एकदा एका विमानतळावर एक मुलगी वाट पाहत बसली होती.
.
थोड्या वेळाने तिने तिथल्याच स्टोअरमधून एक पुस्तक आणि  बिस्कीटपुडा खरेदी केला.
.
कुणाचा त्रास होऊ नये म्हणून ती “व्हीआयपी वेटिंग एरिया"त जाऊन पुस्तक वाचत बसली.
.
तिच्या शेजारी दुसरे एक गृहस्थ वर्तमानपत्र वाचत बसले होते.
.
शेजारी बिस्किटाचा पुडा होता.
.
तिने एक बिस्कीट खाताच त्यांनी ही त्याच पुड्यातून एक बिस्कीट घेऊन खाल्ले.
.
त्या गृहस्थाचा निर्लज्जपणा पाहून तिचा पारा चढला.
“काय निर्लज्ज मनुष्य आहे हा!"
.
"माझ्या अंगी थोडी हिंमत असती,
तर याला इथल्या इथे चांगलंच सरळ केलं असतं!"
.
ती मनात विचार करत होती.
.
दोघांचेही एक-एक बिस्कीट खाणे सुरूच होते.
.
आता शेवटचे बिस्कीट उरले.
.
“आता हा हावरट मनुष्य ते बिस्कीट स्वत: खाईल,
का?
मला अर्धे देण्याचा आगाऊपणा करेल?’
.
ती विचार करत होती.
“आता हे अतिच झालं,”
असे म्हणत ती दुसऱ्या खुर्चीवर
जाऊन बसली.
.
थोड्या वेळाने राग शांत झाल्यावर पुस्तक ठेवायला तिने पर्स उघडली.
.
पाहते तर काय,

तिचा बिस्कीटपुडा पर्समध्येच होता.
.
आपण कुणा दुसऱ्याची बिस्किटे खाल्ली,
याची तिला खूप लाज वाटली.
.
एका शब्दानेही न बोलता त्या  व्यक्तीने आपली बिस्किटे तिच्यासोबत वाटली होती.
.
तिने नजर टाकली,
तर,
शेवटचे बिस्कीटही त्याने तिच्यासाठी ठेवले होते.
.

निष्कर्ष – आयुष्यात कितीतरी वेळा आपण दुसऱ्याच्या वाट्याचे खाल्ले आहे;
पण आपल्याला त्याची जाणीवच नसते.
.
दुसऱ्यांविषयी मत बनवताना किंवा वाईट बोलताना आपण सर्व गोष्टींचा आढावा घेतलाय का ???
.
कित्येकदा गोष्टी वरपांगी वाटतात तशा प्रत्यक्षात नसतात....!!!
.
           "चांगली वस्तु"
           "चांगली व्यक्ती"
                     व
           "चांगले दिवस"
                 यांची
              "किंमत"
     निघुन गेल्यावर समजते...

"प्रेमाने" जोडलेली चार माणसं व त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द हे "वैभव" ज्याच्याजवळ आहे, तोच खरा "श्रीमंत".
.
चार चौघात बसण्यापेक्षा,कधी कधी समुद्र किनाऱ्यावर किंवा निवांत ठिकाणी शांतपणे आठवणींना घेऊन बसावं.
.
आयुष्य जास्त सुंदर वाटत...
.
        आपल्याला कोण हवंय,
                 यापेक्षा
         आपण कोणाला हवंय
         हे सुद्धा कधीतरी पहावं.

आयुष्य खरंच जास्त सुंदर वाटत...
.
आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत,
त्याच प्रमाणे,
माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत,
शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं.
.
आयुष्य जास्त सुंदर वाटत...

No comments:

Post a Comment