गणपतीपुळेच्या समुद्र किनारयावरून विशाल व यश हे  जिवलग मित्र फिरत होते, बोलता बोलता त्यांच्या मध्ये छोट्याश्या गोष्टीवरून वाद झाला, व विशालने यशच्या कानाखाली मारली, त्यावेळी यश काहीच बोलला नाही व त्याने खालील वाळू वर लिहिले कि,
.
"आज माझ्या जवळच्या मित्राने मला कानाखाली मारली "
.
थोड्यावेळाने ते दोघे समुद्रात स्नान करायचे ठरवतात, स्नान करताना यशचा तोल जातो व तो समुद्रामध्ये बुडायला लागतो...

त्यावेळी विशाल त्याला वाचवितो, बाहेर आल्यावर यश एका दगडावर लिहितो कि,
.
"आज माझ्या जवळच्या मित्राने माझे प्राण वाचविले."
.
ते वाचून विशाल म्हणतो :- "जेव्हा मी तुला मारलं, दुखविले तेव्हा तू वाळू वर लिहिलेस व जेव्हा मी तुला वाचविले तेव्हा तू दगडावर लिहिलेस ..
असे का ?"
.
यश म्हणतो :- " जेव्हा कोणी आपल्याला दुखवितो, आपण ती गोष्ट वाळूवर लिहायला पाहीजे, जेणे करून माफीचा वारा व दोस्तीची शीतल लाट येऊन लगेच ते पुसून टाकेल..
.
पण जेव्हा कोणी आपल्याला सुखवितो, वाचवितो तेव्हा आपण ती गोष्ट दगडावर कोरायला पाहीजे,
.
जेणे करून सोसाट्याचा वारा किंवा कोणतीच लाट ते कधीच पुसू शकणार नाही "
.
.
मैत्री, नाते ही अशीच असतात किरकोळ कारणांसाठी कधीच तोडू नका.

No comments:

Post a Comment