उशिरा उठायचं स्वत:ची गाडी काढायची कामावर जायचं आणि वेळेत घरी यायचं. ना लाईनमध्ये उभे राहणे, ना बसची वाट पाहण्याची गरज. सुट्टीच्या दिवशी *आस्वाद* ची किंवा *मंदार* ची *मिसळ* आणी *सलगर* च्या *चहा* ची चव घ्यायची, स्टँड समोरच्या *गणेश हॉटेल* ची *कुर्मापुरी* खायची, दुपारी *मांडवीत मसाला किचन* हॉटेल मध्ये *पापलेट* वर ताव मारायचा.
संध्याकाळी *छाया हॉटेल* च्या *पॅटीसची* व *टॉकीजवरील शिवलकर यांच्या वडापाव* ची चवच न्यारी.
पावसामुळे उशीर होईल का? घरी परत कधी पोहचू? याची चिंता सोडाच...
प्रत्येक सणाला प्रत्येक छोटया मोठया कार्यक्रमांना हजेरी तसेच गावातल्या घराघरांत भेट देणे.
कधी *गणपतीपूळेचा* बीच
कधी *भाट्ये* बीच
तर कधी *आरे वारे* बीच
कधी *मिऱ्या बंदर*
तर कधी *पावस चे स्वरूपानंद मंदिर*
कधी *मार्लेश्वर चे प्रसिद्ध स्वयंभू शिवमंदिर व निसर्गरम्य धबधबा* तर *हातीस चे*पीर बाबरशेख मंदिर*
कधी *देवी जखदेवी मंदिर*
*कसब्याचे कर्णेश्वर मंदिर*
व *छत्रपती संभाजी स्मारक* कधी *राजवाडी व आरवली* येथील *गरम पाण्याची कुंडे* पावसाळ्यात *सप्तेश्वर* ला भेट देण्याची मजा काही औरच तसेच आजुबाजूस ऐतिहासिक प्राप्ती लाभलेले *प्रचितगड, भवानगड व रत्नदुर्ग* आहेतच
पावसाळी सर्व हिरवगार
हिवाळयात गुलाबी थंडी
पावसाळ्यात खूप पाऊस
उन्हाळ्यात सौम्य उन्हाळा सारंच न्यार.....
*"रत्नागिरीकर"* होण्यात जी मजा आहे, ती दुस-या कशात खरच नाही!
माहिती साभार ✍🏻 ___
#कोकणचीमाणसंसंधीभोळी
#कोकणसुख
#villagelife
#villagelifestyle
#villagefood
No comments:
Post a Comment