Kutra ani gadav

एकदा कुत्र्यात अनं गाढवात पैंज लागते कि जो पण लवकरात लवकर पळत जाऊन २ गावाच्या पलीकडच्या सिंहासनावर बसेन तोच त्या सिंहासनाचा मानकरी ठरेन.
ठरल्या प्रमाणे दोघे तयार झाले , कुत्र्याला वाटले मिच जिंकेन कारण गाढवापेक्षा मी जोरात धाऊ शकतो ,
पण कुत्र्याला पुढे काय होणार ते नक्की माहिती नव्हते.
शर्यत सुरु झाली.
कुत्रा जोरात धाऊ लागला; पण थोडस पुढ गेला नसेल कि लगेच पुढच्या गल्लीतील कुत्र्यांनी त्याला हुसकून लावयला सुरवात केली. असेच प्रत्येक गल्लीत , प्रत्येक चौकात , प्रत्येक सिग्नल वर घडत राहिले.
कसा बसा कुत्रा धावत धावत सिंहासनाजवळ पोहचला तर बघतो तर काय गाढव त्याच्या आधीच पोहचले होते तिकडे.
अन त्यांनी शर्यत जिंकून ते 'राजा' झाले होते.
अन ते बघून निराश झालेला कुत्रा बोलला कि....

"जर माझ्याच लोकांनी मला मागे ओढले नसते तर आज गाढव सिंहासनावर बसले नसते."

तात्पर्य काय ???
तर सामाजिक,धार्मिक आणि उद्योगधंदा यांच्या  बाबतीत....

१.आपल्या माणसांना विश्वासात घ्या.
२.आपल्या माणसांना पुढे जाण्यास सहकार्य करा, 
    त्याना प्रोत्साहन द्या.
३.नाहीतर उद्या बाहेरची गाढ़व आपल्यावर राज्य
    करतील.
४. नक्की विचार आणि आत्मपरिक्षण करा आणि पुढे पाठवा..

No comments:

Post a Comment