जरूर वाचाच.......
👌👌👌👌👌👌👌

केस अर्पण
करून कुठे पुण्य मिळते,

नारळ अर्पण
करून कुठे भाग्य उजळते,

केस अन् नारळ
विकुनी होतो व्यापार.

सोनं- चांदी अर्पण
करून कुठे काय मिळते.

सोने -चांदीच्या
दागिन्यांचा होतो लिलाव.

काय उपयोग सांग मानवा
अशा या दान धर्माचा ???

कधी शेतक-याला
बियाणं दान देऊन बघा.

कधी निराधार
कन्येचा विवाह लाऊन बघा.

कधी एखाद्या निराधार
बालकाचा पालक होऊन बघा.

कधी एखाद्या
उपाश्याला भरवुन बघा.

कधी एखाद्या
अपंगाला आधार देऊन बघा.

कधी एखाद्या शाळेचा
जीर्णोध्दार करून बघा.

कधी एखाद्या
वृध्दाश्रमास दान करून बघा.

कधी एखाद्या आश्रमातील
निराधारांवर प्रेम करून बघा.

एकदा दान धर्माच्या
व्याख्या बदलून तर बघा !!!

जेव्हा मंदिरात जाणाऱ्या
रांगा वाचनालयात जातील,

तेव्हा भारत
जगात महासत्ता बनेल...

पुस्तक वाचनाने
माणसाचं मस्तक सशक्त होतं...

सशक्त झालेलं मस्तक
कुणाच हस्तक होत नसतं...

आणि हस्तक न झालेलं मस्तक
कुठेही नतमस्तक होत नसतं...!

शाळेचे छत गळके आणि
मंदिराचे छत मात्र सोन्याचे ?

शाळेत आज मुलांना
बसायला साधी फरशी नाही.

आणि
मंदिराला मात्र संगमरवरी ?

शाळेला दोन रुपये देतांना दहा
वेळा चौकश्या करणारा पालक,

मंदिराला दोन हजार देतांना
अजिबात चौकशी करत नाही..

आपला भारत
नक्की महासत्ता होणार ?

पायात घालायची चप्पल
ए सी मधे विकायला ठेवतात,

आणि
भाजीपाला फूटपाथवर...!

आणि म्हणे
आमचा देश कृषी प्रधान..!

आणि
आत्महत्या करतो शेतकरी..

शेकडो
मैल चालतो वारकरी...

अन विठोबाचे
पहिले दर्शन घेतो मुख्यमंत्री..!

वाचा, विचार करा, आणि
पटलं तरच पुढे पाठवा..!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

No comments:

Post a Comment