मैत्रीचे नाते

'मैत्री तुटायला कधी सुरुवात होते.....'' ?आपण मैत्री मध्ये व्यवहारआणतो तेव्हा.मैत्रीमध्ये आपण खूप अपेक्षा ठेवायला सुरुवात करतो तेव्हा.आपण मित्राला गृहीत धरायला सुरुवात करतो तेव्हा.मैत्रीमध्ये आपणच कसेप्रामाणिक आहोत हेसमोरच्याला सांगायला लागतो तेव्हा.मित्र असे का वागला हे त्याला न विचारता आपणच मित्राच्या तसे वागण्यामागची कारणे शोधायला सुरुवात करतो तेव्हा.आपण कसेही वागलो तरी मित्र आपल्याला समजून घेईल असे जेव्हा आपण समजायला लागतो तेव्हा.मित्राने गमतीने बोललेल्याशब्दांचा अर्थ आपण आपल्या पद्धतीने घ्यायला सुरुवात करतो तेव्हा.भांडण झाल्यावर पहिला फोन मित्रानेच केला पाहिजे असे आपण ठरवतो तेव्हा.मित्र श्रीमंत झाल्यावरआपणच आपल्याला त्याच्या समोर गरीब समजायला लागतो तेव्हा.आपला मित्र आता बदलत चालला आहे अशी आपली धारणा व्हायला लागते तेव्हा .मित्र बिझी असेल,त्यालाही त्याच्या अडचणी असतील हे आपण विसरायला लागतो तेव्हा.आपल्या मित्राची आपण चार चौघात टर उडवायला सुरुवात करतो तेव्हा.आपण जसा विचार करतो तशाच विचाराने मित्राने वागले पाहिजे असा दुराग्रह बनतो तेव्हा.आपली चूक असतानाही मित्राने आपलीच बाजू कशी बरोबर आहे हे लोकांना सांगायला हवे अशी बावळट अपेक्षा आपण करायला लागतो तेव्हा.खिशात पैसे असूनही जेवणाचे बिल भरताना आपला हात आपल्या पाकीटाकडे जात नाही तेव्हा.कुठलातरी निकष लावत आपण आपल्या मित्राची इतरांबरोबर तुलना करायला लागतो तेव्हा.आपले मित्रांशिवाय काहीअडत नाही हे आपण नकळतमित्राला दर्शवायला लागतोतेव्हा.आपल्या भल्यासाठी मित्रानेसांगितलेल्या गोष्टी आपल्यालापकाऊ लेक्चर वाटायला लागते तेव्हा.मित्र online दिसतोय पणआपल्या message ला reply देत नाही याचा अर्थ तो आपल्याला ignore करतोयअसला सडका विचारआपल्या मनात येतो तेव्हा .खर तर कुठलीही मैत्री कधीतुटत नसते,तर त्या मैत्रीमधील मित्र एकमेकांपासून तुटतअसतात.असे असेल,तसे झाले असेल,असे काल्पनिक विचारकरीत आपण मैत्रीत संशयाचेवादळ निर्माण करीत असतो.मित्र एकमेकांपासून तुटले तरीत्यांच्यातील मैत्री दोघांच्याहीमनात जिवंत असते.पण कुठेतरी गैरसमज,अहंकारअसल्या फालतू गोष्टीमुळे तीमैत्री मनातल्या मनात दडपूनजाते.चांगली मैत्री बनायलाअनेक काळ जावा लागतो.पण मैत्रीमधील धागे तुटायलाएका क्षणाचाही वेळ लागत नाही.तेव्हा मित्रांनो!तुमच्या मित्राकडून एखादीचूक झाली असेल तर त्यालामाफ करा.आणितुमच्याकडून कुठली चूक घडली असेल तर मित्राचीक्षमा मागायला लाजू नका.बेस्ट लक फ्रेंड्स

No comments:

Post a Comment