मुहूर्त पाहून निवडणुकीसाठी उभे राहणा-या सर्व उमेद्वारांपैकी एकच निवडून येतो आणि बाकीचे आपटतात. असे का घडते.....? एकालाच मुहूर्त शुभ होता काय ?

मंत्रीपद मिळाल्यानंतर  मंत्रालयाची  जबाबदारी स्वीकारण्यासाठी  व खुर्चीवर बसण्यासाठी  शुभ मुहूर्त शोधतात तरी त्यांच्या योजना अयशस्वी का होतात...????  मंत्रीपद अल्प कालावधीत का जाते !

☀ शुभ मुहूर्तावर  मूल जन्माला घातल्यास  वैज्ञानिक,  राष्ट्रपती,  पंतप्रधान  होईल काय..?
☀ अंबानीच्या जन्म मुहूर्ताला जन्माला आलेली  व्यक्ती ....ती पण ..अंबानीसारखी  झाली का...?

☀ उच्च शिक्षित डॉक्टर, इंजिनियर  , उद्योजक, आपल्या कार्यालयाचे  बांधकाम करतांना,  व्यवसायास प्रारंभ करतांना मूहूर्त पाहूनच सर्व करतात.....तरी सुद्धा  कित्येकांना अपयश येते असे का...?

         :  कारण :
☀   शुभमुहूर्त  हे थोतांड आहे सत्य नव्हे... ज्यांचा स्वतः वर विश्वास नसतो ,तेच लोकं अशा गोष्टींवर विश्वास ठेवतात.
☀मुहूर्त पाहणारी पेशवाई नष्ट झाली ...आणि कधीही मुहूर्त न पाहणारी .....ब्रिटिशशाही अख्खा  भारत देश गिळून बसली.
☀स्वतःवर व स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवा. चांगले कर्म हेच देव-ईश्वर माना.

☀ जर कोणता पंडित, ज्योतिषी, बुवा, बापू, कापु, झापु महाराज,साधू ,साध्वी तथा वास्तूशास्त्र विशारद शुभमुहूर्तावरच सर्व काही केल्यास तथा वास्तूशास्त्राप्रमाणेच बांधकाम केल्यास यश येईल असे सांगत असतील तर..... स्टँम्प पेपरवर लिहून देण्यास सांगा.  यश न आल्यास नुकसानभरपाईचा दावा ठोकेल  असे सांगा . ते तुमच्या जवळही फिरकणार नाहित.
कारण त्यांनाही माहित असते हे सर्व थोतांड आहे.

☀ जर तुमचं  मन साफ असेल व  तुमच्यात प्रयत्न करण्याची क्षमता असेल....तर तुमच्यासाठी कोणतीही  वेळ  ही  ' शुभ मुहूर्तच ' असते " चला तर आजपासून शुभ-अशुभ या चक्रात न पडता विज्ञानवादी होऊ या.

🙏🏻चला..जगण्याची दिशा बदलूया..!!

सुरुवात स्वतःपासून..!!🙏🏻

Satya Narayan

आपल्या घरच्या बायाला हे
वाचून दाखवा 👇🏻👇🏻👇🏻👇🏻
भटांचा सत्यनारायण कोठुन आला
👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻

🌞कथा ही सत्य नारायणाची 🌞
    🌞आधुनिक सत्य कथा 🌞

ऐका सत्य नारायणाची कथा...
दूर होतील आता तुमच्या व्यथा,
21व्या शतकात सुरू होईल नवीन प्रथा।।
हा! हा!! हा!!!

पुण्यात एक प्रतिष्ठीत ब्राम्हण पंडित होते, त्यांची एक विधवा मुलगी होती.नाव तिचं सत्या  ती विधवा असल्यामुळं फारशी चारचौघात मिसळत नसे.तिचे ब्राह्मणाने मुंडण केलेले होते.

तरीही ती खूप सुंदर दिसत  होती ,आणि मुख्य म्हणजे तरुण होती .सदर ब्राह्मणाच्या घरी एक माळी होता ,बागकाम करायला.फावल्या वेळेत इतर कामात मदत करायचा. त्याच नाव होतं नारायण.त्याची ये जा घरात चांगलीच होती.या कामाच्या येण्याजाण्यात त्याची अपघातानं या कन्येशी ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झालं. आगीजवळ लोणी आलं अन ते वितळलं. तिला दिवस गेले ,पण ही गोष्ट लक्षात यायला खूप उशीर झाला होता.कारण विधवेकडे लक्ष कोण देतो ? हे दुर्लक्ष महाग पडलं . ब्राम्हणाचा नाईलाज झाला .त्यानं मुलीला अडगळीच्या खोलीत कोंडलं, आणि नारायणाला मारुन टाकलं .

इकडे गरोदर मुलीचे नऊ महिने पूर्ण झाले ,एका रात्री या विधवेनं पहाटे चार वाजता एका गोंडस बाळाला जन्म दिला .ब्राम्हणानं ते बाळ उचललं आणि परसदारी  नेऊन केळीच्या बनात केळीच्या बुंध्याशी ठेवलं .ते रक्तानं माखलेलं बाळ ठेवताना ती केळही रक्तानं माखली . ब्राम्हणाला वाटल,ं कुणी श्वापद येऊन ते बाळ खाऊन टाकील आणि आणखी पाप
होण्यापासून आपली सुटका होईल .पण झालं उलटच!

ते बाळ थंडीमुळं आणि चिलटं चावल्यामुळं  व्याकुळ होऊन टाहो फोडून रडायला लागलं . त्या चिमण्या आवाजानं आसमंत जागं झालं . काही लोकांना आवाज आला .कुणाचं बाळ इतक रडतयं हे पाहाण्यासाठी लोक जमू लागले .पहाट झाली .सगळा गाव गोळा झाला . इकडे ब्राम्हणाला कुणकुण लागली.काहीच घडलं नाही अशा अविर्भावात ब्राम्हण केळीच्या बागेत आला आणि जोर जोरात ओरडू लागला केळ व्यायली, केळ व्यायली!केळीनं दिव्य बाळाला जन्म दिला!! चमत्कार झाला!!! भाबड्या लोकांचा या चमत्कारावर लगेच विश्वास बसला. कारण केळीवर रक्ताचे डाग होतेच. लोकांनी बाळाला उचललं. कपड्यात गुंडाळलं .पण बाळ रडायचं काही थांबेना . कारण बाळ भुकेजलेल होतं .

आता बाळाला दुध कोण पाजणार  ? मग ब्राम्हणानेच युक्ती सुचवली .म्हणे गावात दवंडी पिटवा ,जी महिला बाळाला गप्प करील तिला हे दिव्य बालक दिलं जाईल. दिव्य बालक मिळेल या लालसेनं महिलांची रांग लागली . पण असा कसा कुठल्याही बाईला पान्हा फुटेल ? गावातल्या सगळ्या बाया येऊन गेल्या . बाळ काही रडायचं थांबत नव्हतं .शेवटी शोध सुरु झाला कुणी बाई राहिली आहे का ? कुणीतरी सुचवलं की ब्राम्हण पंडिताचीच विधवा मुलगी आता शिल्लक राहिली आहे. तिला तरी आणून बघा .मग तिला बोलावण्यात आलं.तिनं बाळाला जवळ घेताच बाळ गप्प झालं.झालं!!! उध्दार झाला ब्राम्हणाच्या पोरीचा! मग त्या अनौरस दिव्य बालकाचं नाव ठेवले गेलं,
सत्या + नारायण =सत्यनारायण! केळीच्या पोटी जन्म झाला म्हणून सत्यनारायण चार केळीच्या खांबामध्ये ठेऊन पुजला जातो . अशी हि साठाउत्तराची कहाणी सुफळ संपूर्ण झाली.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मित्रांनो ही कथा वाचल्यावर पुराणकथा कशा रचल्या गेल्या असतील ह्याची कल्पना यावी. हा पगडा एवढा जबरदस्त आहे की, अशी व्रते करण्यात स्त्रियाच आघाडीवर असतात.कारण पुरूषाने धार्मिकतेच्या आडून स्त्रियांना मानसिक गुलाम बनवले आहे. अशा कथांतून स्त्रीचा आणि पर्यायाने पूर्ण कुटूंबाचा उद्धार होतो असे भासवले जाते.

शिवरायांच्या काळात सत्यनाराणाचा मागमूस नव्हता, म्हणूनच शिवाजी राजांनी कधी सत्यनारायण पूजल्याचा दाखला इतिहासात सापडत नाही.त्याचा जन्म उत्तर पेशवाईत झाला. कारण ब्राह्मणांना पेशव्यांकडून मिळणारा रमणा म्हणजे दक्षिणा मिळणे बंद झाले.सत्यनारायणाची पूजा अगदी अलीकडची आहे. सुमारे दोनशे वर्षांपूर्वी बंगालमध्ये सत्येन पीर हा मुस्लिम दर्गा होता. या पिराची पूजा-उरूस दरवर्षी होत असे. त्याला प्रारंभी फक्त मुसलमान जमत.नंतर ब्राह्मणही जाऊ लागले. पुढे काहीतरी गडबड झाली आणि ब्राह्मणांनी जायचे बंद केले. पर्यायी पूजा करण्यास सुरुवात केली. त्यासाठी सत्येन मधल्या ‘ सत्ये’ चा ‘ सत्य’ केला आणि ‘ न’ चा ‘ नारायण’ झाला आणि ‘सत्य- नारायण’ अस्तित्त्वात आला.ब्राह्मण पुरोहित वर्गाने हा नवा धंदा तात्काळ ओळखला आणि त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने वाढविला. त्यासंबंधीच्या पोथ्या लिहिल्या.स्कंद पुराणात सत्यनारायणाची कथा घुसडली आणि त्याला प्राचीनतेचा, पौराणिकतेचा टच दिला.

गाडगे बाबांनी तर या देवाला चुलीत घाला म्हणून सांगितलंय .जर सत्यनारायण साधूवाण्याची बुडालेली  बोट वर  काढू शकतो तर दुस-या महायुध्दात बुडालेल्या बोटी सत्यनारायण घालून वर काढून दाखवा , आव्हानही त्यांनी धर्म मार्तंडांना केलं होतं. आजवर ते शक्य झालेल नाही.

म्हणून मित्रांनो, आतातरी डोळे उघडा.आख्खा हिंदू धर्म भटांच्या थोतांडांनी ,खोट्या भंपक कथांनी विकृत झालाय, हे समजून घ्या. आणि कर्मकांड टाळा. नशीबापेक्षा प्रयत्नांवर भर द्या. वैज्ञानिक सृष्टी जशी आपलीशी केलीत तशीच वैज्ञानिक दृष्टीही स्वीकारा म्हणजे आत्मविश्वासाने संकटांवर मात करण्याची शक्ती मिळेल.

विचार करायला लावणारी गोष्ट

विचार करायला लावणारी गोष्ट🌹
एके दिवशी एका ११ वर्षाच्या मुलीने आपल्या वडिलांना सहज विचारले.
बाबा तुम्ही माझ्या १५ व्या वाढदिवशी कोणती भेटवस्तू देणार.?
वडिल म्हणाले त्याला खुप वेळ आहे बेटा. नंतर बघु
काही वर्षांनंतर १४ वर्षांची असताना ती मुलगी अचानक बेशुद्ध पडली.
त्यानंतर तिला रुग्णालयात हलवण्यात आले. तपासणीनंतर डॉक्टरांनी तिच्या वडिलांना संगीतले की तुमच्या मुलीला हृदयाचा विकार आहे आणि ती काही दिवसांचीच पाहुणी आहे. मुलीने ने ऐकले आणि ती तिच्या वडिलांना 
म्हणाली बाबा डॉक्टर काका असे का म्हणाले की मी काही दिवसांनी मरण 
पावणार आहे ?
वडिल म्हणाले तस काही नाही गं
तु तर १०० वर्ष जगणार आहेस. मुलगी म्हणाली तुम्ही एवढ खात्रीशीर
कसं काय सांगू शकता.?
वडिलांनी संगितले मला माहित आहे.
उपचार चालु असताना ती काही महिन्यांनी १५वर्षांची झाली,आणि बरी होऊन जेव्हा ती आपल्या घरी आली तेव्हा तिच्या पलंगावर तीला
एक पत्र तिला सापडले, त्यात लिहीले होते,
माझी लाडकी सोनी, जर तु हे पत्र वाचत असशील तर माझ्या म्हटल्या प्रमाणे सर्व काही ठीक आहे.
एके दिवशी तु मला विचारले होतेस ना की बाबा तुम्ही माझ्या १५व्या वाढदिवशी काय भेटवस्तू द्याल ?तेव्हा मला माहित नव्हते परंतु आता मी तुला माझे हृदय भेट म्हणुन दिले आहे.पत्र वाचताना मुलीच्या डोळ्यातुन अश्रु ओघळु लागले पण ज्यांच्या खांद्याचा आधार घ्यावा ते वडील मात्र तीच्या जवळ नव्हते कारण आपल्या मुलीच्या सुखासाठी वडिलांनी आपले हृदय दान केले होते.
तात्पर्य -आपल्याला सुखी ठेवण्यासाठी आपल्या नकळत आई-वडीलांनी खुप त्याग केलेला असतो.
पण आपण खरच त्यांना समजुन घेतो का ?
मोठे झाल्यावर आपण आपल्या कामात एवढे व्यस्त होतो की आपले 
आपल्या आई-वडीलांकडे दुर्लक्ष होते 
काही जण त्यांना वृद्धाश्रमात ठेवतात
त्यापेक्षा त्यांच्या सहवासात आपला पुरेसा वेळ घालवा. त्यांना नेहमी काळजीपुर्वक प्रेमाने वागणूक द्या. मग बघा त्यांच्याही चेहऱ्यावर हा जन्म सार्थकी झाल्याचा आनंद नक्कीच दिसेल.

😊Saglyani ha msg
nakki vacha😊

लेखक : चंद्रशेखर गोखले यांची..

एंक खूप छान कथा.....

कायद्याने दोघे वेगळे
झाल्यावर त्याने
राहतं घर विकायला काढलं.

ब्रोकरच्या थ्रू तिच्या
वडिलानीच ते घर
विकत घेतलं......

पून्हा घराची
एक किल्ली
त्याच्या हातात
देत म्हणाले...

'मी माझ्या लेकीला
ओळखतो .....

तसा तुलाही.. ...

सगळ्या गोष्टी
भावनेच्या भरात करतोस...

अगदी माझ्या
लेकीशी लग्न सुद्धा......

पून्हा भावनेच्या भरात
एकत्र यावसं
वाटलं तर?

तसं व्हायला नको...

म्हणून
ही रिकामी वास्तू
तुझ्या हवाली
करतो......

कधी वाटलं तर
येऊन बसत जा.....

"भरल्या घरा पेक्षा
रिकामं घर जास्त
बोलतं आपल्याशी......"

भावनेपेक्षा विचार
जास्त ठाम असतात......

विचारांवर ठाम झालास
तर ......
घेतल्या निर्णयाचा
पश्चाताप होणार नाही.. ...

निर्णय ठाम झाला की
माझी किल्ली
मला परत दे. .....

नाहीतर येऊन
माझी मुलगी
परत घेऊन जा......'

आणि खरच तो
ढळत्या दुपारी
रिकाम्या घरात
बसायला लागला......

कलंडणारी ऊन्ह
आपल्या घरात

अशी ऐसपैस पसरतात
त्याला माहीतच नव्हतं... ...

मावळतीचा वारा
अख्ख्या घराचा
ताबा घेतो ..   ..

याची त्याला
कल्पनाच नव्हती...

एक चूकून राहिलेलं
'कालनिर्णय' होतं
भिंतीवर वार्‍याने
फडफडत होतं ....

त्या फडफडण्याचा
आवाज सुद्धा त्याला
नवा होता... ...

त्याने जवळ जाऊन
बघितलं ......
कसल्या कसल्या नोंदी
त्यावर तिने करून
ठेवल्या होत्या...

कसली बीलं
देण्याची तारीख,
दूधाचा हिशोब,
कामवालीचे खाडे,
पेस्ट कंट्रोलची
तारीख...

सिलेंडर संपल्याची तारीख,
ग्राहकचं सामान
येण्याची तारीख...

इस्त्रीचे कपडे
त्याचा हिशोब
या कशातच
तो सहभागी नव्हता... ..

अगदी तिच्या
महिन्याच्या तारखा...

तारीख पुढे गेलीतर....

त्याला गलबलूनच आलं ....

या कशा कशातच
आपण सहभागी नव्हतो.. ...

ती एकटीचा डाव
खेळत राहीली आणि
आपण फक्त.......

तक्रार करत राहिलो.....

त्याला त्या 'कालनिर्णय'
समोर उभं राहणं
शक्य होईना. .....

तो बेडरूम मधे आला
त्याने
खिडकी उघडली .....

खिडकीत तिने
हौसेनं लावलेली
शेवंती होती ......

वाळून वाळून
झूरायला आलेली ....

तिला भिजवयला
तो आतूर झाला,......

कातर झाला...

पाणी घालायला
भांड नव्हतं .......

त्याने कूंडीच
सींक मधे नेली
यथेच्छ पाणी शिंपडलं.....

तहानलेली शेवंती

गटा गटा पाणी प्यायली.. ....
आणि तोच तृप्त झाला......

तेवढ्यात लँच कीने
दार उघडल्याचा
आवाज आला .......

ती आली होती......

शेवंतीसारखीच... .....

तिला समोर बघून
तो उनमळून गेला... ...

काय अवस्था
करून घेतली
आहे हिने... ....

हिच्या आयुष्यातलं
आपलं स्थान
आपल्या लक्षात
कसं आलं नाही?... ....

की आपण लक्षात
घेतलं नाही?
जिद्दीला पेटून
भांडते तेंव्हा
ती कुठल्याही
टोकाला पोहोचते
हे काय आपल्याला
लग्नाआधी माहीत नव्हतं?.....

दोघांची नजरा नजर झाली...

दोघे क्षणभरासाठी स्तब्ध.....

ती म्हणाली,

"मी ही शेवंतीच
न्यायला आले
होते... "

तो गलबलून म्हणाला,

"आत्ताच पाणी दिलय... ...

तिचं निथळणं
संपेपर्यंत थांब ना......"

आणि ती थांबली......

..अगदी...   कायमची...!!!

पाहताक्षणी एखादी
व्यक्ति आवडणं
हे 'आकर्षण'असतं.....

परत पहावसं वाटणं
हा 'मोह'असतो....

त्या व्यक्तिच्या
जवळून जाण्याची
इच्छा असणं
ही'ओढ'असते.....

त्या व्यक्तिला
जवळून जाणणं
हा 'अनुभव' असतो.....

आणि त्या व्यक्तिला
तिच्या गुणदोषांसह
स्विकारणं .......

हेच खरं "प्रेम" असतं.....

हेच खरं "प्रेम" असतं.....

नात्याची सुंदरता
एकमेकांच्या चुका
स्वीकारण्यात आहे.....

कारण एकही
दोष नसलेल्या
माणसाचा
शोध घेत बसलात.......

तर आयुष्यभर
एकटे राहाल......

विश्वास उडाला
की आशा संपते......

आणि काळजी घेण
सोडल की प्रेम......

म्हणुन, विश्वास ठेवा,....

आणि काळजी घ्या.......

आयुष्य खुप सुन्दर आहे.......

एका घराजवळ बरेच दिवस मोठ्या इमारतीचे बांधकाम चालले होते.
तेथून जाताना मला रोज बांधकाम मजुरांची लहान मुले ऐकमेकांचा सदरा पकडून आगगाडीचा खेळ खेळताना दिसायची.
दररोज कुणीतरी इंजिन बनायचे आणि बाकिची मुले डबे व्हायची...

इंजिन आणि डबे रोज बदलली जायची,
पण...
फक्त अर्धी निकर घातलेला छोटा मुलगा हातातलं फडकं  फिरवत गार्ड व्हायचा...

आज न राहवून
थांबून मी त्या गार्ड होणाऱ्या मुलाला बोलावून विचारले,

"बाळ तू रोज गार्ड होतोस, तुला कधी इंजिन, कधी डबा व्हायला आवडत नाही का?"
त्यावर तो मुलगा उत्तरला...

"बाबूजी मला घालावयास सदरा नाही त्यामुळे मागच्याला धरायला काही नाही. मग माझ्या मागे कोण येणार ?"
म्हणून मी रोज गार्ड बनूनच खेळात भाग घेतो...

"हे बोलताना त्याच्या डोळ्यांत मला पाणी तरळल्याचे जाणवले...

त्या मुलाने आज जीवनाचा एक धडा शिकविला !

*आपले जीवन हे कधीच परिपूर्ण नसते. त्यात काही  ना काही कमतरता असणारच...*
*तरीही आपल्याला जीवनाचा खेळ खेळावा लागणारच.*

त्या मुलाला घालावयास सदरा नाही म्हणून आई- बापावर व् मित्रांवर  रागावून, रुसून रडत बसता आले असते...
पण,
*तसे न करता आहे त्यात समाधान मानून तो खेळात सहभागी झाला.*
*आणि जीवनाच्या खेळाचं अंग बनून राहिला.*

तर चला आपल्यालाही आहे त्यात समाधानी राहून या जीवनाच्या खेळाचं अंग व्हायचे आहे.
सतत हसत खेळत रहा व जीवनाच्या खेळाचा आनंद घ्या...

*Be positive and be happy...!*

*कसं जगावं..?  🙄🙄🙄*  😬😜

*मनुष्य गरीब असला की लोक म्हणतात पैसे कमवायची अक्कल नव्हती. त्यामुळेच चार पैसे कमवू शकला नाही..🤕🤕*
*श्रीमंत असला की म्हणतात, दोन नंबर करत असणार.. त्याशिवाय का कुणी आजकाल श्रीमंत होतं..? प्रामाणिकपणे वागून पैसे मिळत नाहीत. आम्ही चोवीस तास राब-राब राबतोय. झालो का श्रीमंत..?👳🏼👳🏼*

*पैशाच्या मागे धावू लागला की म्हणतात, पैशाची हाव सुटली आहे.. 💵💴🏃🏽*
*पैशाला जीवनात महत्व दिलं नाही तर म्हणतात, त्याच्या जीवनात काही महत्वाकांक्षाच नाही..! 😮😮*

*नुसतेच पैसे कमावले आणि खर्च न करता साठवून ठेवले, तर कवडी चुंबक म्हणतात.*
*चैन केली आणि जरा पैसा खर्च केला तर लगेच, उधळ्या म्हणतात.🤗🤗*

*वाडवडीलांची संपत्ती मिळाली तर त्याचेही सुख लोकांना पाहवत नाही. लगेच त्याला म्हणणार, बघा कसा बसलाय आयत्या बिळावर नागोबा..! स्वत:चं काही कर्तृत्व दाखवलं कधी आयुष्यात..?😴😴*

*आयुष्यात कष्ट करून पैसे कमावले तरी टोमणे काही सुटत नाहीत. म्हणतात, काय उपयोग आहे त्याच्या आयुष्याचा..? नुसता पैशाच्या मागे धावतोय पण सुख उपभोगायला वेळ नाही. असं आयुष्य काय कामाचं..?🚶🏼🚶🏽*

*जास्त भाविक असला तर म्हणतात, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव..🙂🙂*
*आणि मंदीरात नाही गेला तर नास्तिक म्हणतात.👺👺*

*तारुण्यात अकाली मृत्यू आला तर हळहळतात, अरेरे फार लवकर गेला. त्याचा भविष्यकाल उज्ज्वल होता. 🗣🗣*
*दीर्घायुषी झालात तर तेच लोक म्हणतील, अजून किती दिवस सरकारची पेन्शन खाणार कुणास ठाऊक..?💂🏼💂🏼*

*मनुष्य तब्येतीने बारीक असला तर झुरळ🕷 म्हणतात. जाड असला की हत्ती 🐘 म्हणतात. बारीक माणूस दिसल्यावर म्हणतात तुझ्याकडे पाहिलं की देशात दुष्काळ पडलाय असं वाटतं.🙁🙁 जाड मनुष्य बघितल्यावर म्हणतात हा दुष्काळ असल्या माणसांमुळेच पडतो..!👹👹*

*सहज कोणाला मदत केली तर म्हणतात, यामागे नक्कीच काहीतरी हेतू असणार.*
*नाही मदत केली तर म्हणणार, साधी माणूसकी नाही बघा..😱😱*

*सरळ स्वभावाचा असेल तर म्हणतात, अंगात थोडातरी स्वार्थ हवा.👨🏻👨🏻*
*स्वार्थी असलाच तर म्हणतात, माणसाचा स्वभाव सरळ हवा. स्वार्थाची संपत्ती काय कामाची..?🤓🤓*

*खेळकर स्वभाव असला तर म्हणतात, आचरट आहे. परिस्थितीचं गांभीर्य नाही. 😏😏*
*आणि गंभीर असणंही त्यांना रुचत नाही. म्हणतात, हसण्याची अलर्जी आहे याला. कोण जवळ येईल याच्या..!😂😂*

*तुम्ही यशस्वी झालात तरी यांना अडचण होते. म्हणतात, आमचं ऐकल्यामुळेच यशस्वी झाला.💁🏼💁🏼*
*अयशस्वी झालात तर म्हणणार, आमचं ऐकलं नाही. मग भोगा कर्माची फळं..!🙇🏻🙇🏼*

*लोकांचं काय घेऊन बसलात..? काहीही केलंत तरी त्याला नावं ठेवण्याची त्यांना सवय असल्याने त्यांचं म्हणणं किती मनावर घ्यायचं..?*  *जग काय म्हणेल याची पर्वा करत आपलं जीवन का नासून घ्यायचं..?🤔🤔*

*मंगेश पाडगावकरांनी फार सुरेख शब्दात ही भावना व्यक्त केलीय..*
*फिदीफिदी हसतील ते हसू देत की.. बोटं मोडीत बसतील ते बसू देत की..!*
*आपण का शरमून जायचं..?*
*कशासाठी वरमून जायचं?*
*कशासाठी भयाने ग्रासून जायचं..?*
*फुलायच्या प्रत्येक क्षणी कशाला* *नासून जायचं..?*
*आपलं जीवन आपण ठरवायचं, कसं जगायचं..*
*कण्हत-कण्हत कि गाणं म्हणत, हे आपणच ठरवायचं..!* plz read