एकदा एक संत देवाबरोबर बोलत होता.....त्याने देवाला स्वर्ग आणि नरक मधला फरक विचारला......
“ये तुला प्रत्यक्ष दाखवतो....” देव म्हणाला...
त्याने संताला दोन दरवाजा जवळ नेले.....त्याने पहिलं दरवाजा ढकलला.....एका मोठ्या खोलीत प्रवेश केला....एका मोठ्या गोल टेबलाभोवती अनेक माणसे बसली होती....टेबलाचा मध्यावर रुचकर खिरीने भरलेले मोठे भांडे ठेवलेलं होत.....त्या खिरीचा सुगंधाने त्या संत माणसाचा तोंडाला देखील पाणी सुटलं होत.....पण मग त्याचा लक्षात आल की ती माणसे उपाशी भुकेली दिसत होती.....त्यांचा हाताला लांब दांड्यांचे चमचे बांधलेले होते.....त्यांना हात लांब करून खीर खाता येत नव्हती.......कारण चमचाचा दांडा हातपेक्षा लांब होता.....त्यांचा यातनांना अंत नव्हता.....भुकेचा भरीला खिरीचा सुवासाने त्यांना वेड लावले होते....
“हा नरक आहे...”देव म्हणाला....
“चल आता स्वर्ग पाहू....”ते दुसर्या. दारातून आत आले....ती खोली सुद्धा हुबेहूब पहिल्या खोली सारखीच होती....तेच टेबल तेच खिरीच भांड.....भोवताली माणस आणि हाताला बांधलेले चमचे.....पण ही सगळी माणसे तृप्त...समाधानी व आनंदी दिसत होती......आपापसात हसत आनंदाने राहत होती.....
“मला कळत नाहीये.....” संत म्हणाला,”सारख्याच खोल्या,टेबल,भांडी,खीर आणि तेच लांब दांड्यांचे चमचे,मग ही माणसे खाऊन तृप्त आणि ती उपाशी आणि दुखी का...??
“सोप आहे...”देव म्हणाला
“या खोलीतील माणसे एकमेकांना भरवायला शिकली आहेत....हावरट मनुष्य फक्त स्वतचा विचार करतो.....”
तात्पर्य........
दुसर्यां ना मदत करा......मग बघा आपल्या जीवनातील अंतरंग कसे खुलतात ते......

No comments:

Post a Comment