Showing posts with label Ek Asehi Naate. Show all posts
Showing posts with label Ek Asehi Naate. Show all posts

नात्याची परीभाषा

मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला ...
कोणत्याही नावाची गरज नसते...
कारण न सांगता जुळणा-या नात्यांची ...
परीभाषाच काही वेगळी असते

तीच लोक आपली असतात....

सूर्योदया पासून सूर्यास्ता पर्यंत अनेक जण भेटतात...
खूप जण आपल्या जवळ येतात आणि दुरावतात ही...
अनेक जण आपल्याला शब्द देतात आणि विसरतात ही...
सूर्यास्ता नंतर स्वतः ची सावलीही दूर जाते...
पण जे लोक आपली शेवटपर्यंत साथ देतात तीच लोक आपली असतात....

लोभ नसतो कशाचा फक्त नातं महत्वाचे असतं...

आठवण बनून  भेटतात सारेच
पण ओठांवर नाव बनून मोजकेच राहतात...

दु:खात सांत्वन करतात सारेच
पण आसवे पुसणारी मोजकीच असतात...

कामापुरते गोड बोलून वार करणारे सारेच असतात...
पण नात्यात गोडी ठेवून सोबत राहणारे क्वचितच सापडतात...

लोभ नसतो कशाचा फक्त नातं महत्वाचे असतं...
असे लोक मात्र नशिबानेच मिळत असतात ...........