रात्रीस खेळ चाले

रात्रीस खेळ चाले
---------------------
कोकणातली भूतां लई वाईट,एकदा का झाड
धरल्यानी कि सोडणात नाय....
हे वाक्य ऐकायला खूप गोड वाटतं, कारण
मालवणी भाषा गोड आहे.
या मालिकेवरून बऱ्याच उलट-सुलट प्रतिक्रिया
ऐकू येत आहेत.
 

परन्तु लोक हे का विसरत आहेत ती एक मालिका
आहे.
एक तर आपणच म्हणायच कोकण एक पर्यटन ठिकाण
आहे.निसर्गाने नटलेलं आहे.
दुसरीकडे मुंबई-गोवा रस्ता आहे,त्या रस्त्याने एकदा
जाऊन पहा.मुख्यतः पनवेल ते इंदापूर
तो रस्ता आहे की आणखी काही.....
त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला तुम्हाला भयानकताच
दिसेल.
ह्या मालिकावाल्यानी त्या रस्त्याचं चित्रीकरण करावं
आणि रात्रीचं ह्या रस्त्याने प्रवास करावा,मुख्यतः
पनवेल ते इंदापूर
यातून येणारा अनुभव किती भयावह असेल तो कथन
करावा.किंवा या रस्त्याने प्रवास करणाऱ्या लोकांना
विचारावा.
आम्ही तो अनुभव नेहमीच घेतो आहे.
त्या बाबत कोणी बोलताना दिसत नाही.
असं असा आमचॊ कोकण आणि कोकणची माणसं.

No comments:

Post a Comment